Sri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 11

Sri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 11

Shree Swami Samarth

Shree Swami Samarth, my salutations to all Swami devotees. Today we are going to learn about Sri Swami Charitra Saramrit Chapter Eleven.

In the previous chapter, the writer has narrated the current situation of Balappa coming to Murgod village. The work of a righteous man named Chidambara Dixit who happened there has also been narrated by the writer

First of all, Balappan came to know about Sri Swamy, in Murgod village. But some Brahmins advised to go to Sri Datta place i.e. Gangapur instead of going to Akkalkot. So Balappa entered Gangapur.

Many devotees used to come to Gangapur to get their wishes fulfilled. Some devotees used to enter Gangapur for progeny, some for wealth, some for happiness and some for prestige. But Balappa entered Gangapur with Sadhguru’s obsession.

On reaching Gangapur, Balappa devoted himself to the service of Datta. Balappa started his daily routine by taking regular bath, mid-day bath, evening salutation, meditation and chanting. And started receiving Madhukari to earning his bread and food.

A few months later. In the dream, three Yatimurtis came forward and stood up. Further, fifteen days later, the dream appeared again. A Brahmin appeared in a dream. And said to go to Akkalkot and serve Shri Swami.

At the end of the mid-day bath, Balappa saw a scorpion under his clothes. But he freed it without killing it. And on his way back to the temple he received many auspicious signs. And in Madhukari they got sweets to eat.

Balappa left for Akkalkot considering this day as auspicious to go to Akkalkot. Later he came to Akkalkot and devoted himself to the service of Sri Swami. It was because of his previous pilgrimage that Balappa enjoyed the association of Sri Swami for many years. And here ends the eleventh chapter of Sri Swami Charitra Saramrita. Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth

Along with this we are giving you the eleventh chapter of original Swami charitra Saramrita.

अध्याय अकरावा

श्रीगणेशाय नम:।
मागलें अध्यायीं वर्णिले। बाळाप्पा मुरगोडीं आले।
पुण्यस्थानीं राहिले। तीन रात्री आनंदें ॥1॥

तेथें कळला वृत्तांत। अक्कलकोटीं साक्षात।
यतिरूपें श्रीदत्त। वास्तव्य सांप्रत करिताती ॥2॥

परी मुरगोडीचे विप्र। बाळाप्पासी सांगत।
गाणगापूर विख्यात। महाक्षेत्र भीमातीरीं ॥3॥

तेथें आपण जावोनी। बैसावें हो अनुष्ठानीं।
श्री गुरु स्वप्नीं येवोनी। सांगती तैसें करावें ॥4॥

मानवला तयासी विचार। निघाले तेथुनी सत्वर।
जवळीं केले गाणगापूर। परम पावन स्थान तें ॥5॥

बाळाप्पा तेथें पातले। स्थान पाहोनी आनंदले।
नृसिंहसरस्वती पाउलें। प्रेमभावें वंदिली ॥6॥

प्रात:काळीं उठोनी। संगमावरी स्नान करोनी।
जप ध्यान आटपोनी। मागुती येती गांवांत ॥7॥

सेवेकर्‍यांबरोबरी। मागोनिया मधुकरी।
भोजनोत्तर संगमावरी। परतोनी येती ते ॥8॥

माध्याह्न स्नान करोनी। पुन्हा बैसती जप ध्यानी।
अस्ता जातां वासरमणी। संध्यास्नान करावें ॥9॥

करोनिया संध्यावंदन। जप आणि नामस्मरण।
रात्र पडतां परतोन। ग्रामामाजी येती ते ॥10॥

सदगुरु प्राप्तीकरितां। सोडुनी गृह-सुत-कांता।
शीतोष्णाची पर्वा न करितां। आनंदवृत्ती राहती ॥11॥

शीतोष्णाचा होय त्रास। अर्धपोटीं उपवास।
परी तयांचें मानस। कदा उदास नोहेची ॥12॥

अय्याराम सेवेकरी। राहत होते गाणगापुरीं।
त्यांनी देखुनी ऐसीपरी। बाळाप्पासी बोलती ॥13॥

तुम्हीं भिक्षा घेवोनी। नित्य यावें आमुचे सदनीं।
जें जें पडेल तुम्हांस कमी। तें तें आम्हीं पुरवूं जी ॥14॥

बाळाप्पासी मानवलें। दोन दिवस तैसें केलें।
पोट भरोनी जेवले। परी संकोच मानसीं ॥15॥

जाणें सोडिलें त्याचे घरीं। मागोनिया मधुकरी।
जावोनिया संगमावरी। झोळी उदकीं बुडवावी ॥16॥

आणोनिया बाहेरी। बैसोनी तिथे शिळेवरी।
मग खाव्या भाकरी। ऐसा नेम चालविला ॥17॥

ऐसे लोटले कांहीं दिवस। सर्व शरीर झाले कृश।
निशीदिनीं चिंता चित्तास। सदगुरु प्राप्तीची लागली॥18॥

हीन आपुलें प्राक्तन। भोग भोगवी दारुण।
पहावे सदगुरुचरण। ऐसें पुण्य नसेची ॥19॥

एक मास होता निश्चिती। स्वप्नीं तीन यतीमूर्ती।
येवोनिया दर्शन देती। बाळाप्पा चित्तीं सुखावें ॥20॥

पंधरा दिवस गेल्यावरी। निद्रिस्थ असतां एके रात्रीं।
एक ब्राह्मण स्वप्नाभीतरीं। येवोनिया आज्ञापी ॥21॥

अक्कलकोटीं श्रीदत्त। स्वामीरुपें नांदत।
तेथें जाउनी त्वरीत। कार्य इच्छित साधावें ॥22॥

आपण केले अनुष्ठान। परी तें न जाहलें पूर्ण।
आणखीही कांहीं दिन। क्रम आपुला चालवावा ॥23॥

मग कोणे एके दिवशीं। बाळाप्पा आले संगमासी।
वृक्षातळीं ठेवुनी वस्त्रासी। गेले स्नान करावया ॥24॥

परतले स्नान करोनी। सत्वर आले त्या स्थानीं।
वस्त्र उचलितां खालोनी। वृश्चिक एक निघाला॥25॥

तयासी त्यांनीं न मारिलें। नित्यकर्म आटोपिलें।
ग्रामामाजी परत आले। गेले भिक्षेकारणें॥26॥

त्या दिवशीं ग्रामाभीतरीं। पक्वान्न मिळालें घरोघरीं।
बाळाप्पा तोषले अंतरीं। उत्तम दिन मानिला ॥27॥

अक्कलकोटीं जावयासी। निघाले मग त्याच दिवशीं।
उत्तम शकुन तयांसी। मार्गावरी जाहले ॥28॥

चरण-चाली चालोनी। अक्कलकोटीं दुसरे दिनीं।
बाळाप्पा पोंचले येवोनी। नगरी रम्य देखिली॥29॥

जेथें नृसिंह सरस्वती। यतिरूपें वास करिती।
तेथें सर्व सौख्यें नांदती। आनंद भरला सर्वत्र ॥30॥

तया क्षेत्रींचें महिमान। केवीं वर्णूं मी अज्ञान।
प्रत्यक्ष जें वैकुंठभुवन। स्वामी कृपेनें जाहलें ॥31॥

इति श्री स्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
श्रोेते सदा परिसोत। एकादशोध्याय गोड हा ॥32॥

श्रीरस्तु ॥ शुभं भवतु॥

In a few days we will start a blog on the true experiences of Swami devotees. And also write the name of those who experienced this in the blog. So mail us your experience as soon as possible. Our email address is, rajesh.kamble01@gmail.com So see you soon with a new article till then to all Swami devotees Sri Swami Samarth ||

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ११

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  ११

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय अकरावा या बद्दल जाणून घेणार आहोत.


मागील अध्यायात ग्रंथ कर्त्याने बाळप्पा हे मुरगोड गावी आल्याचे वर्तमान कथन केले आहे. तेथेच होऊन गेलेल्या, चिदंबर दिक्षित नावाच्या सत्पुरुषाच्या कार्याचे कथन‌ही ग्रंथ कर्त्याने केले आहे.

सर्वप्रथम मुरगोड गावातच बाळप्पाना श्री स्वामीं विषयी माहिती समजली. परंतु काही ब्राह्मणांनी अक्कलकोटला जाण्या ऐवजी श्री दत्त क्षेत्री म्हणजेच गाणगापूरला जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बाळप्पा गाणगापूर येथे दाखल झाले.

गाणगापूरात बरेचसे भक्त मनोकामना पूर्ण होण्यासाठी येत असत. कुणी संततीसाठी तर कुणी संपत्तीसाठी, कुणी सुख समाधानासाठी तर कुणी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी भक्तजन गाणगापूरात दाखल होत असत. बाळप्पा मात्र सद्गुरूचा ध्यास घेऊन गाणगापूरात दाखल झाले.

गाणगापूरात पोहोचल्यावर बाळप्पांनी स्वतःला दत्त सेवेत झोकून दिले. बाळप्पा नित्य स्नान, मध्यान्ह स्नान, संध्या वंदन करुन नित्य नियमाने जपध्यान व नामस्मरण करीत आपला दिनक्रम चालवू लागले. आणि माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करू लागले.

पुढे काही महिन्यांनी स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात तीन यतीमुर्ती समोर येऊन उभ्या ठाकल्या. आणखी पुढे पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात एका ब्राह्मणाने दर्शन दिले. व अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी सेवा करा असे सांगितले.

मध्यान्ह स्नान आटोपते वेळी वस्त्रा खाली बाळप्पांना एक विंचू दिसला. पण त्याला न मारता तसेच सोडून दिले. आणि मंदिरात परतताना त्यांना अनेक शुभ संकेत प्राप्त झाले. व माधुकरीत त्यांना मिष्ठान्न खायला मिळाले. अक्कलकोटला जाण्यास हाच दिवस शुभ मानून, बाळप्पा अक्कलकोटला निघाले. पुढे त्यांनी अक्कलकोटला येऊन स्वतःला श्री स्वामी सेवेत झोकून दिले. त्यांच्या पुर्व पुण्याई मुळेच बाळप्पांना श्री स्वामींचा अनेक वर्षे सहवास लाभला. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या अकराव्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ

सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय अकरावा देत आहोत.

अध्याय अकरावा

श्रीगणेशाय नम:।
मागलें अध्यायीं वर्णिले। बाळाप्पा मुरगोडीं आले।
पुण्यस्थानीं राहिले। तीन रात्री आनंदें ॥1॥

तेथें कळला वृत्तांत। अक्कलकोटीं साक्षात।
यतिरूपें श्रीदत्त। वास्तव्य सांप्रत करिताती ॥2॥

परी मुरगोडीचे विप्र। बाळाप्पासी सांगत।
गाणगापूर विख्यात। महाक्षेत्र भीमातीरीं ॥3॥

तेथें आपण जावोनी। बैसावें हो अनुष्ठानीं।
श्री गुरु स्वप्नीं येवोनी। सांगती तैसें करावें ॥4॥

मानवला तयासी विचार। निघाले तेथुनी सत्वर।
जवळीं केले गाणगापूर। परम पावन स्थान तें ॥5॥

बाळाप्पा तेथें पातले। स्थान पाहोनी आनंदले।
नृसिंहसरस्वती पाउलें। प्रेमभावें वंदिली ॥6॥

प्रात:काळीं उठोनी। संगमावरी स्नान करोनी।
जप ध्यान आटपोनी। मागुती येती गांवांत ॥7॥

सेवेकर्‍यांबरोबरी। मागोनिया मधुकरी।
भोजनोत्तर संगमावरी। परतोनी येती ते ॥8॥

माध्याह्न स्नान करोनी। पुन्हा बैसती जप ध्यानी।
अस्ता जातां वासरमणी। संध्यास्नान करावें ॥9॥

करोनिया संध्यावंदन। जप आणि नामस्मरण।
रात्र पडतां परतोन। ग्रामामाजी येती ते ॥10॥

सदगुरु प्राप्तीकरितां। सोडुनी गृह-सुत-कांता।
शीतोष्णाची पर्वा न करितां। आनंदवृत्ती राहती ॥11॥

शीतोष्णाचा होय त्रास। अर्धपोटीं उपवास।
परी तयांचें मानस। कदा उदास नोहेची ॥12॥

अय्याराम सेवेकरी। राहत होते गाणगापुरीं।
त्यांनी देखुनी ऐसीपरी। बाळाप्पासी बोलती ॥13॥

तुम्हीं भिक्षा घेवोनी। नित्य यावें आमुचे सदनीं।
जें जें पडेल तुम्हांस कमी। तें तें आम्हीं पुरवूं जी ॥14॥

बाळाप्पासी मानवलें। दोन दिवस तैसें केलें।
पोट भरोनी जेवले। परी संकोच मानसीं ॥15॥

जाणें सोडिलें त्याचे घरीं। मागोनिया मधुकरी।
जावोनिया संगमावरी। झोळी उदकीं बुडवावी ॥16॥

आणोनिया बाहेरी। बैसोनी तिथे शिळेवरी।
मग खाव्या भाकरी। ऐसा नेम चालविला ॥17॥

ऐसे लोटले कांहीं दिवस। सर्व शरीर झाले कृश।
निशीदिनीं चिंता चित्तास। सदगुरु प्राप्तीची लागली॥18॥

हीन आपुलें प्राक्तन। भोग भोगवी दारुण।
पहावे सदगुरुचरण। ऐसें पुण्य नसेची ॥19॥

एक मास होता निश्चिती। स्वप्नीं तीन यतीमूर्ती।
येवोनिया दर्शन देती। बाळाप्पा चित्तीं सुखावें ॥20॥

पंधरा दिवस गेल्यावरी। निद्रिस्थ असतां एके रात्रीं।
एक ब्राह्मण स्वप्नाभीतरीं। येवोनिया आज्ञापी ॥21॥

अक्कलकोटीं श्रीदत्त। स्वामीरुपें नांदत।
तेथें जाउनी त्वरीत। कार्य इच्छित साधावें ॥22॥

आपण केले अनुष्ठान। परी तें न जाहलें पूर्ण।
आणखीही कांहीं दिन। क्रम आपुला चालवावा ॥23॥

मग कोणे एके दिवशीं। बाळाप्पा आले संगमासी।
वृक्षातळीं ठेवुनी वस्त्रासी। गेले स्नान करावया ॥24॥

परतले स्नान करोनी। सत्वर आले त्या स्थानीं।
वस्त्र उचलितां खालोनी। वृश्चिक एक निघाला॥25॥

तयासी त्यांनीं न मारिलें। नित्यकर्म आटोपिलें।
ग्रामामाजी परत आले। गेले भिक्षेकारणें॥26॥

त्या दिवशीं ग्रामाभीतरीं। पक्वान्न मिळालें घरोघरीं।
बाळाप्पा तोषले अंतरीं। उत्तम दिन मानिला ॥27॥

अक्कलकोटीं जावयासी। निघाले मग त्याच दिवशीं।
उत्तम शकुन तयांसी। मार्गावरी जाहले ॥28॥

चरण-चाली चालोनी। अक्कलकोटीं दुसरे दिनीं।
बाळाप्पा पोंचले येवोनी। नगरी रम्य देखिली॥29॥

जेथें नृसिंह सरस्वती। यतिरूपें वास करिती।
तेथें सर्व सौख्यें नांदती। आनंद भरला सर्वत्र ॥30॥

तया क्षेत्रींचें महिमान। केवीं वर्णूं मी अज्ञान।
प्रत्यक्ष जें वैकुंठभुवन। स्वामी कृपेनें जाहलें ॥31॥

इति श्री स्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
श्रोेते सदा परिसोत। एकादशोध्याय गोड हा ॥32॥

श्रीरस्तु ॥ शुभं भवतु॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामी समर्थ

Sri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 10

Sri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 10

Shree Swami Samarth

Shree Swami Samarth, my salutations to all Swami devotees. Today we are going to learn about Sri Swami Charitra Saramrita Chapter Ten.

It is because of our previous meritorious deeds that we got this human birth and this Sri Swami Charitra Saramrita is being written by our hands. Expressing gratitude for this, the writer starts writing further stories.

In a village called Haveri, there lived a Yajurvedi Brahmin named Balappa, who was engaged in the trade of Sarafi (jwellery). There was no shortage of happiness, prosperity and wealth in the house. They were getting all kinds of happiness. At the age of 30, his mind began to fade. And they felt altruistic. Existence is fleeting. Instead of running after the pleasures of it, Balappa decided to turn to eternal and liberating altruism.

One night Balappa had a dream. On receiving a favorable signal in the dream, he left his household saying that he had some work to do in Solapur. And started wandering elsewhere in search of Sadhguru.

Walking around, Balappa reached the village of Murgod. A well-known legend named Chidambara Dixit was living at Murgod.

While introducing Chidambara Dixit, the author says that a pious Brahmin named Malhar Dixit lived in Murgod village. He was well versed in Vedas. But he didn’t have children so he was always sad. Malhar Dixit did penance for twelve years to get a child. Then he got the benefit of son due to Shiva Prasad.

In reality, Shri Shankara was born in the belly of Malhar Dixit’s wife. Later this child became proficient in all kinds of studies. At the age of eight, the boy proved his divinity by bringing a clay elephant to life. The kingdom of Rao Baji Peshwa, who was dealing with him, went on perish.

Shri Swami himself was present in the Mahayagya ceremony of Chidambara Dikshit. And the book writers write that Sri Swami was responsible for growing ghee. When the ghee ran out during the meal, Sri Swami casually touched the urns and miraculously supplied everyone with ghee. This has been narrated by the author. Balappa entered Chidambara Dixit’s land. And here ends the tenth chapter of Sri Swami Charitra Saramrita. Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth.

Along with this we are giving you the tenth chapter of original Swami charitra Saramrita.

अध्याय दहावा

श्रीगणेशाय नम:।
गाठी होतें पूर्वपुण्य। म्हणुनी पावलों नरजन्म।
याचें सार्थक उत्तम। करणें उचित आपणां ॥1॥

ऐसा मनीं करूनि विचार। आरंभिलें स्वामीचरित्र।
ते शेवटासी नेणार। स्वामी समर्थ असती पैं ॥2॥

हावेरी नामक ग्रामीं। यजुर्वेदी गृहस्थाश्रमी।
बाळाप्पा नामें द्विज कोणी । राहत होते आनंदें ॥3॥

संपत्ती आणि संतती। अनुकूल सर्व तयांप्रती।
सावकारी सराफी करिती। जनीं वागती प्रतिष्ठित ॥4॥

तीस वर्षांचें वय झालें। संसारातें उबगले।
सद्गुरुसेवेचे दिवस आले। मती पालटली तयांची ॥5॥

जरी संसारीं वर्तती। तरी मनीं नाहीं शांती।
योग्य सदगुरु आपणाप्रती। कोठें आतां भेटेल ॥6॥

पंचपक्वान्नें सुवर्ण ताटीं। भरोनी आपणापुढें येती।
पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी। उल्हासलें मानस ॥7॥

तात्काळ केला निर्धार। सोडावें सर्व घरदार।
मायापाश दृढतर। विवेकशस्त्रें तोडावा ॥8॥

सोलापुरीं काम आम्हांसी। ऐसें सांगुनी सर्वत्रांसी।
निघाले सदगुरु शोधासी। घरदार सोडिलें ॥9॥

मुरगोड ग्राम प्रख्यात। तेथें आले फिरत फिरत।
जेथें चिदंबर दीक्षित। महापुरुष जन्मले ॥10॥

मुरगोडीं मल्हार दीक्षित। वेदशास्त्रीं पारंगत।
धर्मकर्मीं सदा रत। ईश्वरभक्त तैसाची ॥11॥

परी तयां नाहीं संतती। म्हणोनिया उद्विग्न चित्तीं।
मग शिवाराधना करिती। कामना चित्तीं धरोनी ॥12॥

द्वादशवर्षें अनुष्ठान। केलें शंकराचें पूजन।
सदाशिव प्रसन्न होऊन। वर देत तयांसी ॥13॥

तुझी भक्ती पाहोन । संतुष्ट झालें माझें मन ।
मीच तुझा पुत्र होईन । भरंवसा पूर्ण असावा ॥14॥

ऐकोनिया वरासी । आनंदले मानसीं।
वार्ता सांगतां कांतेसी। तेही चित्तीं तोषली ॥15॥

नवमास भरतां पूर्ण। कांता प्रसवली पुत्ररत्न।
मल्हार दीक्षितें आनंदोन। संस्कार केले यथाविधी ॥16॥

चिदंबर नामाभिधान। ठेवियलें तयालागुन।
शुक्लपक्षीय शशिसमान। बाळ वाढूं लागलें ॥17॥

पुढें केलें मौंजीबंधन। वेदशास्त्रीं झाले निपुण।
निघंटु शिक्षा व्याकरण। काव्यग्रंथ पढविले ॥18॥

एकदा यजमानाचे घरीं। व्रत होतें गजगौरी।
चिदंबर तया अवसरीं। पूजेलागीं आणिले ॥19॥

प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणतां। गजासी प्राण येउनी तत्वतां।
चालूं लागला हें पाहतां। विस्मित झाले यजमान ॥20॥

ऐशा लीला अपार। दाखविती चिदंबर।
प्रत्यक्ष जे का शंकर। जगदुद्धारार्थ अवतरले ॥21॥

असो पुढें प्रौढपणीं। यज्ञ केला दीक्षितांनीं।
सर्व सामग्री मिळवूनी। द्रव्य बहुत खर्चिलें ॥22॥

तया समयीं एके दिनीं। ब्राह्मण बैसले भोजनीं।
तूप गेलें सरोनी। दीक्षितांतें समजलें ॥23॥

जलें भरले होते घट। तयांसी लावितां अमृतहस्त।
तें घृत झालें समस्त। आश्चर्य करिती सर्व जन ॥24॥

तेव्हां पुणें शहरामाजी। पेशवे होते राव बाजी।
एके समयीं ते सहजीं। दर्शनातें पातले ॥25॥

अन्यायानें राज्य करित। दुसर्‍याचें द्रव्य हरित।
यामुळें जन झाले त्रस्त। दाद त्यांची लागेना ॥26॥

तयांनी हें ऐकोन। मुरगोडीं आले धावोन।
म्हणती दीक्षितांसी सांगून। दाद आपुली लावावी ॥27॥

रावबाजीसी वृत्तांत। कर्णोपकर्णीं झाला श्रुत।
म्हणती जें सांगतील दीक्षित। तें अमान्य करवेना ॥28॥

मग दीक्षितांसी निरोप पाठविला। आम्ही येतों दर्शनाला।
परी आपण आम्हांला। त्वरीत निरोप देइजे ॥29॥

ऐसें सांगता दीक्षितांप्रती। तया वेळीं काय बोलती।
आता पालटली तुझी मती। त्वरीत मागसी निरोप ॥30॥

कोपला तुजवरी ईश्वर। जाईल राज्यलक्ष्मी सर्व।
वचनीं ठेवी निर्धार।निरोप तुजला दिला असे ॥31॥

सिद्धवाक्य सत्य झालें। रावबाजीचें राज्य गेलें।
ब्रह्मावर्तीं राहिले। परतंत्र जन्मवरी ॥32॥

एके समयीं अक्कलकोटीं। दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी।
तेव्हां बोलले स्वामी यती। आम्हीं त्यातें जाणतों ॥33॥

यज्ञसमारंभाचे अवसरीं। आम्हीं होतों त्यांचे घरी।
तूप वाढण्याची कामगिरी। आम्हांकडे तैं होती ॥34॥

महासिद्ध दीक्षित। त्यांचे वर्णिलें अल्पवृत्त।
मुरगोडीं बाळाप्पा येत। पुण्यस्थान जाणोनी ॥35॥

तेथें ऐकिला वृत्तान्त। अक्कलकोटीं स्वामीसमर्थ।
भक्तजन तारणार्थ। यतिरुपें प्रगटले ॥36॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत प्रेमळ भक्त। दशमोध्याय गोड हा ॥37॥

श्रीस्वामीराजार्पणमस्तु ॥ शुभं भवतु । श्रीरस्तु ॥

In a few days we will start a blog on the true experiences of Swami devotees. And also write the name of those who experienced this in the blog. So mail us your experience as soon as possible. Our email address is, rajesh.kamble01@gmail.com So see you soon with a new article till then to all Swami devotees Sri Swami Samarth ||

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १०

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १०

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय दहावा या बद्दल जाणून घेणार आहोत.

आपल्या पुर्व पुण्याई मुळेच आपल्याला हा मनुष्य जन्म लाभला आणि आपल्या हातून हे श्री स्वामी चरीत्र सारामृताचे लिखाण होत आहे. या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार ‌पुढे कथा लिहिण्यास प्रारंभ करतात.

हावेरी नामक गावी बाळाप्पा नावाचे, सराफीचा व्यवसाय करणारे यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते. सुख, समृद्धी आणि धनधान्याला ‌घरात काही कमी नव्हती. सर्व प्रकारचे सुख त्यांना मिळत होते. वयाच्या तिशीला त्यांचे मन प्रपंचात लागेनासे झाले. आणि त्यांना परमार्थाची ओढ लागली. प्रपंच हा क्षणभंगूर आहे. त्यातील सुखाच्या मागे धावण्या पेक्षा, शाश्वत आणि मुक्तीदायक परमार्था कडे‌ वळण्याचा बाळप्पांनी निश्चय केला.

फिरत फिरत बाळप्पा मुरगोड गावी येऊन पोहोचले. मुरगोड येथे पुर्वी चिदंबर दिक्षित नावाचे सुप्रसिद्ध महापुरुष होऊन गेले.

चिदंबर दिक्षितांचा परिचय करून देताना ग्रंथकार सांगतात की, मुरगोड गावी मल्हार दिक्षित नावाचे ईश्वरभक्त ब्राह्मण रहात होते. ते वेदशास्त्रसंपन्न होते. परंतु संतान सुख नसल्याने सदैव उदास रहात. संतान प्राप्ती व्हावी म्हणून मल्हार दिक्षितांनी बारा वर्षे तपश्चर्या केली. तेव्हा त्यांना शिव प्रसादामुळे पुत्र रत्नाचा लाभ झाला.

साक्षात श्री शंकराने मल्हार दिक्षितांच्या पत्नी पोटी जन्म घेतला. पुढे हे बालक सर्व प्रकारच्या विध्याभ्यासात निपूण झाले. वयाच्या आठव्या वर्षी त्या बालकाने, मातीच्या हत्तीला जीवंत करून आपले देवत्व सिद्ध केले. त्यांच्याशी दूर्व्यवहार करणार्या रावबाजी पेशवे यांचे राज्य पुढं लयास गेले.

या चिदंबर दिक्षितांच्या महायज्ञ समारंभात खुद्द श्री स्वामी हजर होते. आणि श्री स्वामींकडे तुप वाढण्याची जबाबदारी होती असे ग्रंथकार लिहितात. जेवणावळीत जेंव्हा तुप संपले तेव्हा श्री स्वामींनी रित्या कलशांना स्पर्श करून, चमत्काराने सर्वांना तुप पुरवले. असे ग्रंथकाराने कथन केले आहे. अशा या चिदंबर दिक्षितांच्या भुमित बाळप्पा दाखल झाले. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या दहाव्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय दहावा देत आहोत.

अध्याय दहावा

श्रीगणेशाय नम:।
गाठी होतें पूर्वपुण्य। म्हणुनी पावलों नरजन्म।
याचें सार्थक उत्तम। करणें उचित आपणां ॥1॥

ऐसा मनीं करूनि विचार। आरंभिलें स्वामीचरित्र।
ते शेवटासी नेणार। स्वामी समर्थ असती पैं ॥2॥

हावेरी नामक ग्रामीं। यजुर्वेदी गृहस्थाश्रमी।
बाळाप्पा नामें द्विज कोणी । राहत होते आनंदें ॥3॥

संपत्ती आणि संतती। अनुकूल सर्व तयांप्रती।
सावकारी सराफी करिती। जनीं वागती प्रतिष्ठित ॥4॥

तीस वर्षांचें वय झालें। संसारातें उबगले।
सद्गुरुसेवेचे दिवस आले। मती पालटली तयांची ॥5॥

जरी संसारीं वर्तती। तरी मनीं नाहीं शांती।
योग्य सदगुरु आपणाप्रती। कोठें आतां भेटेल ॥6॥

पंचपक्वान्नें सुवर्ण ताटीं। भरोनी आपणापुढें येती।
पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी। उल्हासलें मानस ॥7॥

तात्काळ केला निर्धार। सोडावें सर्व घरदार।
मायापाश दृढतर। विवेकशस्त्रें तोडावा ॥8॥

सोलापुरीं काम आम्हांसी। ऐसें सांगुनी सर्वत्रांसी।
निघाले सदगुरु शोधासी। घरदार सोडिलें ॥9॥

मुरगोड ग्राम प्रख्यात। तेथें आले फिरत फिरत।
जेथें चिदंबर दीक्षित। महापुरुष जन्मले ॥10॥

मुरगोडीं मल्हार दीक्षित। वेदशास्त्रीं पारंगत।
धर्मकर्मीं सदा रत। ईश्वरभक्त तैसाची ॥11॥

परी तयां नाहीं संतती। म्हणोनिया उद्विग्न चित्तीं।
मग शिवाराधना करिती। कामना चित्तीं धरोनी ॥12॥

द्वादशवर्षें अनुष्ठान। केलें शंकराचें पूजन।
सदाशिव प्रसन्न होऊन। वर देत तयांसी ॥13॥

तुझी भक्ती पाहोन । संतुष्ट झालें माझें मन ।
मीच तुझा पुत्र होईन । भरंवसा पूर्ण असावा ॥14॥

ऐकोनिया वरासी । आनंदले मानसीं।
वार्ता सांगतां कांतेसी। तेही चित्तीं तोषली ॥15॥

नवमास भरतां पूर्ण। कांता प्रसवली पुत्ररत्न।
मल्हार दीक्षितें आनंदोन। संस्कार केले यथाविधी ॥16॥

चिदंबर नामाभिधान। ठेवियलें तयालागुन।
शुक्लपक्षीय शशिसमान। बाळ वाढूं लागलें ॥17॥

पुढें केलें मौंजीबंधन। वेदशास्त्रीं झाले निपुण।
निघंटु शिक्षा व्याकरण। काव्यग्रंथ पढविले ॥18॥

एकदा यजमानाचे घरीं। व्रत होतें गजगौरी।
चिदंबर तया अवसरीं। पूजेलागीं आणिले ॥19॥

प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणतां। गजासी प्राण येउनी तत्वतां।
चालूं लागला हें पाहतां। विस्मित झाले यजमान ॥20॥

ऐशा लीला अपार। दाखविती चिदंबर।
प्रत्यक्ष जे का शंकर। जगदुद्धारार्थ अवतरले ॥21॥

असो पुढें प्रौढपणीं। यज्ञ केला दीक्षितांनीं।
सर्व सामग्री मिळवूनी। द्रव्य बहुत खर्चिलें ॥22॥

तया समयीं एके दिनीं। ब्राह्मण बैसले भोजनीं।
तूप गेलें सरोनी। दीक्षितांतें समजलें ॥23॥

जलें भरले होते घट। तयांसी लावितां अमृतहस्त।
तें घृत झालें समस्त। आश्चर्य करिती सर्व जन ॥24॥

तेव्हां पुणें शहरामाजी। पेशवे होते राव बाजी।
एके समयीं ते सहजीं। दर्शनातें पातले ॥25॥

अन्यायानें राज्य करित। दुसर्‍याचें द्रव्य हरित।
यामुळें जन झाले त्रस्त। दाद त्यांची लागेना ॥26॥

तयांनी हें ऐकोन। मुरगोडीं आले धावोन।
म्हणती दीक्षितांसी सांगून। दाद आपुली लावावी ॥27॥

रावबाजीसी वृत्तांत। कर्णोपकर्णीं झाला श्रुत।
म्हणती जें सांगतील दीक्षित। तें अमान्य करवेना ॥28॥

मग दीक्षितांसी निरोप पाठविला। आम्ही येतों दर्शनाला।
परी आपण आम्हांला। त्वरीत निरोप देइजे ॥29॥

ऐसें सांगता दीक्षितांप्रती। तया वेळीं काय बोलती।
आता पालटली तुझी मती। त्वरीत मागसी निरोप ॥30॥

कोपला तुजवरी ईश्वर। जाईल राज्यलक्ष्मी सर्व।
वचनीं ठेवी निर्धार।निरोप तुजला दिला असे ॥31॥

सिद्धवाक्य सत्य झालें। रावबाजीचें राज्य गेलें।
ब्रह्मावर्तीं राहिले। परतंत्र जन्मवरी ॥32॥

एके समयीं अक्कलकोटीं। दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी।
तेव्हां बोलले स्वामी यती। आम्हीं त्यातें जाणतों ॥33॥

यज्ञसमारंभाचे अवसरीं। आम्हीं होतों त्यांचे घरी।
तूप वाढण्याची कामगिरी। आम्हांकडे तैं होती ॥34॥

महासिद्ध दीक्षित। त्यांचे वर्णिलें अल्पवृत्त।
मुरगोडीं बाळाप्पा येत। पुण्यस्थान जाणोनी ॥35॥

तेथें ऐकिला वृत्तान्त। अक्कलकोटीं स्वामीसमर्थ।
भक्तजन तारणार्थ। यतिरुपें प्रगटले ॥36॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत प्रेमळ भक्त। दशमोध्याय गोड हा ॥37॥

श्रीस्वामीराजार्पणमस्तु ॥ शुभं भवतु । श्रीरस्तु ॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामी समर्थ

Shri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 9

Shri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 9

Shree Swami Samarth

Shri Swami Samarth, my greetings to all the devotees of shree Swami. Today we are going to know about Shri Swami Charitra Saramrit Adhyay Ninth.

In this chapter we will see. Shankarrao RajeRao Bahaddur reached Akkalkot with his beloved wife.

There are many places in Akkalkot, many devotees come here to see Shri Swami so that their wishes are fulfilled. Devotees of different religions like Brahmins, four varnas as well as Parshis, Yavans etc. are here for the darshan of Shri Swami. That’s why Swami place got the form of the fair.

Confused as to how he would get a glimpse of Sri Swami in such a crowd here, then Shankara Rao met Sundara Bai, the chief servant of the Math.

Sundara Bai was very greedy. But she was in Swami’s service only because of previous vertue. She was close to Sri Swami. Shankarao expressed his grief to Sundara Bai. And prayed about meeting Sri Swami.

As soon as Sundara Bai realized that Shankara Rao was a great and reached person, so greed arose in her heart. Sundara Bai asked Shankara Rao to promise that he would pay two thousand rupees after he got rid of the disease. But Shankarao agreed to pay ten thousand rupees and gave up his resolve.

According to Shankarao, he met Sri Swami. At that time Shri Swami was in Sheikh Nur Baba’s dargah. As Sundara Bai pleaded with Sri Swami to remove the hindrance of Shankara Rao’s Brahma Samandha, Sri Swami got up and lay down in the freshly dug grave. Then a servant said to Shankarao that Shri Swami missed your death by doing Leela.

Shri Swami asked Shankarao to divide ten black pepper seeds in a bitter lemon leaf and take that medicine regularly and said that your Samandha problem will be removed. Then Shankarao donated food to the fakirs and the people there. And offered a shroud to Sheikh Nur Saheb.

Then Shri Swami asked Shankarao not to pay Sundara Bai two thousand rupees. With that money, a Chunegachchi Math was built outside the village with the connivance of the devotees. Such an order was given to Shankarao by Shri Swami. The same Math is today known as Rajerai Math in Akkalkot. And here ends the ninth chapter of Sri Swami Charitra Saramrita. Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth.

Within a few days, Shankara Rao was freed from all the problems and diseases. After some time, Shankarao came to Akkalkot to see Shri Swami. And told Shri Swami about his resolution to give ten thousand rupees after getting rid of his disease.

Then Shri Swami asked Shankarao not to pay two thousand rupees to Sundara Bai. With that money, a Chunegachchi Math was built outside the village with the connivance of the devotees. Such an order was given to Shankarao by Shri Swami. The same Math is today known as Rajerai Math in Akkalkot. And here ends the ninth chapter of Sri Swami Charitra Saramrita. Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth.

Along with this we are giving you the ninth chapter of original Swami charitra Saramrita.

अध्याय नववा

श्रीगणेशाय नम:।
घरोघरीं स्वामीकीर्तनें। नित्य होतीं ब्राह्मण-भोजनें।
स्वामी नामाचीं जप ध्यानें। अखंडीत चालतीं ॥1॥

दिगंतरीं गाजली ख्याती। कामना धरोनी चित्तीं।
बहुत लोक दर्शना येती। अक्कलकोट नगरांत ॥2॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक। शूद्र आणि अनामिक।
पारसी यवन भाविक। दर्शना येती धांवोनी ॥3॥

यात्रेची गर्दी भारी। सदा आनंदमय नगरी।
साधु संत ब्रह्मचारी। फकीर संन्यासी येती पैं ॥4॥

किती वर्णावें महिमान। जेथें अवतरलें परब्रह्म।
ते नगरीं वैकुंठधाम। प्रत्यक्ष भासूं लागली ॥5॥

असो ऐशा नगरांत। शंकरराव प्रवेशत।
आनंदमय झाले चित्त। समाधान वाटलें ॥6॥

जे होते स्वामीसेवक। त्यांत सुंदराबाई मुख्य।
स्वामीसेवा सकळिक। तिच्या हस्तें होतसे ॥7॥

व्याधी दूर करावी म्हणोनी। विनंती कराल स्वामीचरणीं।
तरी आपणालागोनी। द्रव्य कांहीं देईन ॥8॥

बाईसी द्रव्यलोभ पूर्ण। आनंदलें तियेचें मन।
म्हणे मी इतुकें करीन। दोन सहस्र रुपये द्याल कीं ॥9॥

ते म्हणती बाईसी। इतुकें कार्य जरी करिसी।
तरी दहा सहस्र रुपयांसी। देईन सत्य वचन हें ॥10॥

बाई विस्मित झाली अंतरीं। ती म्हणे हें सत्य जरी।
तरी उदक घेउनी करीं। संकल्प आपण सोडावा ॥11॥

शंकरराव तैसें करिती। बाई आनंदली चित्तीं।
म्हणे मी प्रार्थूनिया स्वामींप्रती। कार्य आपुलें करीन ॥12॥

बार्ई स्वामींसी बोले वचन। हे गृहस्थ थोर कुलीन।
परी पूर्वकर्में यांलागून । ब्रह्मसमंध पीडितो ॥13॥

तरी आतां कृपा करोनी। मुक्त करावें व्याधीपासोनी।
ऐसें ऐकतां वरदानीं। समर्थ तेथोनी ऊठले ॥14॥

यवनस्मशानभूमींत। आले यतिराज त्वरित।
एका नूतन खांचेंत। निजले छाटी टाकोनी ॥15॥

सेवेकरी शंकररावांसी। म्हणती लीला करुनी ऐशी।
चुकविलें तुमच्या मरणासीं। निश्चय मानसीं धरावा ॥16॥

शंकररावें तया दिवशीं। खाना दिधला फकिरांसी।
आणि शेखनुर दर्ग्यासी। एक कफनी चढविली ॥17॥

मग कांहीं दिवस लोटत। स्वामीराज आज्ञापित।
बारीक वांटुनी निंबपत्र। दहा मिरें त्यांत घालावीं ॥18॥

तें घ्यावें हो औषध। तेणें जाईल ब्रह्मसमंध।
जाहल्या स्वामीराज वैद्य। व्याधी पळे आपणची ॥19॥

प्रकृतीसी आराम पडला। राव गेले स्वनगराला।
कांहीं मास लोटता तयांला। ब्रह्मसमंधें सोडिलें ॥20॥

मग पुन्हा आनंदेसी। दर्शना आले अक्कलकोटासी।
घेउनी स्वामीदर्शनासी। आनंदित जाहले ॥21॥

म्हणती व्याधी गेल्यानंतर। रुपये देईन दहा सहस्र।
ऐसा केला निर्धार। त्याचें काय करावें ॥22॥

महाराज आज्ञापिती। गांवाबाहेर आहे मारुती।
तेथें चुनेगच्ची निश्चिती। मठ तुम्हीं बांधावा ॥23॥

ऐशिया एकांत स्थानीं। राहणार नाहीं कोणी।
ऐसी विनंती स्वामीचरणीं। कारभारी करिताती ॥24॥

सर्वांनुमतें तेथेंची। मठ बांधिला चुनेगच्ची।
किर्ती शंकररावांची। अजरामर राहिली ॥25॥

इति श्री स्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत भाविक भक्त। नवमोध्याय गोड हा ॥26॥

श्रीस्वामीराजार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु॥

In a few days we will start a blog on the true experiences of Swami devotees. And also write the name of those who experienced this in the blog. So mail us your experience as soon as possible. Our email address is, rajesh.kamble01@gmail.com So see you soon with a new article till then to all Swami devotees Sri Swami Samarth ||

Shree Swami Samarth

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ९

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  ९

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय नववा या बद्दल जाणून घेणार आहोत.

या अध्यायात आपण पाहणार आहोत की, शंकरराव राजेराय बहाद्दूर हे आपल्या प्रिय पत्नी सहीत अक्कलकोटला येऊन पोहोचतात.

अक्कलकोट येथे अनेक ठिकाणांहून, अनेक भक्त आपले मनोरथ पूर्ण व्हावे यासाठी श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असत. ब्राह्मणादी चारही वर्णाचे लोक तसेच पारशी, यवन आदी विविध धर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनार्थ येत असत. त्यामुळे श्री स्वामी स्थानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असे.

सुंदरा बाई या फार लोभी वृत्तीच्या होत्या. परंतु पुर्व पुण्याई मुळेच त्या स्वामी सेवेत होत्या. श्री स्वामींच्या जवळ होत्या. शंकररावांनी आपली व्यथा सुंदरा बाईं जवळ मांडली. व श्री स्वामींची भेट घडवून आणण्या बद्दल प्रार्थना केली.

शंकरराव हे फार मोठे आसामी आहेत हे सुंदरा बाईंना समजताच त्यांच्या मनात लोभ उत्पन्न झाला. व व्याधीतून मुक्त झाल्यावर दोन हजार रूपये द्याल, असे वचन सुंदरा बाईंनी शंकररावांकडून मागितले. पण शंकररावांनी दहा हजार रूपये देण्याचे कबूल करून संकल्प सोडला.

शंकररावांनी सांगितल्या नुसार त्यांची भेट श्री स्वामींशी झाली. त्यावेळी श्री स्वामी शेख नुर बाबांच्या दर्ग्यात होते. सुंदरा बाईंनी श्री स्वामींना शंकररावांची ब्रह्म समंधाची बाधा दूर करण्यासाठी विनंती करताक्षणी, श्री स्वामी उठले आणि नुकत्याच खोदलेल्या कबरीत छाटि टाकून निजले. तेव्हा एका सेवेकर्याने शंकररावांना सांगितले की, श्री स्वामींनी लीला करून तुमचे मरण चुकवले.

श्री स्वामींनी शंकररावांना कडु लिंबाच्या पाल्यामध्ये दहा मिरे वाटून, ते औषध नियमीत घेण्यास सांगितले व तुझी समंध बाधा दूर होईल असे सांगितले. तेव्हा शंकररावांनी तेथील फकिरांना आणि जनतेला अन्नदान केले. व शेख नुर साहेबांना एक कफनी चढवली.

काही दिवसातच शंकररावांची समंध बाधा आणि व्याधीतून मुक्तता झाली. पुढे काही काळानंतर शंकरराव श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले. व श्री स्वामींना आपल्या व्याधीतून मुक्तता झाल्यानंतर दहा हजार रूपये देण्याच्या संकल्पा बद्दल सांगितले.

          तेव्हा सुंदरा बाईस पैसे देऊ नये, असे श्री स्वामींनी शंकररावांना सांगितले. त्या पैशातूनच गावाबाहेर एक चुनेगच्ची मठ भक्तांच्या संगनमताने बांध. अशी आज्ञा शंकररावांना श्री स्वामींनी दिली. हाच मठ आज राजेराय मठ म्हणून अक्कलकोटात प्रसिद्ध आहे.
          आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या नवव्या अध्यायाची समाप्ती होते.

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय नववा देत आहोत.

अध्याय नववा

श्रीगणेशाय नम:।
घरोघरीं स्वामीकीर्तनें। नित्य होतीं ब्राह्मण-भोजनें।
स्वामी नामाचीं जप ध्यानें। अखंडीत चालतीं ॥1॥

दिगंतरीं गाजली ख्याती। कामना धरोनी चित्तीं।
बहुत लोक दर्शना येती। अक्कलकोट नगरांत ॥2॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक। शूद्र आणि अनामिक।
पारसी यवन भाविक। दर्शना येती धांवोनी ॥3॥

यात्रेची गर्दी भारी। सदा आनंदमय नगरी।
साधु संत ब्रह्मचारी। फकीर संन्यासी येती पैं ॥4॥

किती वर्णावें महिमान। जेथें अवतरलें परब्रह्म।
ते नगरीं वैकुंठधाम। प्रत्यक्ष भासूं लागली ॥5॥

असो ऐशा नगरांत। शंकरराव प्रवेशत।
आनंदमय झाले चित्त। समाधान वाटलें ॥6॥

जे होते स्वामीसेवक। त्यांत सुंदराबाई मुख्य।
स्वामीसेवा सकळिक। तिच्या हस्तें होतसे ॥7॥

व्याधी दूर करावी म्हणोनी। विनंती कराल स्वामीचरणीं।
तरी आपणालागोनी। द्रव्य कांहीं देईन ॥8॥

बाईसी द्रव्यलोभ पूर्ण। आनंदलें तियेचें मन।
म्हणे मी इतुकें करीन। दोन सहस्र रुपये द्याल कीं ॥9॥

ते म्हणती बाईसी। इतुकें कार्य जरी करिसी।
तरी दहा सहस्र रुपयांसी। देईन सत्य वचन हें ॥10॥

बाई विस्मित झाली अंतरीं। ती म्हणे हें सत्य जरी।
तरी उदक घेउनी करीं। संकल्प आपण सोडावा ॥11॥

शंकरराव तैसें करिती। बाई आनंदली चित्तीं।
म्हणे मी प्रार्थूनिया स्वामींप्रती। कार्य आपुलें करीन ॥12॥

बार्ई स्वामींसी बोले वचन। हे गृहस्थ थोर कुलीन।
परी पूर्वकर्में यांलागून । ब्रह्मसमंध पीडितो ॥13॥

तरी आतां कृपा करोनी। मुक्त करावें व्याधीपासोनी।
ऐसें ऐकतां वरदानीं। समर्थ तेथोनी ऊठले ॥14॥

यवनस्मशानभूमींत। आले यतिराज त्वरित।
एका नूतन खांचेंत। निजले छाटी टाकोनी ॥15॥

सेवेकरी शंकररावांसी। म्हणती लीला करुनी ऐशी।
चुकविलें तुमच्या मरणासीं। निश्चय मानसीं धरावा ॥16॥

शंकररावें तया दिवशीं। खाना दिधला फकिरांसी।
आणि शेखनुर दर्ग्यासी। एक कफनी चढविली ॥17॥

मग कांहीं दिवस लोटत। स्वामीराज आज्ञापित।
बारीक वांटुनी निंबपत्र। दहा मिरें त्यांत घालावीं ॥18॥

तें घ्यावें हो औषध। तेणें जाईल ब्रह्मसमंध।
जाहल्या स्वामीराज वैद्य। व्याधी पळे आपणची ॥19॥

प्रकृतीसी आराम पडला। राव गेले स्वनगराला।
कांहीं मास लोटता तयांला। ब्रह्मसमंधें सोडिलें ॥20॥

मग पुन्हा आनंदेसी। दर्शना आले अक्कलकोटासी।
घेउनी स्वामीदर्शनासी। आनंदित जाहले ॥21॥

म्हणती व्याधी गेल्यानंतर। रुपये देईन दहा सहस्र।
ऐसा केला निर्धार। त्याचें काय करावें ॥22॥

महाराज आज्ञापिती। गांवाबाहेर आहे मारुती।
तेथें चुनेगच्ची निश्चिती। मठ तुम्हीं बांधावा ॥23॥

ऐशिया एकांत स्थानीं। राहणार नाहीं कोणी।
ऐसी विनंती स्वामीचरणीं। कारभारी करिताती ॥24॥

सर्वांनुमतें तेथेंची। मठ बांधिला चुनेगच्ची।
किर्ती शंकररावांची। अजरामर राहिली ॥25॥

इति श्री स्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत भाविक भक्त। नवमोध्याय गोड हा ॥26॥

श्रीस्वामीराजार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामी समर्थ

Shri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 8

Shri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 8

Shri Swami Samarth

Shri Swami Samarth, my greetings to the all devotees of swami. Today we are going to know about Shri Swami Charitra Saramrit Chapter Eighth.

In the last chapter of our seventh episode, Shri Swami, Vishnu Buva Brahmachari’s vain pride was lost, or the story of the subject has come. In this chapter, the story of Shankarrao Rajerai Bahadur has been described.

Just as the people of Akkalkot, devoted themselves to the feet of Shri Swaminji, in the same way the people of other provinces also devoted themselves to the feet of Shri Swaminji. Shankarrao Rajeray Bahadur, who was an office bearer of the then Nizamshahi Rajwati, rich in grains and drying, used to suffer from the disease of Brahma Samandha.

It was difficult for Shankar Rao to wake up because of the problems caused by his past deeds. Shankar Rava had immense wealth and a lot of wealth spent to get rid of the problems of Shankar Rava, who was unhappy. He did many rituals, food donation, Brahmin sacrifices, charity, but nothing worked. Due to the problem of Brahma Samandha, his body got many diseases and his body became black.

Is destiny a worthy good man who can remove the accumulations of the past? Will be free from any other disease? Such thoughts would always be their constant sheep.

Being an ardent devotee of Shri Dattaguru, Shankarrao came to Gangapur along with his beloved wife to serve Dattaguru and to get rid of ailments. And started serving Duttaguru day and night. After turning back three months, after serving for some more time, a Brahmin came in the dream of Shankarrao and said go to Akkalkot and served Shri Swami. But Shankarrav knew nothing about Sri Swami, so he stayed at Gangapur.

After a few days, there was an instance of Shankar Raava once again to going to Akkalkotas . That’s why Shankarrao went to Akkalkot from Gangapur, keeping his beloved wife together. And here the eighth chapter of Shri Swami Charitra Saramrut would have ended.

shr Swami Samarth, Jai Jai Swami Samarth

Along with this, we are giving original eighth chapter of shree Swami charitra Saramrit.

अध्याय आठवा

श्रीगणेशाय नम:।
जयजयाजी सुखधामा। जयजयाजी परब्रह्मा।
जयजय भक्तजन विश्रामा। अनंतवेषा अनंता ॥1॥

राजे निजाम सरकार। त्यांचे पदरीं दप्तरदार।
राजे रायबहाद्दर। शंकरराव नामक ॥2॥

सहा लक्षांची जहागिर त्यांप्रती। सकल सुखें अनुकूल असतीं।
विपुल संपत्ती संतती। कांहीं कमती असेना ॥3॥

परी पूर्व कर्म अगाध। तयां लागला ब्रह्मसमंध।
उपाय केले नानाविध। परी बाधा न सोडी ॥4॥

समंध-बाधा म्हणोन। चैन न पडे रात्रंदिन।
गेलें शरीर सुकोन। गोड न लागे अन्नपाणी ॥5॥

नावडे भोग विलास। सुखोपभोग कैंचा त्यांस।
निद्रा नयेची रात्रंदिवस। चिंतानलें पोळले ॥6॥

केलीं कित्येक अनुष्ठानें। तैशींच ब्राह्मण संतर्पणें।
बहुसाल दिधलीं दानें। आरोग्य व्हावें म्हणोनी ॥7॥

विटले संसारसौैख्यासी। त्रासले या भव यात्रेसी।
कृष्णवर्ण आला शरीरासी। रात्रंदिन चैन नसे ॥8॥

कोणालागीं जावें शरण। मजवरी कृपा करील कोण।
सोडवील व्याधीपासोन। ऐसा कोण समर्थ ॥9॥

मग केला एक विचार। प्रसिद्ध क्षेत्र श्रीगाणगापूर।
तेथें जाउनी अहोरात्र। दत्तसेवा करावी ॥10॥

सेवा केली बहुवस। ऐसे लोटलेे तीन मास।
एके रात्रीं तयांस। स्वप्नीं दृष्टांत जाहला ॥11॥

अक्कलकोटीं जावें तुवां। तेथें करावी स्वामीसेवा।
यतीवचनीं भाव धरावा। तेणें व्याधी जाय दूरी ॥12॥

तरी ते तेथेंची राहिले। आणखी अनुष्ठान आरंभिलें।
पुन्हा तयासी स्वप्न पडलें। अक्कलकोटीं जावें त्वां ॥13॥

हें जाणोनी हितगोष्टी। मानसीं विचारुनि शेवटीं ।
त्वरीत आले अक्कलकोटीं। प्रियपत्नीसहीत ॥14॥

तया नगरीच्या नरनारी। कामधंदा करितां घरी।
स्वामीचरित्र परस्परीं। प्रेमभावें सांगती ॥15॥

कित्येक प्रात:स्नानें करोनी। पूजाद्रव्य घेवोनी।
अर्पावया समर्थचरणीं। जाती अती त्वरेनें ॥16॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत प्रेमळ भक्त। अष्टमोध्याय गोड हा ॥17॥

श्रीस्वामीचरणारविंदार्पणमस्तु ॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृते
अष्टमोऽध्याय: ॥ श्रीरस्तु॥

In a few days, we will start a blog on the true experiences of Swami devotees. And those who have experienced, We will write their name in the blog. Please mail your experiences to us as soon as possible. Our email address is rajesh.kamble01@gmail.com And soon we will meet through new article till then all the devotees of Swami,

Shri Swami Samarth ||

Shri Swami Samarth

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ८

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  ८

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय आठवा या बद्दल जाणून घेणार आहोत.

मागील अध्यायात आपण पाहीले की, श्री स्वामींनी विष्णु बुवा ब्रम्हचारी यांचा वृथाभिमान कसा हरन केला, या विषयीचा कथाभाग आला आहे. या अध्यायामध्ये शंकरराव‌ राजेराय बहाद्दूर यांची कथा वर्णन केली आहे.

जसे अक्कलकोटची जनता श्री स्वामींच्या चरणी भक्तीस लागली, त्याप्रमाणेच आजुबाजूच्या इतर प्रांतातील जनताही श्री स्वामींच्या चरणी भक्तीस लागली. तत्कालीन निजामशाही राजवटीत दफ्तरदार असलेले, धन धान्याने व सुखाने संपन्न असे शंकरराव राजेराय बहाद्दूर ब्रह्म समंधाच्या व्याधीने ग्रस्त होते.

पुर्व कर्मामुळे झालेल्या समंध बाधेने शंकररावांचे जगणं मुश्कील झाले. शंकररावांकडे अमाप संपत्ती आणि सहा लक्षांची जहागीरी असताना देखील, दुःखी असलेल्या शंकररावांनी समंध बाधेतून मुक्त होण्यासाठी बरेच धन दौलत खर्च कली. अनेक अनुष्ठाने, अन्नदान, ब्राह्मण संतर्पने केली, दानधर्मही केले पण काहीच फायदा झाला नाही. ब्रह्म समंधाच्या बाधेमुळे त्यांच्या शरीरास अनेक व्याधी जडल्या आणि शरीर काळवंडले.

नियतीने लिहीलेले पुर्व संचित दूर करणारा योग्य सत्पुरुष भेटेलका? आणि या व्याधीतून आपली मुक्तता होईल का? असे विचार सतत त्यांच्या मनाला भेडसावत होते.

शंकरराव श्री दत्तगुरूंचे परमभक्त होते म्हणून दत्तगुरूंची सेवा करण्यासाठी आणि व्याधीतून मुक्त होण्यासाठी ते प्रिय पत्नी सहीत गाणगापूरला आले. आणि अहोरात्र दत्त सेवा करू लागले.
तीन महिन्यांचा काळ उलटल्यानंतर आणखी काही काळाची सेवा केल्यानंतर शंकररावांच्या स्वप्नात एक ब्राम्हण आला आणि अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी सेवा करा असा दृष्टांत झाला.
पण शंकररावांना श्री स्वामीं बद्दल काहीच ठाऊक नव्हते म्हणून ते गाणगापूरातच राहिले.

काही दिवसांनी पुन्हा एकदा शंकररावांना अक्कलकोटास जावे असा दृष्टांत झाला. त्यामुळे आपल्या प्रिय पत्नीशी संगनमत करून शंकरराव गाणगापूरहून अक्कलकोटला निघाले. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या आठव्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ

सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय आठवा देत आहोत.

अध्याय आठवा

श्रीगणेशाय नम:।
जयजयाजी सुखधामा। जयजयाजी परब्रह्मा।
जयजय भक्तजन विश्रामा। अनंतवेषा अनंता ॥1॥

राजे निजाम सरकार। त्यांचे पदरीं दप्तरदार।
राजे रायबहाद्दर। शंकरराव नामक ॥2॥

सहा लक्षांची जहागिर त्यांप्रती। सकल सुखें अनुकूल असतीं।
विपुल संपत्ती संतती। कांहीं कमती असेना ॥3॥

परी पूर्व कर्म अगाध। तयां लागला ब्रह्मसमंध।
उपाय केले नानाविध। परी बाधा न सोडी ॥4॥

समंध-बाधा म्हणोन। चैन न पडे रात्रंदिन।
गेलें शरीर सुकोन। गोड न लागे अन्नपाणी ॥5॥

नावडे भोग विलास। सुखोपभोग कैंचा त्यांस।
निद्रा नयेची रात्रंदिवस। चिंतानलें पोळले ॥6॥

केलीं कित्येक अनुष्ठानें। तैशींच ब्राह्मण संतर्पणें।
बहुसाल दिधलीं दानें। आरोग्य व्हावें म्हणोनी ॥7॥

विटले संसारसौैख्यासी। त्रासले या भव यात्रेसी।
कृष्णवर्ण आला शरीरासी। रात्रंदिन चैन नसे ॥8॥

कोणालागीं जावें शरण। मजवरी कृपा करील कोण।
सोडवील व्याधीपासोन। ऐसा कोण समर्थ ॥9॥

मग केला एक विचार। प्रसिद्ध क्षेत्र श्रीगाणगापूर।
तेथें जाउनी अहोरात्र। दत्तसेवा करावी ॥10॥

सेवा केली बहुवस। ऐसे लोटलेे तीन मास।
एके रात्रीं तयांस। स्वप्नीं दृष्टांत जाहला ॥11॥

अक्कलकोटीं जावें तुवां। तेथें करावी स्वामीसेवा।
यतीवचनीं भाव धरावा। तेणें व्याधी जाय दूरी ॥12॥

तरी ते तेथेंची राहिले। आणखी अनुष्ठान आरंभिलें।
पुन्हा तयासी स्वप्न पडलें। अक्कलकोटीं जावें त्वां ॥13॥

हें जाणोनी हितगोष्टी। मानसीं विचारुनि शेवटीं ।
त्वरीत आले अक्कलकोटीं। प्रियपत्नीसहीत ॥14॥

तया नगरीच्या नरनारी। कामधंदा करितां घरी।
स्वामीचरित्र परस्परीं। प्रेमभावें सांगती ॥15॥

कित्येक प्रात:स्नानें करोनी। पूजाद्रव्य घेवोनी।
अर्पावया समर्थचरणीं। जाती अती त्वरेनें ॥16॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत प्रेमळ भक्त। अष्टमोध्याय गोड हा ॥17॥

श्रीस्वामीचरणारविंदार्पणमस्तु ॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृते
अष्टमोऽध्याय: ॥ श्रीरस्तु॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामी समर्थ

Shri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 7

Shri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 7

Shree Swami Samarth

Shree Swami Samarth, my salutations to all Swami devotees. Today we are going to learn about Sri Swami Charitra Saramrit Chapter 7.

Maloji Raje, the king of Akkalkot, had extraordinary devotion to Sri Swami. He was always engrossed in service and devotion to Sri Swami. The Maloji kings were very religious. He was very fond of listening to discussions on Vedanta in his Raj Sabha. For this reason, he hired learned Shastri Buas like Herlikar as Vedanta tutors.

At that time, Vishnu Buva Brahmachari, who gave public lectures on Vedanta in Mumbai, became very famous. He had defeated many proselytizers in debates and gained fame by creating awareness about Hinduism in the public mind.

When his fame reached Akkalkot, Maloji Raja invited him to Akkalkot. Vishnu Buva Brahmachari came to Akkalkota and started giving sermons and lectures on Vedanta in the palace. Everyone in the Raj Sabha was filled with joy after listening to these scholarly lectures of Vishnu Buva.

That’s how Buwa came to know about Sri Swami. And he became eager to meet Sri Swami. After a few days, Vishnu Buwa met Sri Swami. But Vishnu Bua got a feeling that these must be some fake sadhus, so Vishnu Bua did not show much interest.

An option came to mind about the incarnation of Sri Swami. And to Sri Swami ‘What is Brahma Tadakara Vritti?’ Asked that question. But Sri Swami did not give any answer to Vishnu Bua. And looking at Vishnu Bua, Sri Swami just kept smiling. Seeing this, Vishnu Buwa got angry and left.

That night Bua had a dream. In the dream, many scorpions were seen climbing on the body of Vishnu Bua. From it, they saw a huge, terrible poisonous scorpion approaching to bite. And their faces turned pale in fear.

The next day, Vishnu Buva again met Sri Swami, and again asked the previous question. Then Sri Swami reminded Vishnu Bua of the dream he had last night. And said, “Brahma Tadakar vritti has fallen on the way?”

Knowing Sri Swami’s insight, Vishnu Buva repented. And he took refuge in Sri Swami. Freed from pride, Vishnu Buwa later became worthy of Brahmapada by the grace of Sri Swami. And became a big devotee of Sri Swami. And here ends the seventh chapter of Sri Swami Charitra Saramrita.

Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth.

Along with this we are giving you the seventh chapter of original Swami charitra Saramrita.

अध्याय सातवा

श्रीगणेशाय नम:।
जयजयाजी निर्गुणा। जयजयाजी सनातना।
जयजयाजी अघहरणा। लोकपाला सर्वेशा ॥1॥

अक्कलकोटीं मालोजी नृपती। समर्थचरणीं जयांची भक्ती।
स्वहस्तें सेवा नित्य करिती। जाणोनि यती परब्रह्म ॥2॥

वेदांत आवडे तयासी। श्रवण करिती दिवसनिशीं।
हेरळीकरादिक शास्त्र्यांसी। वेतनें देउनी ठेविलें ॥3॥

त्या समयीं मुंबापुरीं। विष्णुबुवा ब्रह्मचारी।
प्राकृत भाषण वेदांतावरी। करुनी लोकां उपदेशिती ॥4॥

त्यांसी आणावें अक्कलकोटीं। हेतु उपजला नृपा पोटीं।
बहुत करोनी खटपटी। बुवांसी शेवटीं आणिलें ॥5॥

रात्रंदिन नृपमंदिरीं। वेदांतचर्चा ब्रह्मचारी।
करिती तेणें अंतरीं। नृपती बहु सुखावे ॥6॥

ख्याती वाढली लोकांत। स्तुती करिती जन समस्त।
सदा चर्चा वेदांत। राजगृहीं होतसे ॥7॥

एके दिवशीं सहज स्थिती। ब्रह्मचारी दर्शना येती।
श्रेष्ठ जन सांगाती। कित्येक होते तया वेळीं ॥8॥

पहावया यतीचें लक्षण। ब्रह्मचारी करिती भाषण।
कांहीं वेदांतविषय काढून। प्रश्न करिती स्वामींसी ॥9॥

ब्रह्मपद तदाकार। काय केल्यानेंं होय निर्धार।
ऐसे ऐकोनि सत्वर। यतिराज हासले ॥10॥

मुखें कांहीं न बोलती। वारंवार हास्य करिती।
पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती। बुवा म्हणती काय मनीं ॥11॥

हा तो वेडा संन्यासी। भुरळ पडली लोकांसी।
लागले व्यर्थ भक्तीसी। यानें ढोंग माजविलें ॥12॥

तेथोनी निघाले ब्रह्मचारी। आले सत्वर बाहेरी।
लोकां बोलती हास्योत्तरीं। तुम्ही व्यर्थ फसलां हो ॥13॥

पाहोनी तुमचे अज्ञान। यांचें वाढलें ढोंग पूर्ण।
वेदशास्त्रादिक ज्ञान। यांतें कांहीं असेना ॥14॥

ऐसे ब्रह्मचारी बोलोनी। पातले आपुल्या स्वस्थानीं।
विकल्प पातला मनीं। स्वामीसी तुच्छ मानिती ॥15॥

नित्यनियम सारोन। ब्रह्मचारी करिती शयन।
जवळी पारशी दोघेजण। तेही निद्रिस्थ जाहले ॥16॥

निद्रा लागली बुवांसी। लोटलीया कांहीं निशी।
एक स्वप्न तयांसी। चमत्कारिक पडलेंसे ॥17॥

आपुल्या अंगावरी वृश्चिक। एकाएकीं चढलें असंख्य।
महा विषारी त्यांतुनी एक। दंश आपणा करीतसे॥18॥

ऐसें पाहोनी ब्रह्मचारी। खडबडोनी उठले लौकरी।
बोबडी पडली वैखरी। शब्द एक न बोलवे ॥19॥

जवळी होते जे पारशी। जागृती आली तयांसी।
त्यांनीं धरोनी बुवांसी। सावध केलें त्या वेळीं ॥20॥

मग स्वप्नींचा वृत्तांत। तयांसी सांगती समस्त।
म्हणती यांत काय अर्थ। ऐसीं स्वप्नें कैक पडतीं ॥21॥

असो दुसर्‍याच दिवशीं। बुवा आले स्वामींपाशी।
पुसतां मागील प्रश्नासी। खदखदां स्वामीं हासले ॥22॥

मग काय बोलती यतीश्वर। ब्रह्मपद तदाकार।
होण्याविषयीं अंतर। तुझें जरी इच्छितसे ॥23॥

तरी स्वप्नीं देखोनी वृश्चिकांसी। काय म्हणोनी भ्यालासी।
जरी वृथा भय मानितोसी। मग ब्रह्मपद जाणसी कैसें ॥24॥

ब्रह्मपद तदाकार होणें। हें नव्हे सोपें बोलणें।
यासी लागती कष्ट करणें। फुकट हातां नयेची ॥25॥

बुवांप्रती पटली खूण। धरिले तत्काळ स्वामीचरण।
प्रेमाश्रूंनी भरले नयन। कंठ झाला सददित ॥26॥

तया समयापासोनी। भक्ती जडली स्वामीचरणीं।
अहंकार गेला गळोनी। ब्रह्मपदा योग्य झाले ॥27॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत भाविक भक्त । सप्तमोध्याय गोड हा ॥28॥

श्रीराजाधिराज योगिराज श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥

In a few days we will start a blog on the true experiences of Swami devotees. And also write the name of those who experienced this in the blog. So mail us your experience as soon as possible. Our email address is, rajesh.kamble01@gmail.com So see you soon with a new article till then all

Shree Swami Samarth

Shri Swami Samarth

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ७

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  ७

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय सातवा या बद्दल जाणून घेणार आहोत.

अक्कलकोटचे राजे मालोजी राजे यांना श्री स्वामीं विषयी विलक्षण भक्ती होती. ते श्री स्वामी सेवा आणि भक्ती करण्यात नेहमी मग्न असत. मालोजी राजे फार धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना आपल्या राजसभेत वेदांत विषयी चर्चा श्रवण करण्याची फार आवड होती. या कारणाने त्यांनी हेरळीकरां सारख्या विद्वान शास्त्री बुवांना वेदांत पाठ मार्गदर्शक म्हणून वेतनावर ठेवले होते.

त्या काळी मुंबईत वेदांत विषयावर जाहीर व्याख्यान करणार्या विष्णू बुवा ब्रम्हचारी यांची फारच प्रसिद्धी झाली होती. त्यांनी अनेक परधर्म प्रचारकांना वादविवादा मध्ये हरवून जनमानसात हिंदू धर्मा बद्दल जागृती निर्माण करून नामलौकीक मिळवीला होता.

त्यांची किर्ती अक्कलकोट पर्यंत येऊन पोहोचली, तेव्हा मालोजी राजांनी त्यांना अक्कलकोटला आमंत्रित केले. विष्णु बुवा ब्रम्हचारी अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यात वेदांतावर प्रवचने आणि व्याख्याने देण्यास प्रारंभ केला. विष्णु बुवांची ही अभ्यासपूर्ण व्याख्याने ऐकून राजसभेतील सर्वजण आनंदाने भाराऊन जात.

अशातच बुवांना श्री स्वामीं बद्दल कळले. व श्री स्वामींना भेटण्याची त्यांना उत्सुकता जागृत झाली. काही दिवसांनी विष्णु बुवा श्री स्वामींना भेटले. पण विष्णु बुवांच्या मनात हे कोणी भोंदू साधू असावेत अशी भावना उत्पन्न झाली, त्यामुळे विष्णु बुवांनी फारसे स्वारस्य दाखविले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींच्या अवतारीत्वा बद्दल विकल्प आला. आणि श्री स्वामींना ‘ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारला. पण श्री स्वामींनी विष्णु बुवांना काहीच उत्तर दिले नाही. आणि विष्णु बुवांकडे पाहून श्री स्वामी फक्त स्मित हास्य करीत राहिले. हे पाहून विष्णु बुवा क्रोधित होऊन तेथून निघून गेले.

त्याच रात्री बुवांना एक स्वप्न पडले. स्वप्नात असंख्य विंचू विष्णु बुवांच्या अंगावर चढताना दिसले. त्यातून एक महा भयंकर विषारी विंचू दंश करण्यास जवळ येत असल्याचे दृष्य त्यांना दिसले. आणि भयाने त्यांची बोबडी वळली.

दुसऱ्या दिवशी विष्णु बुवांनी पुन्हा श्री स्वामींची भेट घेतली, व मागील प्रश्न पुन्हा विचारला. तेव्हा श्री स्वामींनी विष्णु बुवांना काल रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. व म्हणाले “ब्रह्म तदाकार वृत्ती अशी वाटेवर पडली आहे का?

श्री स्वामींचे अंतर्ज्ञानीत्व जाणून विष्णु बुवांना पश्चात्ताप झाला. आणि ते श्री स्वामींना शरन गेले. अभिमानातून मुक्त झालेले विष्णु बुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदास योग्य झाले. व श्री स्वामींचे मोठे भक्त झाले. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या सातव्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय सातवा देत आहोत.

अध्याय सातवा

श्रीगणेशाय नम:।
जयजयाजी निर्गुणा। जयजयाजी सनातना।
जयजयाजी अघहरणा। लोकपाला सर्वेशा ॥1॥

अक्कलकोटीं मालोजी नृपती। समर्थचरणीं जयांची भक्ती।
स्वहस्तें सेवा नित्य करिती। जाणोनि यती परब्रह्म ॥2॥

वेदांत आवडे तयासी। श्रवण करिती दिवसनिशीं।
हेरळीकरादिक शास्त्र्यांसी। वेतनें देउनी ठेविलें ॥3॥

त्या समयीं मुंबापुरीं। विष्णुबुवा ब्रह्मचारी।
प्राकृत भाषण वेदांतावरी। करुनी लोकां उपदेशिती ॥4॥

त्यांसी आणावें अक्कलकोटीं। हेतु उपजला नृपा पोटीं।
बहुत करोनी खटपटी। बुवांसी शेवटीं आणिलें ॥5॥

रात्रंदिन नृपमंदिरीं। वेदांतचर्चा ब्रह्मचारी।
करिती तेणें अंतरीं। नृपती बहु सुखावे ॥6॥

ख्याती वाढली लोकांत। स्तुती करिती जन समस्त।
सदा चर्चा वेदांत। राजगृहीं होतसे ॥7॥

एके दिवशीं सहज स्थिती। ब्रह्मचारी दर्शना येती।
श्रेष्ठ जन सांगाती। कित्येक होते तया वेळीं ॥8॥

पहावया यतीचें लक्षण। ब्रह्मचारी करिती भाषण।
कांहीं वेदांतविषय काढून। प्रश्न करिती स्वामींसी ॥9॥

ब्रह्मपद तदाकार। काय केल्यानेंं होय निर्धार।
ऐसे ऐकोनि सत्वर। यतिराज हासले ॥10

मुखें कांहीं न बोलती। वारंवार हास्य करिती।
पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती। बुवा म्हणती काय मनीं ॥11॥

हा तो वेडा संन्यासी। भुरळ पडली लोकांसी।
लागले व्यर्थ भक्तीसी। यानें ढोंग माजविलें ॥12॥

तेथोनी निघाले ब्रह्मचारी। आले सत्वर बाहेरी।
लोकां बोलती हास्योत्तरीं। तुम्ही व्यर्थ फसलां हो ॥13॥

पाहोनी तुमचे अज्ञान। यांचें वाढलें ढोंग पूर्ण।
वेदशास्त्रादिक ज्ञान। यांतें कांहीं असेना ॥14॥

ऐसे ब्रह्मचारी बोलोनी। पातले आपुल्या स्वस्थानीं।
विकल्प पातला मनीं। स्वामीसी तुच्छ मानिती ॥15॥

नित्यनियम सारोन। ब्रह्मचारी करिती शयन।
जवळी पारशी दोघेजण। तेही निद्रिस्थ जाहले ॥16॥

निद्रा लागली बुवांसी। लोटलीया कांहीं निशी।
एक स्वप्न तयांसी। चमत्कारिक पडलेंसे ॥17॥

आपुल्या अंगावरी वृश्चिक। एकाएकीं चढलें असंख्य।
महा विषारी त्यांतुनी एक। दंश आपणा करीतसे॥18॥

ऐसें पाहोनी ब्रह्मचारी। खडबडोनी उठले लौकरी।
बोबडी पडली वैखरी। शब्द एक न बोलवे ॥19॥

जवळी होते जे पारशी। जागृती आली तयांसी।
त्यांनीं धरोनी बुवांसी। सावध केलें त्या वेळीं ॥20॥

मग स्वप्नींचा वृत्तांत। तयांसी सांगती समस्त।
म्हणती यांत काय अर्थ। ऐसीं स्वप्नें कैक पडतीं ॥21॥

असो दुसर्‍याच दिवशीं। बुवा आले स्वामींपाशी।
पुसतां मागील प्रश्नासी। खदखदां स्वामीं हासले ॥22॥

मग काय बोलती यतीश्वर। ब्रह्मपद तदाकार।
होण्याविषयीं अंतर। तुझें जरी इच्छितसे ॥23॥

तरी स्वप्नीं देखोनी वृश्चिकांसी। काय म्हणोनी भ्यालासी।
जरी वृथा भय मानितोसी। मग ब्रह्मपद जाणसी कैसें ॥24॥

ब्रह्मपद तदाकार होणें। हें नव्हे सोपें बोलणें।
यासी लागती कष्ट करणें। फुकट हातां नयेची ॥25॥

बुवांप्रती पटली खूण। धरिले तत्काळ स्वामीचरण।
प्रेमाश्रूंनी भरले नयन। कंठ झाला सददित ॥26॥

तया समयापासोनी। भक्ती जडली स्वामीचरणीं।
अहंकार गेला गळोनी। ब्रह्मपदा योग्य झाले ॥27॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत भाविक भक्त । सप्तमोध्याय गोड हा ॥28॥

श्रीराजाधिराज योगिराज श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामी समर्थ