Sri Swami Charitra Saramrut English Translation Chapter 16

Sri Swami Charitra Saramrut English Translation Chapter 16

Shree Swami Samarth

Shree Swami Samarth, my salutations to all Swami devotees. Today we are going to learn about Sri Swami Charitra Saramrit Chapter Sixteen.

After offering salutations to Shri Ganesha, the poet begins to narrate the next chapter. In order to protect the devotees, Shri Dutt actually appeared on earth in the form of a yati. And that Sri Swami lived in Akkalkot for many years. At that time many devotees of Sri Swami passed away but the best devotee was Swami Suta.

Authors are narrating the biography of Swamisuta by asserting that whoever listens to this biography of Bhakta Swamisuta with full faith, all his great sins will be removed.

At that time a gentleman named Hari Bhau was living in Mumbai. This Maratha nobleman lived in Mumbai for work, but his village was Itia village in Konkan, also Rajapur taluka. His house was prosperous. And his mother and younger brother were staying with him.

While in Mumbai, Hari Bhau had a friend named Pandit. Due to bankruptcy, he was deeply in debt. While this is the case, Pandits understand about Sri Swami. Then Pandit vowed to Shri Swami that if I become debt free in eight days, I will come to Akkalkot for darshan. Seven days passed but no good news was received.

The eighth day dawned and it was as if a miracle had happened. Another friend of Haribhau was tired of life due to debt. That friend’s name was Gajanan. He had invested all his money in shares in the opium trade. Gajanana suffered huge losses due to falling shares.

Then Haribhau and Gajanan meet the Pandit and tell the whole truth to the Pandit. Then Pandit says there is no doubt that I too have incurred a lot of debt. And if confiscation comes, our dignity will be destroyed.

Pandita did a trick, wrote on the pedhi that he was the owner of both of them. Both agreed to it and then the news of the increase in the share price reaches the ears of the three. And they become rich after paying off all their debts.

Pandit then tells Haribhau and Gajanana the reality of their vows to Sri Swami. They tell Haribhau and Gajanana that it is by Sri Swami’s grace that they are debt free and now they want to go to Akkalkot for Sri Swami’s darshan. And all three of them come to Akkalkot to see Sri Swami.

On reaching Akkalkot all the three meet Sri Swami. They worship Sri Swami with devotion. Then Shri Swami calls Gajanana as Shiva, Pandita as Ram and Haribhau as Maruti. And he sanctifies the three by chanting mantras. Bless their lives.

Shri Swami gave the mantra to Haribhau, ‘Gurur Brahma Gurur Vishnu Gurur Devo Maheshwara | Gurur Sakshat Parabrahma Tasmai Shri Gurvai Namah|| And he is ecstatic. Also, Shri Swami gives the mantra to Gajanana, ‘Akashat patitan toyam yatha gachchati sagaram | Sarva devo namskaraha Kesavam Prati Gachhati || And Gajanan also becomes happy after hearing the mantra. And also calling the pandits near, Sri Swami sanctifies them with the mantra, Idmeva Shivam Idmeva Shivam | Idmeva Shivam Idmeva Shiva: ||

Haribhau, Pandit and Gajanan bring three hundred rupees Dakshina with them when they come to see Sri Swami. And asks Sri Swami what to do about it. Then Shri Swami orders to make silver shoes with that money. This is why Hari Bhau becomes obsessed with Sri Swami. Haribhau starts coming to Akkalkot frequently. He enjoyed serving Sri Swami.

Later Shri Swami, started to consider Haribhau as his Son. Shri Swami ordered Haribhau to rob his life and possessions and put tulsi leaves on the house and asked him to wear saffron clothes. Haribhau does so and donates all his ornaments to his wife by giving her white clothes. Later, Shri Swami established a Math at Girgaon, Sea face in Mumbai. And engages oneself wholeheartedly in the service of Sri Swami.

Thus the author concludes the sixteenth chapter of Sri Swami Charitra Saramrita by narrating the biography of Swamisuta. Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth ||

In a few days we will start a blog on the true experiences of Swami devotees. And also write the name of those who experienced this in the blog. So mail us your experience as soon as possible. Our email address is, rajesh.kamble01@gmail.com So see you soon with a new article till then to all Swami devotees

Sri Swami Samarth ||

Shree Swamisut ( Haribhau)

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १६

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १६

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय सोळावा या बद्दल जाणून घेणार आहोत.

श्री गणेशाला वंदन करून ग्रंथकार पुढील अध्याय कथन‌ करण्यास प्रारंभ करतात. भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी साक्षात श्री दत्त यतीरूप घेऊन भूवरी प्रकट झाले. आणि श्री स्वामींनी अनेक वर्षे अक्कलकोटात वास केला. त्या काळी श्री स्वामींचे अनेक भक्त होऊन गेले पण त्यात सर्वश्रेष्ठ भक्त हे स्वामी सुत होते.

जो कोणी भक्त स्वामीसुतांचे हे चरित्र संपूर्ण श्रद्धेने श्रवण करील त्याचे सर्व महादोष लयास जातील, असे ठामपणे प्रतिपादन करून ग्रंथकार स्वामीसुतांचे चरीत्र कथन करीत आहेत.

त्या काळी हरीभाऊ नावाचे एक सद्गृहस्थ मुंबईत रहात होते. हे मराठा सद्गृहस्थ मुंबईस नोकरी साठी वास्तव्यास होते, परंतु त्यांचे गाव हे कोकणातील, तसेच राजापूर तालुक्यातील इटीया गाव हे होते. त्यांचे घर सुसंपन्न होते. आणि सोबत त्यांची आई आणि लहान भाऊ रहात होते.

मुंबई मध्ये असताना हरीभाऊंना एक पंडित नावाचा मित्र होता. दिवाळखोरी आल्यामुळे तो पार कर्जात बुडाला होता. असे असताना पंडितांना श्री स्वामीं विषयी समजते. तेव्हा मनात भाव धरुन पंडित श्री स्वामींना नवस करतात, की आठ दिवसात जर मी कर्जमुक्त झालो तर दर्शनाला अक्कलकोटला येईन. असे सात दिवस पालटले पण कोणतीच सुवार्ता मिळाली नाही.

आठवा दिवस उजाडला आणि जणू काही चमत्कारच झाला. हरीभाऊंचा आणखी एक मित्र कर्जबाजारी होऊन जीवनाला कंटाळला होता. त्या मित्राचे नाव गजानन असे होते. त्याने आपले सारे पैसे अफूच्या व्यापारातील शेअर्स मध्ये गुंतवले होते. शेअर्स घसरल्याने गजाननाला फार मोठे नुकसान झाले.

तेव्हा हरीभाऊ आणि गजानन पंडितांची भेट घेतात व सारी हकीकत पंडिताला सांगतात. तेव्हा पंडित म्हणतात मलाही फार कर्ज झाले आहे यात काही शंका नाही. आणि जर जप्ती आली तर आपल्या इज्जतीचे धिंडवडे निघतील.

पंडिताने एक युक्ती केली, त्या दोघांचे मालक आपण आहोत असे पेढीवर लिहून दिले. उभयतांनी ते मान्य केले आणि तेवढ्यात शेअर्सचे भाव वाढल्याची वार्ता त्या तिघांच्या कानी पडते. आणि त्यांचे सर्व कर्ज‌ फिटून ते श्रीमंत होतात.

तेव्हा पंडित हरीभाऊंना आणि गजाननाला श्री स्वामींना केलेल्या नवसाची हकीकत सांगतात. श्री स्वामींच्या कृपेनेच आपण कर्जमुक्त झालोत आणि आता आपल्याला श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचे आहे, असे हरीभाऊला आणि गजाननाला सांगतात. आणि ते तिघेही श्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला येतात.

अक्कलकोटला आल्यावर तिघेही श्री स्वामींची भेट घेतात. श्री स्वामींचे दर्शन घेऊन ते भक्ती भावाने पुजन करतात. तेव्हा श्री स्वामी गजाननाला शिव, पंडिताला राम आणि हरीभाऊस मारूती अशी हाक मारून जवळ‌ बोलावतात. आणि त्या तिघांना मंत्र देऊन त्यांना पावन करतात. त्यांचे जीवन धन्य करतात.

हरीभाऊला श्री स्वामींनी मंत्र दिला तो असा, ‘ गुरूर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा | गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवै नमः|| आणि त्याला‌ परमानंद होतो. तसेच गजाननालाही श्री स्वामी मंत्र देतात तो असा, ‘आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम् | सर्व देव नमस्कार: केशवं‌ प्रती गच्छति || आणि मंत्र ऐकून गजाननही आनंदी होतो. आणि तसेच पंडितालाही‌ जवळ बोलावून श्री स्वामी मंत्र देऊन पावन करतात, इद्मेव शिवम् इद्मेव शिवम् | इद्मेव शिवम् इद्मेव शिव: ||

हरीभाऊ, पंडित आणि गजानन श्री स्वामींच्या दर्शनाला येताना सोबत तीनशे रूपये दक्षिणा घेऊन येतात. आणि याचे काय करावे म्हणून श्री स्वामींस विचारतात. तेव्हा श्री स्वामी त्या पैशांनी चांदीच्या पादुका बनवून आणण्याची आज्ञा करतात.

यातूनच हरीभाऊंना श्री स्वामींचा ध्यास लागतो. हरीभाऊ वारंवार अक्कलकोटला येऊ लागतात. श्री स्वामी सेवेत त्यांना परमानंद प्राप्त होत असे.

पुढे श्री स्वामी हरीभाऊंना आपला सुत मानू लागले. श्री स्वामींनी हरीभाऊंना आपला संसार आणि प्रपंच लुटवून घरावर तुळशीपत्र ठेवायची आज्ञा केली आणि भगवी वस्त्रे परिधान करण्यास सांगितले. हरीभाऊ तसे करतात आणि आपल्या पत्नीला पांढरी वस्त्रे देवून तिचे सर्व अलंकार दान करतात. पुढे श्री स्वामी आज्ञेनेच मुंबईतल्या सागर किनारी म्हणजेच गिरगावात मठाची स्थापना करतात. आणि स्वतःला मनोभावे श्री स्वामींच्या सेवेत रूजू करतात.

अशाप्रकारे ग्रंथकाराने स्वामीसुतांच्या चरित्राचे कथन करीत श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या सोळाव्या अध्यायाची समाप्ती केली आहे.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामीसुत (हरीभाऊ)

Sri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 15

Sri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 15
Shree Swami Samarth

Shree Swami Samarth, my salutations to all Swami devotees. Today we are going to learn about Sri Swami Charitra Saramrita Chapter 15.

Pilgrimage, insisting on the means of hatha yoga, even if properly versed in the Vedas and sciences, even if one devotes himself to Sri Swami only with pure and absolute spirit, even if he devotes himself to Sri Swami’s soul, one achieves all four purusharthas. We are freed from sin, fever and misery. One can reach the path of salvation by crossing the ocean of existence. If we do good deeds and good conduct, Sri Swami grants us salvation and opens the gate of heaven.

If we chant Naamsmaran regularly, we are freed from the cycle of birth and death. This should always be in your mind. With this guide, the librarian starts the next chapter.

Sri Swami never stayed in one place for long. He visited all the nearby villages and listened to the chants of his devotees. And used to relieve the sufferings of his devotees by giving them proper guidance and even performing miracles if necessary.

Once Sri Swami came to Mangalvedha and Sri Swami was sleeping on the ground with a bed of thorns. In the same village there lived a poor man named Basappa Teli. And looking for Sarpan to light the hearth in the house, Basappa reaches where Sri Swami was sleeping.

A thorn sticks in Basappa’s leg while reaching Sri Swami. While removing the thorn from his leg, Basappa’s eyes fell on Sri Swami lying on the thorn bed. And Basappa thought that, ‘If this thorn pierced us so much, we would have felt so much pain and slept on the thorns in this digambara state. Surely he must be a good man.’ Then Shri Swami shouts at Basappa and says ‘What do you want to do whether we are good men or anyone else?’

Basappa is shocked to hear this and again says in his mind, ‘oh god, these are also Mind listener.’ Then Shri Swami shouts at Basappa, ‘If we are not mind listener, how come you have someone else in the trouble. Let’s go.’ Hearing this, Basappa is convinced that Sri Swami is not an ordinary person but a human form of God himself.

Later, Basappa became an ardent devotee of Sri Swami. He was so absorbed in the service of Sri Swami that sometimes he did not even remember his wife and children. The innocent villagers of the village think that Sri Swami is crazy because of his boyish demonic attitude. Therefore, the villagers and his wife used to insult Basappa as he was ruining his world by following the footsteps of this crazy Maharaj. However, Basappa did not stop serving Sri Swami.

Basappa did not know when it was evening when Sri Swami was doing seva for one such day. Then Shri Swami said to Basappa ‘Go home your wife is calling in my name. Your children are starving’. But Basappa was not being spared by Sri Swamy Charan. Basappa kept pressing Sri Swami’s feet.

Then Sri Swami gets up and starts walking fast, towards the forest. Shri Swami’s walking speed was such that Basappa had to run after Shri Swami. Seeing that Basappa was coming to serve instead of going home, again Basappa was asked by Sri Swami to go home. But Basappa did not listen.

Basappa did not know that we followed Sri Swami and reached the middle of the forest. It was pitch dark. And in that darkness, Basappa’s foot meets a snake and Basappa comes to his senses. And there were many snakes crawling around.

Then Shri Swami lovingly said to Basappa, ‘ Take, as much as you want, your poverty is over from today. Don’t hesitate.’
Then Basappa picks up a snake in fear and wraps it in a cloth. And reaches a shrine with Sri Swami.

When Basappa opens the cloth sitting on the altar of the temple, the snake hides and is replaced by a golden snake. Thus Sri Swami gives him the fruits of Basappa’s unwavering devotion for so many days. And remove his poverty. Later, Sri Swami bids farewell to Basappa, telling him to be merciful.

This is how Sri Swami brought about Basappa’s fortune. At the end of this wonderful story, the author foreshadows that in the next chapter we will narrate the story of Sri Swamisuta. And here ends the fifteenth chapter of Sri Swami Charitra Saramrita.
Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth

In a few days we will start a blog on the true experiences of Swami devotees. And also write the name of those who experienced this in the blog. So mail us your experience as soon as possible. Our email address is, rajesh.kamble01@gmail.com
So see you soon with a new article till then to all Swami devotees

Sri Swami Samarth ||

Shree Swami Samarth

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १५

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय १५

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय पंधरावा या बद्दल जाणून घेणार आहोत.

तीर्थयात्रा करणे, हठयोग आदी साधनांचा आग्रह धरणे, वेदाभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य रीतीने अवगत असले तरीही, केवळ निस्सीम आणि निरपेक्ष भावनेने जरी श्री स्वामींची मनोभावे भक्ती केली तरी चारी पुरूषार्थाची प्राप्ती होते. पाप, ताप, दैन्य यांपासून आपण मुक्त होतो. प्रपंचाचा सागर पार करून मोक्षाच्या पैलतीर गाठता येतो. आपल्या हातून योग्य कर्म आणि योग्य आचरण घडल्यास श्री स्वामी आपल्याला मोक्ष प्रदान करून, स्वर्ग मुखाचे द्वार खोलून देतात.

          आपण जर नित्यनेमाने नामस्मरण करत असाल‌ तर, आपली जन्म मृत्यूच्या फेर्यातुन मुक्तता होते. हे नेहमी आपल्या स्मरणात असावे. असे मार्गदर्शन करुन ग्रंथकार पुढील अध्यायास  प्रारंभ करतात.

श्री स्वामी कधीच फार काळ एका ठिकाणी थांबत नसत. आसपासच्या सर्व गावांना ते भेट देऊन आपल्या भक्तांची गार्हाणी ऐकत. आणि आपल्या भक्तांना योग्य मार्गदर्शन करून तसेच जरूरी असल्यास चमत्कार करूनही दुःख मुक्त करीत असत.

असेच एकदा श्री स्वामी मंगळवेढा येथे आले आणि श्री स्वामी काट्या कुट्यांची शय्या करून जमीनीवर निजले होते. त्याच गावात बसप्पा तेली नावाचा एक दरिद्री इसम रहात होता. आणि घरात चुल पेटवण्यासाठी सरपन शोधत शोधत बसप्पा, जिथे श्री स्वामी निजले होते तिथे येऊन पोहोचतो.

श्री स्वामींजवळ पोहोचताना बसप्पाच्या पायात काटा रूततो. पायातून काटा काढत असतानाच बसप्पाची नजर कंटक शय्येवर निजलेल्या श्री स्वामींवर पडते. आणि बसप्पाच्या मनात विचार येतो की, ‘आपल्याला हा एवढासा काटा रूतला तर आपण इतके हळहळलो आणि हे दिगंबर अवस्थेत काट्यांवर झोपलेत. नक्किच हे कोणी सत्पुरुष असावेत.’ तेवढ्यात श्री स्वामी बसप्पावर ओरडून म्हणतात ‘आम्ही सत्पुरुष असो नाहीतर आणखी कोणी तुला काय करायचं आहे?’

हे ऐकून बसप्पा चकित होतो आणि पुन्हा मनात म्हणतो, ‘बापरे, हे तर मनकवडे सुद्धा आहेत.’ तेव्हा श्री स्वामी कडाडून बसप्पावर ओरडतात, ‘आम्ही मनकवडे असु नाही तर आणखी कोणी तुला कसली आली आहे पंचाईत. चल चालता हो.’ हे ऐकून बसप्पाला श्री स्वामी कोणी साधारण व्यक्ती नसुन परमेश्वराचेच मानवी रूप आहे याची खात्री पटते.

पुढे बसप्पा श्री स्वामींचा निस्सीम भक्त होतो. इतका श्री स्वामींच्या सेवेत रूजू होतो की कधी कधी त्याला आपल्या बायका, मुलांचीही आठवण होत नसे. श्री स्वामींच्या बालोन्मत्त पिशाच्च वृत्तीमुळे गावातील अजान गावकऱ्यांना श्री स्वामी वेडे वाटत. त्यामुळे बसप्पा ह्या वेड्या महाराजांच्या नादी लागून आपल्या संसाराची माती करत आहे असे म्हणून गावकरी आणि त्याची पत्नी बसप्पाला सारखे हिनवत असत. तरी बसप्पाने श्री स्वामी सेवा करणे सोडले नाही.

असेच एक दिवस श्री स्वामी सेवा करीत कधी संध्याकाळ झाली हे बसप्पाला कळलेच नाही. तेव्हा श्री स्वामींनी बसप्पाला ‘घरी जा तुझी बायको माझ्या नावाने ठणाणा करीत आहे. तुझी मुले उपाशी आहेत’ असे सांगितले. पण बसप्पाला श्री स्वामी चरण सोडवत नव्हते. बसप्पा श्री स्वामींचे पाय चेपीतच राहीला.
तेव्हा श्री स्वामी उठतात आणि जलद गतीने, अरण्याच्या दिशेने चालू लागतात. श्री स्वामींची चालण्याची गती एवढी होती की बसप्पाला धावत धावत श्री स्वामींच्या पाठोपाठ जावे लागले. बसप्पा घरी जाण्याऐवजी पाठोपाठ सेवा करण्यासाठी येत आहे हे पाहून पुन्हा बसप्पाला श्री स्वामींनी घरी जाण्यास सांगितले. पण बसप्पाने नाही ऐकले.

बसप्पाला कळलेच नाही की कधी आपण श्री स्वामींच्या पाठोपाठ अरण्याच्या मध्यावर येवून पोहोचलो. काळाकुट्ट अंधार होता. आणि त्या अंधारात बसप्पाचा पाय एका सर्पाला लागतो आणि बसप्पा भाणावर येतो. आणि पाहतो तर काय आजुबाजूला अनेक सर्प रेंगाळत होते.

तेव्हा श्री स्वामी प्रेमाने बसप्पाला म्हणतात, ‘ घे, हवे तितके घे. आजपासून तुझं दारिद्र्य संपलं. संकोच करू नकोस.’
तेव्हा बसप्पा भित भित एका सापाला उचलून आपल्या डोक्यावरच्या कपड्यात गुंडाळतो. आणि श्री स्वामीं सोबत एका देऊळी येऊन पोहोचतो.

देवळाच्या ओसरीवर बसून बसप्पा ते कापड उघडून पाहतो तर, साप गुप्त होऊन त्या जागी सोन्याचा साप असतो. अशाप्रकारे श्री स्वामी, बसप्पाच्या इतक्या दिवसांच्या निस्सीम भक्तीचे फळ त्याला देतात. व त्याचे दारिद्र्य दूर करतात. पुढे श्री स्वामी बसप्पाला, प्रपंच करून परमार्थ साध असे सांगून, बसप्पाचा निरोप घेतात.

अशाप्रकारे श्री स्वामींनी बसप्पाचा भाग्योदय घडवून आणला. या अद्भुत कथेचा शेवट करताना ग्रंथकार पुढील अध्यायात आपण श्री स्वामीसुतांच्या कथेचे कथन करणार आहोत याची पुर्व सुचना करतात. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या पंधराव्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामी समर्थ

Sri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 14

Sri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 14

Shree Swami Samarth

Shree Swami Samarth, my salutations to all Swami devotees. Today we are going to learn about Sri Swami Charitra Saramrita Chapter 14.

Thirteen chapters of this book could be completed only because of Sri Swami’s grace. Now this fourteenth chapter should be read on the strength of the same grace. The poet begins the chapter by making such a request, at the feet of Sri Swami.

Many devotees used to ask the book writers how to worship Sri Swami. Then the author has given their answers from this chapter. And the doubts and problems in the minds of the devotees have been resolved. Information is given about how to do Bhakti, Sadhana and Upasana.

One should wake up in the morning and first remember Sri Swami, then with a pure mind one should finish all daily activities and sit on the Asana. With clean mind,Shri Swami should be worshipped. One should bathe Shri Swami with a concentrated mind, apply hina attar and apply sandalwood. Fragrant chaffa flowers are Sri Swami’s favorite so they should be worn. If chaffa flowers are not available, you can offer any flowers.

Shri Swami should keep Dakshina ahead carrying incense, lamp, offerings and tambul. Salutations to Sri Swami should be chanted. If possible chant the Sahastranamavali of Sri Swami with various attributes and characteristics poems or with songs.

Keeping your head at the feet of Shri Swami, you should pray for the good health of your family and society and for the completion of all works. Fasting should be done every Thursday. And at the time of Pradosh, one should break the fast and worship Shri Swami. Therefore, the mind and intellect are enriched. Japadhyana as well as Manas Puja are also dear to Sri Swami.

One should never be arrogant that one is a devotee of Sri Swami. How will Sri Swami Samarth be pleased with those who practice hypocritical devotion? Devotees who do devotion with pure mind and heart are the devotees who are dear to Sri Swami.

The poet concludes this fourteenth chapter by telling how to serve Sri Swami in this chapter.

Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth

Along with this we are giving you fourteenth chapter of original Swami charitra Saramrita.

अध्याय चौदावा

श्री गणेशाय नम:।
जयजयाजी करुणाघना। जयजयाजी अघशमना।
जयजयाजी परमपावना। दीनबंधो जगदगुरु ॥1॥

प्रात:काळीं उठोन। आधीं करावें नामस्मरण।
अंतरीं ध्यावे स्वामीचरण। शुद्धमन करोनी ॥2॥

प्रात:कर्में आटपोनी। मग बैसावें आसनीं।
भक्ती धरोनी स्वामीचरणीं। पूजन करावें विधियुक्त ॥3॥

एकाग्र करोनी मन। घालावे शुुद्धोदक स्नान।
सुगंध चंदन लावोन। सुवासिक कुसुमें अर्पावीं ॥4॥

धूप-दीप-नैवेद्य। फल तांबूल दक्षिणा शुद्ध।
अर्पावें नाना खाद्य। नैवेद्याकारणें स्वामींच्या ॥5॥

षोडशोपचारें पूजन। करावें सद्भावें करून।
धूप-दीपार्ती अर्पून। नमस्कार करावा ॥6॥

मग करावी प्रार्थना। जयजयाजी अघहरणा।
परात्परा कैवल्यसदना। ब्रह्मानंदा यतिवर्या ॥7॥

जयजयाजी पुराणपुरुषा। लोकपाला सर्वेशा।
अनंत ब्रह्मांडाधीशा। वेदवंद्या जगदगुरु ॥8॥

सुखधामनिवासिया। सर्वसाक्षी करुणालया।
भक्तजन ताराया। अनंतरूपें नटलासी ॥9॥

तूं अग्नी तूं पवन। तूं आकाश तूं जीवन।
तूंची वसुंधरा पूर्ण। चंद्र सूर्य तूंच पैं ॥10॥

तूं विष्णु आणि शंकर। तूं विधाता तूं इंद्र।
अष्टदिक्पालादि समग्र। तूंच रूपें नटलासी ॥11॥

कर्ता आणि करविता। तूंच हवी आणि होता।
दाता आणि देवविता। तूंच समर्था निश्चयें ॥12॥

जंगम आणि स्थिर। तूंच व्यापिलें समग्र।
तुजलागीं आदिमध्याग्र। कोठें नसे पाहतां ॥13॥

असोनिया निर्गुण। रूपें नटलासी सगुण।
ज्ञाता आणि ज्ञान। तूंच एक विश्वेशा ॥14॥

वेदांचाही तर्क चांचरे। शास्त्रांतेंही नावरे।
विष्णु शंकर एकसरें। कुंठित झाले सर्वही ॥15॥

मी केवळ अल्पमती। करूं केवीं आपुली स्तुती।
सहस्रमुखही निश्चिती। शिणला ख्याती वर्णितां ॥16॥

दृढ ठेविला चरणीं माथा। रक्षावें मजसी समर्था।
कृपाकटाक्षें दीनानाथा। दासाकडे पाहावें ॥17॥

आतां इतुकी प्रार्थना। आणावी जी आपुल्या मना।
कृपासमुद्रीं या मीना। आश्रय देईजे सदैव ॥18॥

पाप ताप आणि दैन्य। सर्व जावो निरसोन।
इहलोकीं सौख्य देवोन। परलोकसाधन करवावें ॥19॥

दुस्तर हा भवसागर। याचे पावावया पैलतीर।
त्वन्नाम तरणी साचार। प्राप्त होवो मजला ते ॥20॥

आशा मनीषा तृष्णा। कल्पना आणि वासना।
भ्रांती भुली नाना। न बाधोत तुझ्या कृपें ॥21॥

किती वर्णूं आपुले गुण। द्यावें मज सुख साधन।
अज्ञान तिमिर निरसोन। ज्ञानार्क हृदयीं प्रगटो पैं ॥22॥

शांती मनीं सदा वसो। वृथाभिमान नसो।
सदा समाधान वसो। तुझ्या कृपेनें अंतरीं ॥23॥

भवदु:खे हें निरसो। तुझ्या भजनीं चित्त वसो।
वृथा विषयांची नसो। वासना या मनातें ॥24॥

सदा साधु-समागम। तुझें भजन उत्तम।
तेणें होवो हा सुगम। दुर्गम जो भवपंथ ॥25॥

व्यवहारीं वर्ततां। न पडो भ्रांती चित्ता।
अंगी न यावी असत्यता। सत्यें विजयी सर्वदा ॥26॥

आप्तवर्गाचें पोषण। न्याय मार्गावलंबन।
इतुकें द्यावे वरदान। कृपा करोनी समर्था ॥27॥

असोनियां संसारात। प्राशीन तव नामामृत।
प्रपंच आणि परमार्थ। तेणें सुगम मजलागीं ॥28॥

ऐशी प्रार्थना करितां। आनंद होय समर्था।
संतोषोनी तत्वत्तां। वरप्रसाद देतील ॥29॥

गुरुवारी उपोषण। विधियुक्त करावें स्वामीपूजन।
प्रदोषसमय होतां जाणून। उपोषण सोडावें ॥30॥

श्रीस्वामी समर्थ। ऐसा षडाक्षरी मंत्र।
प्रीतीनें जपावा अहोरात्र। तेणें सर्वार्थ पाविजे ॥31॥

प्रसंगीं मानसपूजा करितां। तेही प्रिय होय समर्था।
स्वामीचरित्र वाचितां ऐकतां। सकल दोष जातील ॥32॥

कैसी करावी स्वामीभक्ती। हें नेणें मी मंदमती।
परी असतां शुद्ध चित्तीं। तेची भक्ती श्रेष्ठ पैं ॥33॥

आम्हीं आहों स्वामीभक्त। मिरवूं नये लोकांत।
जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ। निष्फळ भक्ती तयाची ॥34॥

इति श्री स्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।

सदा ऐकोत भाविक भक्त। चतुर्दशोध्याय गोड हा ॥35॥
श्रीरस्तु ॥ शुभं भवतु॥

In a few days we will start a blog on the true experiences of Swami devotees. And also write the name of those who experienced this in the blog. So mail us your experience as soon as possible. Our email address is, rajesh.kamble01@gmail.com So see you soon with a new article till then to all Swami devotees

Sri Swami Samarth ||

Real photo of shree Swami Samarth

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १४

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १४

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय चौदावा या बद्दल जाणून घेणार आहोत.

श्री स्वामी कृपेमुळेच या ग्रंथाचे तेरा अध्याय पुर्ण होऊ शकले. आता त्याच कृपेच्या बळावर हा चौदावा अध्याय वदवून घ्यावा. अशी विनंती,श्री स्वामींं चरणी करुन ग्रंथकार अध्यायाला प्रारंभ करतात.

श्री स्वामींची भक्ती कशी करावी असे प्रश्न अनेक भक्तजन ग्रंथकारांना करत असत. तेव्हा या अध्यायातून ग्रंथकाराने त्यांची उत्तरे दिली आहेत. व भक्तांच्या मनातील शंकांचे, समस्यांचे निरसन केले आहे. भक्ती, साधना व उपासना कशी करावी याबद्दल माहिती दिली आहे.

सकाळी उठून आधी श्री स्वामींचे स्मरण करावे, त्यानंतर शुद्ध मनाने सर्व नित्यकर्मे आटोपून आसनावर बसावे. श्री स्वामींची मनोभावे पुजा करावी. एकाग्र चित्ताने श्री स्वामींना स्नान घालावे, हिणा अत्तर लावून चंदनाचा लेप करावा. सुगंधी चाफ्याची फुले श्री स्वामींच्या आवडीची त्यामुळे ती वहावी. चाफ्याची फुले उपलब्ध नसतील तर कोणतीही फुले अर्पण करू शकता.

‌‌ धुप, दिप, नैवेद्य आणि तांबूल वाहून श्री स्वामीं पुढे दक्षिणा ठेवावी. श्री स्वामींना नमस्कार करून नामस्मरण व प्रार्थना स्तोत्र म्हणावे. शक्य असल्यास श्री स्वामींची सहस्त्रनामावली उच्चारून विविध गुणविशेषणांनी व वैशिष्ट्यांनी नटलेल्या श्री स्वामींच्या अवतार कार्याची भजने गावीत.

श्री स्वामींच्या चरणी मस्तक ठेऊन, आपल्या कुटुंबीयांचे व समाजाचे स्वास्थ्य उत्तम रहावे व सर्व कार्ये पुर्णत्वास यावी याकरिता प्रार्थना करावी. दर गुरुवारी उपोषण करावे. आणि प्रदोष समयी उपोषण सोडावे व श्री स्वामी पुजन करावे. त्यामुळे चित्त व बुद्धी सदऋष्ट होते. जपध्यान करावे तसेच मानस पुजाही श्री स्वामींना प्रिय आहे.

आपण श्री स्वामी भक्त आहोत याचा कधीही अहंकार बाळगू नये. जे दांभिक भक्ती करतात त्यांवर श्री स्वामी समर्थ कसे बरे प्रसन्न होतील? जे भक्त शूद्ध चित्ताने व मनापासून भक्ती करतात तेच भक्त श्री स्वामींना प्रिय आहेत.

ग्रंथ कर्त्याने या अध्यायात श्री स्वामी सेवा कशी करावी याबद्दल सांगून ह्या चौदाव्या अध्यायाची समाप्ती केली आहे.

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ

सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय चौदावा देत आहोत.

अध्याय चौदावा

श्री गणेशाय नम:।
जयजयाजी करुणाघना। जयजयाजी अघशमना।
जयजयाजी परमपावना। दीनबंधो जगदगुरु ॥1॥

प्रात:काळीं उठोन। आधीं करावें नामस्मरण।
अंतरीं ध्यावे स्वामीचरण। शुद्धमन करोनी ॥2॥

प्रात:कर्में आटपोनी। मग बैसावें आसनीं।
भक्ती धरोनी स्वामीचरणीं। पूजन करावें विधियुक्त ॥3॥

एकाग्र करोनी मन। घालावे शुुद्धोदक स्नान।
सुगंध चंदन लावोन। सुवासिक कुसुमें अर्पावीं ॥4॥

धूप-दीप-नैवेद्य। फल तांबूल दक्षिणा शुद्ध।
अर्पावें नाना खाद्य। नैवेद्याकारणें स्वामींच्या ॥5॥

षोडशोपचारें पूजन। करावें सद्भावें करून।
धूप-दीपार्ती अर्पून। नमस्कार करावा ॥6॥

मग करावी प्रार्थना। जयजयाजी अघहरणा।
परात्परा कैवल्यसदना। ब्रह्मानंदा यतिवर्या ॥7॥

जयजयाजी पुराणपुरुषा। लोकपाला सर्वेशा।
अनंत ब्रह्मांडाधीशा। वेदवंद्या जगदगुरु ॥8॥

सुखधामनिवासिया। सर्वसाक्षी करुणालया।
भक्तजन ताराया। अनंतरूपें नटलासी ॥9॥

तूं अग्नी तूं पवन। तूं आकाश तूं जीवन।
तूंची वसुंधरा पूर्ण। चंद्र सूर्य तूंच पैं ॥10॥

तूं विष्णु आणि शंकर। तूं विधाता तूं इंद्र।
अष्टदिक्पालादि समग्र। तूंच रूपें नटलासी ॥11॥

कर्ता आणि करविता। तूंच हवी आणि होता।
दाता आणि देवविता। तूंच समर्था निश्चयें ॥12॥

जंगम आणि स्थिर। तूंच व्यापिलें समग्र।
तुजलागीं आदिमध्याग्र। कोठें नसे पाहतां ॥13॥

असोनिया निर्गुण। रूपें नटलासी सगुण।
ज्ञाता आणि ज्ञान। तूंच एक विश्वेशा ॥14॥

वेदांचाही तर्क चांचरे। शास्त्रांतेंही नावरे।
विष्णु शंकर एकसरें। कुंठित झाले सर्वही ॥15॥

मी केवळ अल्पमती। करूं केवीं आपुली स्तुती।
सहस्रमुखही निश्चिती। शिणला ख्याती वर्णितां ॥16॥

दृढ ठेविला चरणीं माथा। रक्षावें मजसी समर्था।
कृपाकटाक्षें दीनानाथा। दासाकडे पाहावें ॥17॥

आतां इतुकी प्रार्थना। आणावी जी आपुल्या मना।
कृपासमुद्रीं या मीना। आश्रय देईजे सदैव ॥18॥

पाप ताप आणि दैन्य। सर्व जावो निरसोन।
इहलोकीं सौख्य देवोन। परलोकसाधन करवावें ॥19॥

दुस्तर हा भवसागर। याचे पावावया पैलतीर।
त्वन्नाम तरणी साचार। प्राप्त होवो मजला ते ॥20॥

आशा मनीषा तृष्णा। कल्पना आणि वासना।
भ्रांती भुली नाना। न बाधोत तुझ्या कृपें ॥21॥

किती वर्णूं आपुले गुण। द्यावें मज सुख साधन।
अज्ञान तिमिर निरसोन। ज्ञानार्क हृदयीं प्रगटो पैं ॥22॥

शांती मनीं सदा वसो। वृथाभिमान नसो।
सदा समाधान वसो। तुझ्या कृपेनें अंतरीं ॥23॥

भवदु:खे हें निरसो। तुझ्या भजनीं चित्त वसो।
वृथा विषयांची नसो। वासना या मनातें ॥24॥

सदा साधु-समागम। तुझें भजन उत्तम।
तेणें होवो हा सुगम। दुर्गम जो भवपंथ ॥25॥

व्यवहारीं वर्ततां। न पडो भ्रांती चित्ता।
अंगी न यावी असत्यता। सत्यें विजयी सर्वदा ॥26॥

आप्तवर्गाचें पोषण। न्याय मार्गावलंबन।
इतुकें द्यावे वरदान। कृपा करोनी समर्था ॥27॥

असोनियां संसारात। प्राशीन तव नामामृत।
प्रपंच आणि परमार्थ। तेणें सुगम मजलागीं ॥28॥

ऐशी प्रार्थना करितां। आनंद होय समर्था।
संतोषोनी तत्वत्तां। वरप्रसाद देतील ॥29॥

गुरुवारी उपोषण। विधियुक्त करावें स्वामीपूजन।
प्रदोषसमय होतां जाणून। उपोषण सोडावें ॥30॥

श्रीस्वामी समर्थ। ऐसा षडाक्षरी मंत्र।
प्रीतीनें जपावा अहोरात्र। तेणें सर्वार्थ पाविजे ॥31॥

प्रसंगीं मानसपूजा करितां। तेही प्रिय होय समर्था।
स्वामीचरित्र वाचितां ऐकतां। सकल दोष जातील ॥32॥

कैसी करावी स्वामीभक्ती। हें नेणें मी मंदमती।
परी असतां शुद्ध चित्तीं। तेची भक्ती श्रेष्ठ पैं ॥33॥

आम्हीं आहों स्वामीभक्त। मिरवूं नये लोकांत।
जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ। निष्फळ भक्ती तयाची ॥34॥

इति श्री स्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।

सदा ऐकोत भाविक भक्त। चतुर्दशोध्याय गोड हा ॥35॥
श्रीरस्तु ॥ शुभं भवतु॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामी समर्थ व सेवेकरी

Sri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 13

Sri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 13

Shree Swami Samarth and bhujanga

Shree Swami Samarth, my salutations to all Swami devotees. Today we are going to learn about Sri Swami Charitra Saramrit Chapter Thirteen.

Balappa joined Sri Swami’s service. Due to the growing influence of Balappa, many among the Sevakaryas started getting upset. Sripad Bhat as well as many sevakars did many tricks to remove Balappa from Sri Swami service. But by Sri Swami’s grace they all became fruitless. We have seen this in the previous chapter.

As Balappa was formerly a householder, Balappa felt ashamed to do some work in Sri Swami Seva. So Shri Swami constantly asked Balappa to do the work. Once Shri Swami preached to Balappa ‘Neerlajjesi Sanidhya Guru’. That is, a disciple who does any kind of service to his Guru without any shame in his heart, always gets the Guru’s support. And Balappa continued to serve Sri Swami without hesitation.

This devotion of Balappa was oppressive to Sundara Bai and some of the servants. One night in the middle of the night, Sri Swami got suspicious and woke up Balappa without waking up anyone else. Sundara Bai began to think that it came from behind the ear and became bitter.

A certain devotee had offered Chandrahar to Shri Swami. On the occasion of diwali, Rani Saheb thought that it should be worn by (Chandrahar) Shri Swami. Rani Saheb sent a soldier to Balappa to take that Chandrahar. But Balappa refused to give the Chandrahar, saying that Cholappa was responsible for that Chandrahar. And Cholappa refused saying that we were not responsible as he was not staying in the monastery at that time

The soldier returned to the palace and told Rani Saheb the reality of what had happened. At that time, the queen had a lot of faith in Sundara Bai. Sundara Bai blew Rani Saheb’s ears about Cholappa. And she tried to stop the Mehentana (monthly income given by King)given to the Cholappas by Rani Saheba, but by the grace of Shri Swami, that effort was unsuccessful.

Sundara Bai also started complaining about Balappa to Sri Swami. Then Shri Swami asked Balappa to sit in Maruti’s temple and do Naamsmaran (chanting). Later, Sri Swami also removed Sundara Bai from him. And Sundara Bai’s career ended. And here ends the thirteenth chapter of Sri Swami Charitra Saramrita.

Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth.

Along with this we are giving you the thirteenth chapter of original Swami charitra Saramrita.

अध्याय तेरावा

श्रीगणेशाय नम:।
शुक्लपक्षीचा शशिकर। वाढे जैसा उत्तरोत्तर।
तैसें हें स्वामीचरित्र। अध्यायाध्यायीं वाढलें ॥1॥

द्वादशाध्यायाचे अंतीं। श्रीपादभट्ट बाळाप्पाप्रती।
कपट युक्तीनें फसवूं पाहती। परी झाले व्यर्थची ॥2॥

स्वयंपाकादिक करावयासी। लज्जा वाटतसे त्यासी।
तयातें एके समयासी । काय बोलती समर्थ ॥3॥

निर्लज्जासी सन्निध गुरू। असे जाण निरंतरू।
ऐसे बोलतां सदगुरु। बाळाप्पा मनीं समजला ॥4॥

सेवेकर्‍यांमाजी वरिष्ठ। सुंदराबाई होती तेथे ।
तिनें सेवेकर्‍यांस नित्य। त्रास द्यावा व्यर्थची ॥5॥

नाना प्रकार बोलोन। करी सर्वांचा अपमान।
परी बाळाप्पावरी पूर्ण। विश्वास होता तियेचा ॥6॥

परी कोणे एके दिवशीं। मध्यरात्रीच्या समयासी।
लघुशंका लागतां स्वामीसी। बाळाप्पातें उठविलें ॥7॥

तैंपासुनी बाळाप्पासी। त्रास देत अहर्दिशीं।
गार्‍हाणें सांगतां समर्थांसी। बाईतें शब्दें ताडिती ॥8॥

अक्कलकोटीं श्रीसमर्थ। प्रथमत: ज्याचे घरी येत।
तो चोळाप्पा विख्यात। स्वामीभक्त जाहला ॥9॥

एक तपपर्यंत। स्वामीसेवा तो करीत।
तयासी द्रव्याशा बहुत। असे सांप्रत लागली ॥10॥

दिवाळीचा सण येता। राजमंदिरामाजी समर्थ।
राहिले असतां आनंदांत। वर्तमान वर्तलें ॥11॥

कोण्या भक्तें समर्थांसी। अर्पिलें होतें चंद्रहारासी।
सणानिमित्त त्या दिवशीं। आंगावरी घालावा ॥12॥

राणीचिये मनांत। विचार येता त्वरीत।
सुंदराबाईसी बोलत। चंद्रहार द्यावा कीं ॥13॥

सुंदराबाई बोलली। तो आहे चोळाप्पाजवळी।
ऐसें ऐकतां त्या काळी। जमादार पाठविला ॥14॥

गंगुलाल जमादार। चोळाप्पाजवळी ये सत्वर।
म्हणे द्यावा जी चंद्रहार। राणीसाहेब मागती ॥15॥

चोळाप्पा बोले तयासी। हार नाहीं आम्हांपासी।
बाळाप्पा ठेवितो तयासी। तुम्हीं मागून घ्यावा कीं ॥16॥

ऐसें ऐकुनी उत्तर। गंगुलाल जमादार।
बाळाप्पाजवळी येउनी सत्वर। हार मागूं लागला ॥17॥

बाळाप्पा बोले उत्तर। आपणापासी चंद्रहार।
परी चोळाप्पाची त्यावर। सत्ता असे सर्वस्वें ॥18॥

ऐसें ऐकुनी बोलणें। जमादार पुसे चोळाप्पाकारणें।
जबाब दिधला चोळाप्पानें। बाळाप्पा देती तरी घेइजे ॥19॥

ऐसें भाषण ऐकोन। जमादार परतोन ।
नृपमंदिरीं येवोन। वर्तमान सर्व सांगे ॥20॥

चोळाप्पाची ऐकुनी कृती। राग आला राणीप्रती।
सुंदराबाईनेंही गोष्टी। तयाविरुद्ध सांगितल्या ॥21॥

कारभार चोळाप्पाचे करी। जो होता आजवरी।
तो काढुनी त्यास दुरी। करावे राणी म्हणतसे ॥22॥

असो एके अवसरीं। काय झाली नवलपरी।
बैसली समर्थांची स्वारी। भक्तमंडळी वेष्टीत ॥23॥

एक वस्त्र तया वेळीं। पडलें होतें श्रींजवळी।
तयाची करोनिया झोळी। समर्थें करी घेतली ॥24॥

अल्लख शब्द उच्चारिला। म्हणती भिक्षा द्या आम्हांला।
तया वेळीं सर्वत्रांला। आश्चर्य वाटलें ॥25॥

झोळी घेतली समर्थें। काय असे उणें तेथें।
जे जे दर्शना आले होते। त्यांनी भिक्षा घातली ॥26॥

कोणी एक कोणी दोन। रुपये टाकिती आणोन।
न लागतां एक क्षण। शंभरांवर गणती झाली ॥27॥

झोळी चोळाप्पातें देवोन। समर्थ बोलले काय वचन।
चोळाप्पा तुझें फिटलें रीण। स्वस्थ आता असावें ॥28॥

पाहोनिया द्रव्यासी। आनंद झाला तयासी।
परी न आले मानसीं। श्रीचरण अंतरले ॥29॥

चोळाप्पासी दूर केले। बाईसी बरें वाटलें।
ऐसे कांहीं दिवस गेले। बाळाप्पा सेवा करिताती ॥30॥

कोणे एके अवसरीं। सुंदराबाई बाळाप्पावरी।
रागावोनी दुष्टोत्तरीं। ताडण करी बहुसाळ ॥31॥

तें ऐकोनी बाळाप्पासी। दु:ख झालें मानसीं।
सोडुनी स्वामी-चरणांसी। म्हणती जावें येथोनी ॥32॥

आज्ञा समर्थांची घेवोनी। म्हणती जावें येथोनी।
याकरितां दुसरें दिनीं। समर्थांजवळी पातले ॥33॥

तेव्हां एका सेवेकर्‍यास। बोलले काय समर्थ।
बाळाप्पा दर्शनास येत। त्यासी आसन दाखवावें ॥34॥

बाळाप्पा येतां त्या स्थानीं। आसन दाविलें सेवेकर्‍यांनी।
तेव्हां समजले निजमनीं। आज्ञा आपणां मिळेना ॥35॥

कोठें मांडावें आसन। विचार पडला त्यांलागून।
तों त्याच रात्रीं स्वप्न। बाळाप्पानें देखिले ॥36॥

श्रीमारुतीचें मंदिर। स्वप्नीं आलें सुंदर।
तेथें जाउनी सत्वर । आसन त्यांनीं मांडिलें ॥37॥

श्री स्वामी समर्थ। या मंत्राचा जप करीत।
एक वेळ दर्शना येत। हिशेब ठेवित जपाचा ॥38॥

काढुनी दिलें बाळाप्पासी। आनंद झाला बाईसी।
गर्वभरें ती कोणासी। मानीनाशी जाहली ॥39॥

सुंदराबाईसी करावें दूर। समर्थांचा झाला विचार।
त्याप्रमाणें चमत्कार करोनिया दाविती ॥40॥

परी राणीची प्रिती। बाईवरी बहु होती।
याकारणें कोणाप्रती। धैर्य कांहीं होईना ॥41॥

अक्कलकोटीं त्या अवसरीं। माधवराव बर्वे कारभारी।
तयांसी हुकूम झाला सत्वरी। बाईसी दूरी करावें ॥42॥

परी राणीस भिवोनी । तैसें न केले तयांनी।
समर्थदर्शनासी एके दिनीं। कारभारी पातले ॥43॥

तयांसी बोलती समर्थ। कैसा करितां कारभार।
ऐसें ऐकोनिया उत्तर । बर्वे मनीं समजले ॥44॥

मग त्यांनीं त्याच दिवशीं। पाठविलें फौजदारासी।
कैद करुनीया बाईसी। आणावें म्हणती सत्वर ॥45॥

फौजदारासी समर्थ। कांही एक न बोलत।
कारकीर्दीचा अंत। ऐसा झाला बाईच्या ॥46॥

स्वामीचिया सेवेकरितां। सरकारांतुनी तत्त्वतां।
पंच नेमुनी व्यवस्था। केली असे नृपरायें ॥47॥

मग सेवा करावयासी। घेउनी गेले बाळाप्पासी।
म्हणती देउं तुम्हांसी। पगार सरकारांतुनी ॥48॥

बाळाप्पा बोलले तयांसी। द्रव्याशा नाहीं आम्हासी।
आम्ही निर्लोभ मानसीं। स्वामीसेवा करूं कीं ॥49॥

बाळाप्पाचा जप होतां पूर्ण। एका भक्तास सांगोन।
करविलें श्रींनीं उद्यापन। हिशेब जपाचा घेतला ॥50॥

बाळाप्पांनीं चाकरी। एक तप सरासरी।
केली उत्तम प्रकारी। समर्था ते प्रिय झाले ॥51॥

दृढ निश्चय आणि भक्ती। तैसी सदगुरुचरणीं आसक्ती।
तेंणें येत मोक्ष हातीं। अन्य साधनें व्यर्थची ॥52॥

उगीच करिती दांभिक भक्ती। त्यावरी स्वामी कृपा न करिती।
सद्भावें जे नमस्कारिती। त्यांवरी होती कृपाळू ॥53॥

अक्कलकोटनिवासिया। जयजयाजी स्वामीराया।
रात्रंदिन तुझ्या पायां। विष्णु शंकर वंदिती ॥54॥

इति श्री स्वामीचरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा संमत ।
सदा भक्त परिसोत । त्रयोदशोध्याय गोड हा ॥55॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृते त्रयोदशोध्याय:।

श्रीस्वामीचरणार्पणमस्तु। शुभं भवतु॥

In a few days we will start a blog on the true experiences of Swami devotees. And also write the name of those who experienced this in the blog. So mail us your experience as soon as possible. Our email address is, rajesh.kamble01@gmail.com So see you soon with a new article till then to all Swami devotees

Sri Swami Samarth ||

Sundara bai

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १३

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १३

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय तेरावा या बद्दल जाणून घेणार आहोत.

बाळप्पा हे श्री स्वामी सेवेत रूजू झाले. बाळप्पांच्या वाढत्या प्रभावामुळे सेवेकर्यांमधील अनेकजण नाराज होऊ लागले. श्रीपाद भटांनी तसेच अनेक सेवेकरांनी बाळप्पांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्यासाठी अनेक खटाटोपी केल्या. पण श्री स्वामी कृपेने त्या सर्व निष्फळ ठरल्या. या बद्दलचा वृत्तांत आपण मागील अध्यायात पाहीला.

बाळप्पा हे पुर्वीचे गृहस्थाश्रमीचे असल्या कारणाने, बाळप्पांना श्री स्वामी सेवेतील काही कामे करन्यास लज्जा वाटत असे. त्यामुळे श्री स्वामी सतत बाळप्पांनाच कामे सांगत. एकदा श्री स्वामींनी बाळप्पांना उपदेश केला ‘नीर्लज्जेसी सानीध्य गुरौ’. म्हणजेच जो शिष्य आपल्या गुरूची कोणत्याही प्रकारची सेवा मनात लाज न बाळगता करतो, त्याला सदैव गुरूची साथ मिळते. आणि बाळप्पा पुढे निःसंकोचपणे श्री स्वामी सेवा करू लागले.

बाळप्पांचा हा समर्पन भाव सुंदरा बाईंना आणि काही सेवेकर्यांना जाचक वाटत असे. एका मध्य रात्री श्री स्वामींनी लघुशंका लागली म्हणून इतर कोणाला न उठवता बाळप्पांना उठवले त्यामुळे बाळप्पा विषयीचा द्वेष सुंदरा बाईंच्या मनात आणखी वाढला. कानामागून आला आणि तिखट झाला असे विचार सुंदरा बाई करू लागल्या.

कोण्या एका भक्ताने श्री स्वामींना चंद्रहार अर्पण केला होता. सना निमित्त तो चंद्रहार श्री स्वामींना घालावा असा विचार राणीसाहेबांच्या मनात आला. तो चंद्रहार घेण्यासाठी राणीसाहेबांनी एका शिपायाला बाळप्पांकडे पाठवले. पण बाळप्पांनी त्या चंद्रहारावर चोळप्पांची जबाबदारी सांगून, चंद्रहार देण्यास नकार दिला. आणि त्यावेळी चोळप्पा मठात रहात नसल्या कारणाने आमची जबाबदारी नाही असे सांगून नकार दिला.

शिपायाने राजवाड्यात परतून राणीसाहेबांना घडलेली हकीकत सांगितली. त्यावेळी राणीचा सुंदरा बाईंवर खुप विश्वास होता. सुंदरा बाईंनी चोळप्पांन विषयी राणीसाहेबांचे कान फुंकले. व चोळप्पांना मिळणारा मेहेनताना राणीसाहेबांकरवी बंद करण्याचा प्रयत्न केला पण श्री स्वामी कृपेने तो प्रयत्न निष्फळ ठरला.

बाळप्पां विषयीही सुंदरा बाई श्री स्वामीं जवळ कागाळ्या करू लागल्या. तेव्हा श्री स्वामींनी बाळप्पांना मारूतीच्या मंदिरात बसून नामस्मरण करण्यास सांगितले. पुढे श्री स्वामींनी सुंदरा बाईंनाही आपल्यापासून दूर केले. आणि सुंदरा बाईंची कारकीर्द संपुष्टात आली. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या तेराव्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ

सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय तेरावा देत आहोत.

अध्याय तेरावा

श्रीगणेशाय नम:।
शुक्लपक्षीचा शशिकर। वाढे जैसा उत्तरोत्तर।
तैसें हें स्वामीचरित्र। अध्यायाध्यायीं वाढलें ॥1॥

द्वादशाध्यायाचे अंतीं। श्रीपादभट्ट बाळाप्पाप्रती।
कपट युक्तीनें फसवूं पाहती। परी झाले व्यर्थची ॥2॥

स्वयंपाकादिक करावयासी। लज्जा वाटतसे त्यासी।
तयातें एके समयासी । काय बोलती समर्थ ॥3॥

निर्लज्जासी सन्निध गुरू। असे जाण निरंतरू।
ऐसे बोलतां सदगुरु। बाळाप्पा मनीं समजला ॥4॥

सेवेकर्‍यांमाजी वरिष्ठ। सुंदराबाई होती तेथे ।
तिनें सेवेकर्‍यांस नित्य। त्रास द्यावा व्यर्थची ॥5॥

नाना प्रकार बोलोन। करी सर्वांचा अपमान।
परी बाळाप्पावरी पूर्ण। विश्वास होता तियेचा ॥6॥

परी कोणे एके दिवशीं। मध्यरात्रीच्या समयासी।
लघुशंका लागतां स्वामीसी। बाळाप्पातें उठविलें ॥7॥

तैंपासुनी बाळाप्पासी। त्रास देत अहर्दिशीं।
गार्‍हाणें सांगतां समर्थांसी। बाईतें शब्दें ताडिती ॥8॥

अक्कलकोटीं श्रीसमर्थ। प्रथमत: ज्याचे घरी येत।
तो चोळाप्पा विख्यात। स्वामीभक्त जाहला ॥9॥

एक तपपर्यंत। स्वामीसेवा तो करीत।
तयासी द्रव्याशा बहुत। असे सांप्रत लागली ॥10॥

दिवाळीचा सण येता। राजमंदिरामाजी समर्थ।
राहिले असतां आनंदांत। वर्तमान वर्तलें ॥11॥

कोण्या भक्तें समर्थांसी। अर्पिलें होतें चंद्रहारासी।
सणानिमित्त त्या दिवशीं। आंगावरी घालावा ॥12॥

राणीचिये मनांत। विचार येता त्वरीत।
सुंदराबाईसी बोलत। चंद्रहार द्यावा कीं ॥13॥

सुंदराबाई बोलली। तो आहे चोळाप्पाजवळी।
ऐसें ऐकतां त्या काळी। जमादार पाठविला ॥14॥

गंगुलाल जमादार। चोळाप्पाजवळी ये सत्वर।
म्हणे द्यावा जी चंद्रहार। राणीसाहेब मागती ॥15॥

चोळाप्पा बोले तयासी। हार नाहीं आम्हांपासी।
बाळाप्पा ठेवितो तयासी। तुम्हीं मागून घ्यावा कीं ॥16॥

ऐसें ऐकुनी उत्तर। गंगुलाल जमादार।
बाळाप्पाजवळी येउनी सत्वर। हार मागूं लागला ॥17॥

बाळाप्पा बोले उत्तर। आपणापासी चंद्रहार।
परी चोळाप्पाची त्यावर। सत्ता असे सर्वस्वें ॥18॥

ऐसें ऐकुनी बोलणें। जमादार पुसे चोळाप्पाकारणें।
जबाब दिधला चोळाप्पानें। बाळाप्पा देती तरी घेइजे ॥19॥

ऐसें भाषण ऐकोन। जमादार परतोन ।
नृपमंदिरीं येवोन। वर्तमान सर्व सांगे ॥20॥

चोळाप्पाची ऐकुनी कृती। राग आला राणीप्रती।
सुंदराबाईनेंही गोष्टी। तयाविरुद्ध सांगितल्या ॥21॥

कारभार चोळाप्पाचे करी। जो होता आजवरी।
तो काढुनी त्यास दुरी। करावे राणी म्हणतसे ॥22॥

असो एके अवसरीं। काय झाली नवलपरी।
बैसली समर्थांची स्वारी। भक्तमंडळी वेष्टीत ॥23॥

एक वस्त्र तया वेळीं। पडलें होतें श्रींजवळी।
तयाची करोनिया झोळी। समर्थें करी घेतली ॥24॥

अल्लख शब्द उच्चारिला। म्हणती भिक्षा द्या आम्हांला।
तया वेळीं सर्वत्रांला। आश्चर्य वाटलें ॥25॥

झोळी घेतली समर्थें। काय असे उणें तेथें।
जे जे दर्शना आले होते। त्यांनी भिक्षा घातली ॥26॥

कोणी एक कोणी दोन। रुपये टाकिती आणोन।
न लागतां एक क्षण। शंभरांवर गणती झाली ॥27॥

झोळी चोळाप्पातें देवोन। समर्थ बोलले काय वचन।
चोळाप्पा तुझें फिटलें रीण। स्वस्थ आता असावें ॥28॥

पाहोनिया द्रव्यासी। आनंद झाला तयासी।
परी न आले मानसीं। श्रीचरण अंतरले ॥29॥

चोळाप्पासी दूर केले। बाईसी बरें वाटलें।
ऐसे कांहीं दिवस गेले। बाळाप्पा सेवा करिताती ॥30॥

कोणे एके अवसरीं। सुंदराबाई बाळाप्पावरी।
रागावोनी दुष्टोत्तरीं। ताडण करी बहुसाळ ॥31॥

तें ऐकोनी बाळाप्पासी। दु:ख झालें मानसीं।
सोडुनी स्वामी-चरणांसी। म्हणती जावें येथोनी ॥32॥

आज्ञा समर्थांची घेवोनी। म्हणती जावें येथोनी।
याकरितां दुसरें दिनीं। समर्थांजवळी पातले ॥33॥

तेव्हां एका सेवेकर्‍यास। बोलले काय समर्थ।
बाळाप्पा दर्शनास येत। त्यासी आसन दाखवावें ॥34॥

बाळाप्पा येतां त्या स्थानीं। आसन दाविलें सेवेकर्‍यांनी।
तेव्हां समजले निजमनीं। आज्ञा आपणां मिळेना ॥35॥

कोठें मांडावें आसन। विचार पडला त्यांलागून।
तों त्याच रात्रीं स्वप्न। बाळाप्पानें देखिले ॥36॥

श्रीमारुतीचें मंदिर। स्वप्नीं आलें सुंदर।
तेथें जाउनी सत्वर । आसन त्यांनीं मांडिलें ॥37॥

श्री स्वामी समर्थ। या मंत्राचा जप करीत।
एक वेळ दर्शना येत। हिशेब ठेवित जपाचा ॥38॥

काढुनी दिलें बाळाप्पासी। आनंद झाला बाईसी।
गर्वभरें ती कोणासी। मानीनाशी जाहली ॥39॥

सुंदराबाईसी करावें दूर। समर्थांचा झाला विचार।
त्याप्रमाणें चमत्कार करोनिया दाविती ॥40॥

परी राणीची प्रिती। बाईवरी बहु होती।
याकारणें कोणाप्रती। धैर्य कांहीं होईना ॥41॥

अक्कलकोटीं त्या अवसरीं। माधवराव बर्वे कारभारी।
तयांसी हुकूम झाला सत्वरी। बाईसी दूरी करावें ॥42॥

परी राणीस भिवोनी । तैसें न केले तयांनी।
समर्थदर्शनासी एके दिनीं। कारभारी पातले ॥43॥

तयांसी बोलती समर्थ। कैसा करितां कारभार।
ऐसें ऐकोनिया उत्तर । बर्वे मनीं समजले ॥44॥

मग त्यांनीं त्याच दिवशीं। पाठविलें फौजदारासी।
कैद करुनीया बाईसी। आणावें म्हणती सत्वर ॥45॥

फौजदारासी समर्थ। कांही एक न बोलत।
कारकीर्दीचा अंत। ऐसा झाला बाईच्या ॥46॥

स्वामीचिया सेवेकरितां। सरकारांतुनी तत्त्वतां।
पंच नेमुनी व्यवस्था। केली असे नृपरायें ॥47॥

मग सेवा करावयासी। घेउनी गेले बाळाप्पासी।
म्हणती देउं तुम्हांसी। पगार सरकारांतुनी ॥48॥

बाळाप्पा बोलले तयांसी। द्रव्याशा नाहीं आम्हासी।
आम्ही निर्लोभ मानसीं। स्वामीसेवा करूं कीं ॥49॥

बाळाप्पाचा जप होतां पूर्ण। एका भक्तास सांगोन।
करविलें श्रींनीं उद्यापन। हिशेब जपाचा घेतला ॥50॥

बाळाप्पांनीं चाकरी। एक तप सरासरी।
केली उत्तम प्रकारी। समर्था ते प्रिय झाले ॥51॥

दृढ निश्चय आणि भक्ती। तैसी सदगुरुचरणीं आसक्ती।
तेंणें येत मोक्ष हातीं। अन्य साधनें व्यर्थची ॥52॥

उगीच करिती दांभिक भक्ती। त्यावरी स्वामी कृपा न करिती।
सद्भावें जे नमस्कारिती। त्यांवरी होती कृपाळू ॥53॥

अक्कलकोटनिवासिया। जयजयाजी स्वामीराया।
रात्रंदिन तुझ्या पायां। विष्णु शंकर वंदिती ॥54॥

इति श्री स्वामीचरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा संमत ।
सदा भक्त परिसोत । त्रयोदशोध्याय गोड हा ॥55॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृते त्रयोदशोध्याय:।

श्रीस्वामीचरणार्पणमस्तु। शुभं भवतु॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

सुंदरा बाई

Sri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 12

Sri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 12

Shree Swami Samarth

Shree Swami Samarth, my salutations to all Swami devotees. Today we are going to learn about Sri Swami Charitra Saramrit Chapter 12.

Balappa leaves Gangapur to come to Akkalkot with Guru’s obsession. And while coming, as an offering to Sri Swami, they also take granulated sugar of Sri Swami’s choice along with him. By the grace of Sri Swami, Balappa reaches Akkalkot from Gangapur on foot in just two days.

That time, Sri Swami was in Khasbagh. And was lying on the ground. A huge crowd of devotees had gathered to have darshan of Shri Swami. Confused as to whether he would get a glimpse of Sri Swami in this crowd, Sri Swami asked one of his servants to bring Balappa closer.

Balappa’s mind went into a state of samadhi with devotion, seeing Sri Swami’s huge armed and radiant form. And Sri Swami got up and lovingly embraced every tree in the private garden, manifesting his love for Balappa. As soon as Balappa came to his senses, he hugged Sri Charan Sri Swami’s feet tightly. It was as if he anointed Shri Swami’s feet with his tears of joy. Balappa was blessed by seeing Sri Swami.

Balappa noticed that Sri Swami’s service was deteriorating at Akkalkot. There were daily quarrels between Sri Swami sevaks over service. But Balappa broke all the quarrels. And each servant of the monastery was assigned his own service. This made Balappa Sri Swami’s beloved disciple. Because of this, some servants of the Math as well as Sundara Bai hated Balappa.

Balappa implemented the right method of Sri Swami Seva. From the puja to the darshan of Sri Swami, all the arrangements started to go smoothly.

Meanwhile, a strange incident happened with Balappa. Balappa was suffering from stomach ailment. A few years ago, some ungrateful person had poisoned Balappa from a kanola (sweets). But due to the destiny of Balappa to serve Shri Swami, he was alive till now by the grace of Shri Swami. And by Sri Swami’s grace that poison came out of Balappa’s belly button that day. And Balappa miraculously survived.

Along with Shri Swami service, Balappa worshiped Shiva Shankar. But Sundara Bai asked Balappa to refrain from worshiping Shankar. And by the order of Shri Swami i.e. by casting lots, Balappa stopped worshiping Shiva Shankar.

This was seen by Shripad Bhat. Shripad Bhat and some servants were hating Balappa. So Shripad Bhat once met Balappa and said that we are suffering a lot since your arrival. Then you should return to your hometown. Then Balappa said that he should return to the village after taking the order of Sri Swami.

Then Shripad Bhata dropped two pieces of paper and saw that in the piece, it was written that Balappa should stay here and work. If Sri Swami is gracious, how can Sri Swami turn his disciple away?

Later Balappa always joined the service of Sri Swami. And here ends the twelth chapter of Sri Swami Charitra Saramrita.

Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth.

Along with this we are giving you the twelth chapter of original Swami charitra Saramrita.

अध्याय बारावा

श्रीगणेशाय नम:।
कराया जगदुद्धार। हरावया भूभार।
वारंवार परमेश्वर। नाना अवतार धरीतसे ॥1॥

भक्तजन तारणार्थ। अक्कलकोटीं श्रीदत्त।
यतिरूपें प्रगट होत। तेची समर्थ श्रीस्वामी ॥2॥

गताध्यायाचे अंतीं। बाळाप्पा आले अक्कलकोटीं।
पुण्य नगर पाहोनी दृष्टी। आनंद पोटी नच मावे ॥3॥

त्यादिवशीं श्रीसमर्थ। होते खासबागेंत।
यात्रा आली बहुत। गर्दी जाहली श्रींजवळी ॥4॥

दर्शनेच्छा उत्कट चित्तीं। खडीसाखर घेवोनी हातीं।
गर्दीमाजी प्रवेश करिती। स्वामीसन्निध पातले ॥5॥

आजानुबाहू सुहास्यवदन। श्रीस्वामीमूर्ती पाहोन।
बाळाप्पानें धांवोन। दृढ चरण धरियेले ॥6॥

येवोनिया भानावरती। श्रीचरणांची सोडिली मिठी।
ब्रह्मानंद न माये पोटीं। स्तोत्र ओंठीं गातसे ॥7॥

श्री समर्थ त्या वेळीं। पडले होते भूतळीं।
उठोनिया काय केली। लीला एक विचित्र ॥8॥

सर्व वृक्षांसीं आलिंगन। दिलें त्यांनी प्रेमेंकरोन।
बाळाप्पावरचें प्रेम। ऐशा कृतीनें दाविलें ॥9॥

त्यासवें एक जहागिरदार। ते होते बिर्‍हाडावर ।
स्वयंपाक करोनी तयार। म्हणती जाऊं दर्शना ॥10॥

म्हणती जाउनी स्वामीसी। अर्पण करा नैवेद्यासी।
अवश्य म्हणोनी तयांसी। बाळाप्पा तेव्हां चालले ॥11॥

या समयीं श्रीसमर्थ। असती नृपमंदिरांत।
राजाज्ञेवांचुनी तेथे। प्रवेश कोणाचा न होय॥12॥

मार्गावरुनी परतले। सत्वर बिर्‍हाडावरी आले।
तेथें नैवेद्यार्पण केले। मग सारिलें भोजन॥13॥

नित्य प्रात:काळीं उठोन। षट्कर्मातें आचरोन।
घेवोनी स्वामीदर्शन। जपालागीं बैसावें ॥14॥

श्रीशंकर उपास्य दैवत। त्याचें करावें पूजन नित्य।
माध्यान्हीं येतां आदित्य। जपानुष्ठान आटपावें ॥15॥

करीं झोळी घेवोनी। श्रीस्वामीजवळी येवोनी।
मस्तक ठेवोनि चरणीं। जावें भिक्षेकारणें ॥16॥

मागोनियां मधुकरी। मग यावें बिर्‍हाडावरी।
जी मिळेल भाजीभाकरी । त्यानें पोट भरावें॥17॥

घ्यावें स्वामीदर्शन। मग करावें अनुष्ठान।
ऐशा प्रकारें करोन। अक्कलकोटीं राहिले ।18॥

चोळाप्पा आदीकरोन। सेवेकरी बहुतजण।
त्यांत सुंदराबाई म्हणून। मुख्य होती त्या वेळीं ॥19॥

एके दिवशीं तयांसी। बाई आज्ञा करी ऐशी।
आपणही श्रीसेवेसी। करीत जावें आनंदें ॥20॥

बहुतजण सेवेकरी। बाई मुख्य त्यांमाझारीं।
सर्व अधिकार तिच्या करीं। व्यवस्थेचा होता पैं ॥21॥

या कारणें आपसांत। भांडणें होतीं सदोदीत।
स्वामीसेवेची तेथे। अव्यवस्था होतसे॥22॥

हें बाळाप्पांनीं पाहोन। नाना युक्ती योजून।
मोडुनी टाकिलें भांडण। एकचित्त सर्व केले ॥23॥

बाळाप्पाची प्रेमळ भक्ती। पाहुनी संतोष स्वामीप्रती।
दृढ भाव धरुनी चित्तीं। सेवा करिती आनंदें ॥24॥

ऐसें लोटतां कांहीं दिवस। बाळाप्पाचिया शरीरास।
व्याधी जडली रात्रंदिवस। चैन नसे क्षणभरी ॥25॥

भोग भोगिला कांहीं दिन। कागदाची पुडी बेंबींतून।
पडली ती पाहता उकलोन। विष त्यात निघालें॥26॥

पुर्वी कोण्या कृतघ्नें। बाळाप्पासी यावें मरण।
विष दिधलें कानोल्यांतुन। पडलें आज बाहेर ॥27॥

स्वामीकृपेने आजवरी। गुप्त असे उदरीं।
सदगुरुसेवा त्यांचे करीं। व्हावी लिखित विधीचें ॥28॥

प्रत्येक सोमवारीं तयांनीं। महादेवाची पूजा करोनी।
मग यावें परतोनी। स्वामीसेवेकारणें ॥29॥

हें पाहोनी एकें दिवशीं। बाई विनवी समर्थांसी।
आपण सांगुनी बाळाप्पासी। शंकरपूजनीं वर्जावेें ॥30॥

तैशी आज्ञा तयाप्रती। एके दिनीं समर्थ करिती।
परी बाळाप्पाचे चित्तीं। विश्वास कांहीं पटेना ॥31॥

बाईच्या आग्रहावरून। समर्थें दिली आज्ञा जाण ।
हें नसेल सत्य पूर्ण। विनोद केला निश्चयें ॥32॥

पूजा करणें उचित। न करावी हेंचि सत्य।
यापरी चिठ्ठया लिहित। प्रश्न पहात बाळाप्पा ॥33॥

एक चिठ्ठी तयांतुन। उचलुनी पाहतां वाचून।
न करावेंची पूजन। तियेमाजी लिहिलेंसे ॥34॥

तेव्हां सर्व भ्रांती फिटली। स्वामीआज्ञा सत्य मानिली।
ही भानगड पाहिली। श्रीपाद भटजीनें ॥35॥

श्रीपादभट्ट एके दिवशीं। काय बोलती बाळाप्पासी।
दारा-पुत्र सोडुनी देशीं। आपण येथें राहिलां ॥36॥

आपण आल्यापासोन। आमुचें होतें नुकसान।
ऐसे बोल ऐकोन । बाळाप्पा मनीं खिन्न झाला ॥37॥

स्वामीनीं मज आज्ञा द्यावी। मी जातों आपुल्या गांवीं।
परी तुम्हीं युक्ती योजावी। आज्ञा होईल ऐशीच ॥38॥

श्रीपादभट्टें एके दिवशीं। विचारिलें समर्थांसी।
कुलदेवतेच्या दर्शनासी। जावया इच्छी बाळाप्पा ॥39॥

ऐसें ऐकुनिया समर्थ। हास्यमुखें काय बोलत।
कुलदेवतेचें दर्शन नित्य। बाळाप्पा येथ करीतसे ॥40॥

श्रीपाद म्हणे बाळाप्पासी। समर्थ न देती आज्ञेसी।
तरी टाकुनी चिठ्ठयांसी। आज्ञा द्यावी आपण ॥41॥

तयाचें कपट न जाणोनी। अवश्य म्हणे त्याच दिनीं।
दोन चिठ्ठया लिहोनी। उभयतांनी टाकिल्या ॥42॥

चिठ्ठी आपुल्या करीं। भटजी उचली सत्वरी।
येथें राहुनी चाकरी। करी ऐसें लिहिलेंसे ॥43॥

स्वामीचरणीं दृढ भक्ती। बाळाप्पाची जडली होती।
कैसा दूर तयाप्रती। करितील यती दयाळ ॥44॥

इति श्री स्वामीचरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा प्रेमळ परिसोत। द्वादशोध्याय गोड हा ॥45॥

श्री राजाधिराज योगीराज श्रीस्वामीसमर्थ महाराजार्पणमस्तु॥

In a few days we will start a blog on the true experiences of Swami devotees. And also write the name of those who experienced this in the blog. So mail us your experience as soon as possible. Our email address is, rajesh.kamble01@gmail.com So see you soon with a new article till then to all Swami devotees Sri Swami Samarth ||

Shree Balappa real photo

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १२

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १२

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय बारावा या बद्दल जाणून घेणार आहोत.

बाळप्पा गुरूंचा ध्यास घेऊन अक्कलकोट येथे येण्यासाठी गाणगापूरहून निघतात. आणि येताना श्री स्वामींना नैवेद्य म्हणून, सोबत श्री स्वामींच्या आवडीची खडीसाखरही घेतात. श्री स्वामींच्या कृपेनेच अवघ्या दोन दिवसात बाळप्पा गाणगापूरहून अक्कलकोटात पायी चालतच पोहोचतात.

तेव्हा श्री स्वामी खासबागेत होते. आणि जमीनीवर निजले होते. श्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची खुप गर्दी जमली होती. या गर्दीत आपल्याला श्री स्वामींचे दर्शन घडेल का या विवंचनेत असताना, श्री स्वामींनी आपल्या एका सेवेकर्याला बाळप्पांना जवळ घेऊन येण्यास सांगितले.

श्री स्वामींचे अजानुबाहू आणि तेजःपुंज रूप पाहून भक्तीने बाळप्पांचे मन समाधी अवस्थेत गेले. आणि श्री स्वामींनी उठून खासबागेतील प्रत्येक झाडांना प्रेमाने मिठी मारून, बाळप्पा वरचे प्रेम प्रकट केले. बाळप्पा भानावर येताच त्यांनी श्री चरणास घट्ट मिठी मारली. आपल्या आनंदाश्रूंनी जणू श्री स्वामी चरणांस त्यांनी अभिषेकच केला. श्री स्वामी दर्शन घेऊन बाळप्पा धन्य झाले.

अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या सेवेची दुरवस्था होत आहे हे बाळप्पांच्या निदर्शनास आले. श्री स्वामी सेवकांमध्ये सेवेवरुन रोज भांडणे होत होती. परंतु बाळप्पांनी सर्व भांडणे मोडून काढली. आणि मठातील प्रत्येक सेवेकर्याला आपापली सेवा नेमून दिली. यामुळे बाळप्पा श्री स्वामीचे प्रिय शिष्य बनले. यामुळे मठातील काही सेवकरी तसेच सुंदरा बाई बाळप्पांचा द्वेष करीत.

बाळप्पांनी श्री स्वामी सेवेची योग्य पद्धत अमलात आणली. श्री स्वामींच्या पुजेपासून ते दर्शना पर्यन्त सर्व व्यवस्था चोख पार पडू लागल्या.

या दरम्यान बाळप्पांसोबत एक विलक्षण घटना घडली. बाळप्पा पोट दुखीच्या व्याधीने त्रस्त झाले. काही वर्षांपूर्वी कोण्या कृतघ्नाने बाळप्पांना कानोल्यातून विष खाऊ घातले होते. पण बाळप्पांच्या नशीबी श्री स्वामी सेवा करने असल्यामुळे श्री स्वामी कृपेने ते आजवर जिवंत होते. आणि श्री स्वामी कृपेने ते विष त्यादिवशी बाळप्पांच्या बेंबीतून बाहेर पडले. आणि बाळप्पा आश्चर्यकारकरित्या बचावले.

श्री स्वामी सेवे सोबतच बाळप्पा शिव शंकराची आराधना, भक्ती करत. परंतु सुंदरा बाईंनी बाळप्पाना शंकर पूजन वर्ज्य करण्यास सांगितले. आणि श्री स्वामींच्या आज्ञेने म्हणजेच चिठ्ठ्या टाकून बाळप्पांनी शिव शंकराची पूजा करने थांबविले.

ही भाणगड श्रीपाद भटांनी पाहीली. श्रीपाद भट आणि काही सेवेकरी बाळप्पांचा द्वेष करीतच होते. म्हणून श्रीपाद भट एकदा बाळप्पांना भेटले आणि म्हणाले आपण आल्यापासून आमचे खुप नूकसान होत आहे. तेव्हा तुम्ही आपल्या गावी परतावे. तेव्हा आपण श्री स्वामी आज्ञा घेऊन गावी परतू असे‌ बाळप्पांनी सांगितले.

तेव्हा श्रीपाद भटाने दोन चिठ्ठ्या टाकून पाहिले तर चिठ्ठीत, बाळप्पांनी इथेच राहून चाकरी करावी असे‌ लिहीलेले होते. श्री स्वामी कृपा झाली तर श्री स्वामी आपल्या शिष्याला कसे दूर लोटतील?

पुढे बाळप्पा सदैव श्री स्वामी सेवेत रूजू झाले. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या बाराव्या अध्यायाची समाप्ती होते.


श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय बारावा देत आहोत.

अध्याय बारावा

श्रीगणेशाय नम:।
कराया जगदुद्धार। हरावया भूभार।
वारंवार परमेश्वर। नाना अवतार धरीतसे ॥1॥

भक्तजन तारणार्थ। अक्कलकोटीं श्रीदत्त।
यतिरूपें प्रगट होत। तेची समर्थ श्रीस्वामी ॥2॥

गताध्यायाचे अंतीं। बाळाप्पा आले अक्कलकोटीं।
पुण्य नगर पाहोनी दृष्टी। आनंद पोटी नच मावे ॥3॥

त्यादिवशीं श्रीसमर्थ। होते खासबागेंत।
यात्रा आली बहुत। गर्दी जाहली श्रींजवळी ॥4॥

दर्शनेच्छा उत्कट चित्तीं। खडीसाखर घेवोनी हातीं।
गर्दीमाजी प्रवेश करिती। स्वामीसन्निध पातले ॥5॥

आजानुबाहू सुहास्यवदन। श्रीस्वामीमूर्ती पाहोन।
बाळाप्पानें धांवोन। दृढ चरण धरियेले ॥6॥

येवोनिया भानावरती। श्रीचरणांची सोडिली मिठी।
ब्रह्मानंद न माये पोटीं। स्तोत्र ओंठीं गातसे ॥7॥

श्री समर्थ त्या वेळीं। पडले होते भूतळीं।
उठोनिया काय केली। लीला एक विचित्र ॥8॥

सर्व वृक्षांसीं आलिंगन। दिलें त्यांनी प्रेमेंकरोन।
बाळाप्पावरचें प्रेम। ऐशा कृतीनें दाविलें ॥9॥

त्यासवें एक जहागिरदार। ते होते बिर्‍हाडावर ।
स्वयंपाक करोनी तयार। म्हणती जाऊं दर्शना ॥10॥

म्हणती जाउनी स्वामीसी। अर्पण करा नैवेद्यासी।
अवश्य म्हणोनी तयांसी। बाळाप्पा तेव्हां चालले ॥11॥

या समयीं श्रीसमर्थ। असती नृपमंदिरांत।
राजाज्ञेवांचुनी तेथे। प्रवेश कोणाचा न होय॥12॥

मार्गावरुनी परतले। सत्वर बिर्‍हाडावरी आले।
तेथें नैवेद्यार्पण केले। मग सारिलें भोजन॥13॥

नित्य प्रात:काळीं उठोन। षट्कर्मातें आचरोन।
घेवोनी स्वामीदर्शन। जपालागीं बैसावें ॥14॥

श्रीशंकर उपास्य दैवत। त्याचें करावें पूजन नित्य।
माध्यान्हीं येतां आदित्य। जपानुष्ठान आटपावें ॥15॥

करीं झोळी घेवोनी। श्रीस्वामीजवळी येवोनी।
मस्तक ठेवोनि चरणीं। जावें भिक्षेकारणें ॥16॥

मागोनियां मधुकरी। मग यावें बिर्‍हाडावरी।
जी मिळेल भाजीभाकरी । त्यानें पोट भरावें॥17॥

घ्यावें स्वामीदर्शन। मग करावें अनुष्ठान।
ऐशा प्रकारें करोन। अक्कलकोटीं राहिले ।18॥

चोळाप्पा आदीकरोन। सेवेकरी बहुतजण।
त्यांत सुंदराबाई म्हणून। मुख्य होती त्या वेळीं ॥19॥

एके दिवशीं तयांसी। बाई आज्ञा करी ऐशी।
आपणही श्रीसेवेसी। करीत जावें आनंदें ॥20॥

बहुतजण सेवेकरी। बाई मुख्य त्यांमाझारीं।
सर्व अधिकार तिच्या करीं। व्यवस्थेचा होता पैं ॥21॥

या कारणें आपसांत। भांडणें होतीं सदोदीत।
स्वामीसेवेची तेथे। अव्यवस्था होतसे॥22॥

हें बाळाप्पांनीं पाहोन। नाना युक्ती योजून।
मोडुनी टाकिलें भांडण। एकचित्त सर्व केले ॥23॥

बाळाप्पाची प्रेमळ भक्ती। पाहुनी संतोष स्वामीप्रती।
दृढ भाव धरुनी चित्तीं। सेवा करिती आनंदें ॥24॥

ऐसें लोटतां कांहीं दिवस। बाळाप्पाचिया शरीरास।
व्याधी जडली रात्रंदिवस। चैन नसे क्षणभरी ॥25॥

भोग भोगिला कांहीं दिन। कागदाची पुडी बेंबींतून।
पडली ती पाहता उकलोन। विष त्यात निघालें॥26॥

पुर्वी कोण्या कृतघ्नें। बाळाप्पासी यावें मरण।
विष दिधलें कानोल्यांतुन। पडलें आज बाहेर ॥27॥

स्वामीकृपेने आजवरी। गुप्त असे उदरीं।
सदगुरुसेवा त्यांचे करीं। व्हावी लिखित विधीचें ॥28॥

प्रत्येक सोमवारीं तयांनीं। महादेवाची पूजा करोनी।
मग यावें परतोनी। स्वामीसेवेकारणें ॥29॥

हें पाहोनी एकें दिवशीं। बाई विनवी समर्थांसी।
आपण सांगुनी बाळाप्पासी। शंकरपूजनीं वर्जावेें ॥30॥

तैशी आज्ञा तयाप्रती। एके दिनीं समर्थ करिती।
परी बाळाप्पाचे चित्तीं। विश्वास कांहीं पटेना ॥31॥

बाईच्या आग्रहावरून। समर्थें दिली आज्ञा जाण ।
हें नसेल सत्य पूर्ण। विनोद केला निश्चयें ॥32॥

पूजा करणें उचित। न करावी हेंचि सत्य।
यापरी चिठ्ठया लिहित। प्रश्न पहात बाळाप्पा ॥33॥

एक चिठ्ठी तयांतुन। उचलुनी पाहतां वाचून।
न करावेंची पूजन। तियेमाजी लिहिलेंसे ॥34॥

तेव्हां सर्व भ्रांती फिटली। स्वामीआज्ञा सत्य मानिली।
ही भानगड पाहिली। श्रीपाद भटजीनें ॥35॥

श्रीपादभट्ट एके दिवशीं। काय बोलती बाळाप्पासी।
दारा-पुत्र सोडुनी देशीं। आपण येथें राहिलां ॥36॥

आपण आल्यापासोन। आमुचें होतें नुकसान।
ऐसे बोल ऐकोन । बाळाप्पा मनीं खिन्न झाला ॥37॥

स्वामीनीं मज आज्ञा द्यावी। मी जातों आपुल्या गांवीं।
परी तुम्हीं युक्ती योजावी। आज्ञा होईल ऐशीच ॥38॥

श्रीपादभट्टें एके दिवशीं। विचारिलें समर्थांसी।
कुलदेवतेच्या दर्शनासी। जावया इच्छी बाळाप्पा ॥39॥

ऐसें ऐकुनिया समर्थ। हास्यमुखें काय बोलत।
कुलदेवतेचें दर्शन नित्य। बाळाप्पा येथ करीतसे ॥40॥

श्रीपाद म्हणे बाळाप्पासी। समर्थ न देती आज्ञेसी।
तरी टाकुनी चिठ्ठयांसी। आज्ञा द्यावी आपण ॥41॥

तयाचें कपट न जाणोनी। अवश्य म्हणे त्याच दिनीं।
दोन चिठ्ठया लिहोनी। उभयतांनी टाकिल्या ॥42॥

चिठ्ठी आपुल्या करीं। भटजी उचली सत्वरी।
येथें राहुनी चाकरी। करी ऐसें लिहिलेंसे ॥43॥

स्वामीचरणीं दृढ भक्ती। बाळाप्पाची जडली होती।
कैसा दूर तयाप्रती। करितील यती दयाळ ॥44॥

इति श्री स्वामीचरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा प्रेमळ परिसोत। द्वादशोध्याय गोड हा ॥45॥

श्री राजाधिराज योगीराज श्रीस्वामीसमर्थ महाराजार्पणमस्तु॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री बाळप्पांचा मुळ फोटो