Shri Swami Charitra Saramrit English Translation Chapter 6

Shree Swami Samarth

Shri Swami Samarth, my greetings to all Swami devotees. Today, we are going to learn about Shri Swami Charitra Saramrit Chapter 6.

Just as Gurujan holds his finger to his child disciples and recites the initials, Sri Swami Samarth turns to the rest of the story in the previous chapter, admitting that shree swami is transcribing this biography from me. The rest of the previous chapter turns to the story.

Sri Swami tells Cholappa that the King of Baroda has no sense of devotion, so we see no purpose in going there. Cholappa put these words of Shri Swami in Tatyasaheb’s ears. Tatyasaheb was disappointed after hearing this. Fearing that his efforts would be futile, he resumed ritualistic dharma work. And seated Brahmins to observe Gurucharitra’s week. They blew up food stalls and also did charity work. But knowing this hypocritical devotion of Tatyasaheb, Shree Swami ignored him.

Day after day, knowing that the work was not going well, Tatyasaheb once tried to abduct Sri Swami by placing him in a palanquin. However, as soon as he realized this, Shri Swami got down from palanquin at Kadapgaon and reached Akkalkot directly. This happened many times but the response was the same from Sri Swami.

Eventually Tatyasaheb got bored and returned to Baroda. Seeing this, Malharrao Gaikwad sent Yashwantrao, a Maratha Umravas, to Akkalkot. Yashwantrao came to Shri Swami with ornaments, clothes and money. On seeing this, Sri Swami assumed a ruddy form. Seeing his anger, he started to frightened on the spot. And Yashwantrava was told to leave the work there and return to Baroda.

As a result, Malhar Rao lost his kingdom. Malharrao was arrested on the charge of using poison on british man captain . This was the result of Sri Swami’s disobedience. And this is where Sri Swami Charitra Saramrita Chapter VI ends.
Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth.

Along with this we are giving you the sixth chapter of original Swami Charitra Saramrita.

अध्याय सहावा

श्रीगणेशाय नम:।
धरोनी शिशूचा हात। अक्षरें पंडीत लिहवीत।
तैसें हें स्वामीचरित्रामृत। स्वामी समर्थ वदविती ॥1॥

मागील अध्यायाच्या अंतीं। चोळाप्पा विनवी स्वामीप्रती।
कृपा करोनी मजवरती। बडोद्यासी चलावें ॥2॥

भाषण ऐसें ऐकोनी। समर्थ बोलती हासोनी।
मल्हाररावाचिया मनीं। आम्हांविषयीं भाव नसे ॥3॥

म्हणोनी तयाच्या नगरांत। आम्हां जाणें नव्हे उचित।
अक्कलकोट नगरांत। आम्हां राहणें आवडे ॥4॥

ऐसा यत्न व्यर्थ गेला। तात्या मनीं चिंतावला।
आपण आलो ज्या कार्याला। तें न जाय सिद्धीसी ॥5॥

परी पहावा यत्न करोनी। ऐसा विचार केला मनीं।
मग काय केलें तात्यांनीं। अनुष्ठान आरंभिलें ॥6॥

भक्ती नाही अंतरीं। दांभिक साधनांतें करी।
तयांतें स्वामी नरहरी। प्रसन्न कैसे होतील ॥7॥

मग तात्यांनीं काय केलें। सप्ताहासी ब्राह्मण बैसविले।
गुरुचरित्र आरंभिलें। व्हावयासी स्वामीकृपा ॥8॥

परी तयाच्या वाड्यांत। कधीं न गेले समर्थ।
तात्या झाला व्यग्रचित्त। कांहीं उपाय सूचेना ॥9॥

आतां जाउनी बडोद्यासी। काय सांगावें राजयासी।
आणि सकळ जनांसीं। तोंड कैसे दाखवावें॥10॥

ऐशा उपायें करोन। न होती स्वामी प्रसन्न।
आतां एक युक्ती योजून। न्यावें पळवोन यतीसी ॥11॥

असो कोणे एके दिवशीं। साधोनी योग्य समयासी।
मेण्यांत घालोनी स्वामींसी। तात्यासाहेब निघाले ॥12॥

कडपगांवचा मार्ग धरिला। अर्धमार्गीं मेणा आला।
अंतरसाक्षी समर्थाला। गोष्ट विदित जाहली ॥13॥

मेण्यांतुनी उतरले। मागुती अक्कलकोटीं आले।
ऐसें बहुत वेळां घडलें। हाही उपाय खुंटला ॥14॥

मग पुढें राजवाड्यांत। जाउनिया राहिले समर्थ।
तेव्हां उपाय खुंटत। टेंकिलें हात तात्यांनीं ॥15॥

मग अपयशातें घेवोनी। बडोद्यासी आले परतोनी।
समर्थकृपा भक्तीवांचोनी। अन्य उपायें न होय ॥16॥

परी मल्हारराव नृपती। प्रयत्न आरंभीत पुढती।
सर्वत्रांसी विचारिती। कोण जातो स्वामीकडे ॥17॥

तेव्हां मराठा उमराव। यशवंत तयाचें नांव।
नृपकार्याची धरूनी हांव। आपण पुढें जाहला ॥18॥

तो येवोनी अक्कलकोटीं। घेतली समर्थांची भेटी।
वस्त्रें अलंकार सुवर्णताटीं। स्वामीपुढें ठेवित ॥19॥

तीं पाहुनी समर्थांला। तेव्हां अनिवार क्रोध आला।
यशवंता पाहोनी डोळां। काय तेव्हां बोलले ॥20॥


अरे बेडी आणोनी। सत्वर ठोका याचे चरणीं।
ऐसें त्रिवार मोठ्यांनी। समर्थ क्रोधें बोलले ॥21॥

क्रोधमुद्रा पाहोनी। यशवंतराव भ्याला मनीं।
पळालें तोंडचें पाणी। लटलटां कापूं लागला ॥22॥

मग थोड्याच दिवशीं। आज्ञा आली यशवंतासी।
सत्वर यावें बडोद्यासी। तेथील कार्यासी सोडोनी ॥23॥

साहेबा विषप्रयोग केला। मल्हाररावावरी आळ आला।
त्या कृत्यामाजी यशवंताला। गुन्हेगार लेखिले ॥24॥

हातीं पायीं बेडी पडली। स्वामीवचनाची प्रचिती आली।
अघटित लीला दाविली। ख्याती झाली सर्वत्र ॥25॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा भक्त परिसोत। षष्ठोध्याय गोड हा ॥26॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृते षष्ठोध्याय: समाप्त:॥
शुभं भवतु ॥

In a few days we will start a blog on the true experiences of Swami devotees. And also write the name of those who experienced this in the blog. So mail us your experience as soon as possible. Our email address is, rajesh.kamble01@gmail.com
So see you soon with a new article till then to all Swami devotees Sri Swami Samarth ||

Shri Swami Samarth

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ६

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  ६

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय सहावा या बद्दल जाणून घेणार आहोत.

ज्या प्रमाणे गुरूजन आपल्या बाल शिष्यांना त्यांचे बोट धरून मुळाक्षरे गीरवतात, त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ माझ्या, मतीमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबुल करीत, मागील अध्यायातील उर्वरित कथेकडे वळतात.

श्री स्वामी चोळप्पांना सांगतात की, बडोद्याच्या राजाच्या मनात भक्ती भावच नाही, म्हणून तिथे जाण्याचे आम्हाला काही प्रयोजन वाटत नाही. श्री स्वामींचे हे बोलणे चोळप्पांनी तात्यासाहेबांच्या कानावर घातले. हे ऐकून तात्यासाहेब निराश झाले. आपले प्रयत्न निष्फळ होतील या भितीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्य सुरू केली. आणि गुरूचरित्राचा सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बसविले. जेवणावळी उठवल्या आणि दानधर्मही केले. परंतु ही तात्यासाहेबांची दांभिक भक्ती ओळखून त्यांच्याकडे श्री स्वामींनी दुर्लक्ष केले.

दिवसामागून दिवस गेले, कार्य काही यशस्वी होत नाही हे जाणून, तात्यासाहेबांनी एकदा चक्क श्री स्वामींना मेण्यात बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र‌ हे लक्षात येताच अर्ध्या रस्त्यात कडपगावच्या ठिकाणी श्री स्वामी मेण्यातून उतरले आणि थेट अक्कलकोटला पोहोचले. असे अनेकदा घडले पण त्याचे प्रतिउत्तरही श्री स्वामींकडून तसेच मिळाले.

अखेरीस कंटाळून तात्यासाहेब पुन्हा बडोद्यास परतले. हे पाहून मल्हारराव गायकवाडांनी यशवंतराव या मराठा उमरावास अक्कलकोटला पाठवले. यशवंतराव अलंकार, वस्त्र, आभुषणे आणि द्रव्य घेऊन श्री स्वामींपाशी आले. हे पाहताच श्री स्वामींनी रौद्र रूप धारण केले. त्यांचा हा क्रोधावतार पाहून यशवंतराव जागीच लटलटा‌ कापू लागला. आणि तेथील कार्य सोडून बडोद्यास परतावे असा यशवंतरावास निरोप आला.

याचा परिणाम असा झाला की, मल्हाररावांना आपलं राज्य गमवावे लागले. कोण्या एका साहेबांवर विषप्रयोग करण्याच्या आरोपाखाली मल्हाररावांना अटक करण्यात आली. श्री स्वामींच्या अवकृपेचच हे फळ होते. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय सहावा समाप्त होतो.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय सहावा देत आहोत.

अध्याय सहावा

श्रीगणेशाय नम:।
धरोनी शिशूचा हात। अक्षरें पंडीत लिहवीत।
तैसें हें स्वामीचरित्रामृत। स्वामी समर्थ वदविती ॥1॥

मागील अध्यायाच्या अंतीं। चोळाप्पा विनवी स्वामीप्रती।
कृपा करोनी मजवरती। बडोद्यासी चलावें ॥2॥

भाषण ऐसें ऐकोनी। समर्थ बोलती हासोनी।
मल्हाररावाचिया मनीं। आम्हांविषयीं भाव नसे ॥3॥

म्हणोनी तयाच्या नगरांत। आम्हां जाणें नव्हे उचित।
अक्कलकोट नगरांत। आम्हां राहणें आवडे ॥4॥

ऐसा यत्न व्यर्थ गेला। तात्या मनीं चिंतावला।
आपण आलो ज्या कार्याला। तें न जाय सिद्धीसी ॥5॥

परी पहावा यत्न करोनी। ऐसा विचार केला मनीं।
मग काय केलें तात्यांनीं। अनुष्ठान आरंभिलें ॥6॥

भक्ती नाही अंतरीं। दांभिक साधनांतें करी।
तयांतें स्वामी नरहरी। प्रसन्न कैसे होतील ॥7॥

मग तात्यांनीं काय केलें। सप्ताहासी ब्राह्मण बैसविले।
गुरुचरित्र आरंभिलें। व्हावयासी स्वामीकृपा ॥8॥

परी तयाच्या वाड्यांत। कधीं न गेले समर्थ।
तात्या झाला व्यग्रचित्त। कांहीं उपाय सूचेना ॥9॥

आतां जाउनी बडोद्यासी। काय सांगावें राजयासी।
आणि सकळ जनांसीं। तोंड कैसे दाखवावें॥10॥

ऐशा उपायें करोन। न होती स्वामी प्रसन्न।
आतां एक युक्ती योजून। न्यावें पळवोन यतीसी ॥11॥

असो कोणे एके दिवशीं। साधोनी योग्य समयासी।
मेण्यांत घालोनी स्वामींसी। तात्यासाहेब निघाले ॥12॥

कडपगांवचा मार्ग धरिला। अर्धमार्गीं मेणा आला।
अंतरसाक्षी समर्थाला। गोष्ट विदित जाहली ॥13॥

मेण्यांतुनी उतरले। मागुती अक्कलकोटीं आले।
ऐसें बहुत वेळां घडलें। हाही उपाय खुंटला ॥14॥

मग पुढें राजवाड्यांत। जाउनिया राहिले समर्थ।
तेव्हां उपाय खुंटत। टेंकिलें हात तात्यांनीं ॥15॥

मग अपयशातें घेवोनी। बडोद्यासी आले परतोनी।
समर्थकृपा भक्तीवांचोनी। अन्य उपायें न होय ॥16॥

परी मल्हारराव नृपती। प्रयत्न आरंभीत पुढती।
सर्वत्रांसी विचारिती। कोण जातो स्वामीकडे ॥17॥

तेव्हां मराठा उमराव। यशवंत तयाचें नांव।
नृपकार्याची धरूनी हांव। आपण पुढें जाहला ॥18॥

तो येवोनी अक्कलकोटीं। घेतली समर्थांची भेटी।
वस्त्रें अलंकार सुवर्णताटीं। स्वामीपुढें ठेवित ॥19॥

तीं पाहुनी समर्थांला। तेव्हां अनिवार क्रोध आला।
यशवंता पाहोनी डोळां। काय तेव्हां बोलले ॥20॥

अरे बेडी आणोनी। सत्वर ठोका याचे चरणीं।
ऐसें त्रिवार मोठ्यांनी। समर्थ क्रोधें बोलले ॥21॥

क्रोधमुद्रा पाहोनी। यशवंतराव भ्याला मनीं।
पळालें तोंडचें पाणी। लटलटां कापूं लागला ॥22॥

मग थोड्याच दिवशीं। आज्ञा आली यशवंतासी।
सत्वर यावें बडोद्यासी। तेथील कार्यासी सोडोनी ॥23॥

साहेबा विषप्रयोग केला। मल्हाररावावरी आळ आला।
त्या कृत्यामाजी यशवंताला। गुन्हेगार लेखिले ॥24॥

हातीं पायीं बेडी पडली। स्वामीवचनाची प्रचिती आली।
अघटित लीला दाविली। ख्याती झाली सर्वत्र ॥25॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा भक्त परिसोत। षष्ठोध्याय गोड हा ॥26॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृते षष्ठोध्याय: समाप्त:॥
शुभं भवतु ॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामी समर्थ

Shri Swami Charitra Saramrit English translation chapter 5

Shree Swami Samarth

Shri Swami Samarth, my greetings to all Shree Swami devotees. Today, we are going to know about the fifth Chapter of Shri Swami Charitra Saramrit .

In the beginning of the chapter, the librarian has made a statement that if the co -operatives of the devine men are involved, then there are good changes among the devotees. Shri Swami’s association with those who have been formerly virtue. The Akkalkot resident people were the ultimate lucky. The Maloji kings of Akkalkot got the cooperation of the divine gentlemen like Shri Swami due to this Virtue.

Shri Swami’s fame was spread all over India. Not only that, reached the ear of Malharrao Gaikwad, the king of Baroda, Malharrao Gaikwad thought that we should bring Shri Swami directly from Akkalkot to our Baroda. For this, they proposed to give respect to many of the wealthy lamps as well as the chieftains, who brought Shri Swami to Baroda and give them honors.

Upon hearing this, the knowledgeable congregations took a step away. However, Tatyasaheb took the voice of bringing Shri Swami to Baroda. On leaving Akkalkota, Tatyasheb took many wealth and many servants from Malharrao, and Tatyasaheb reached Akkalkot. Tatyasaheb gave the petitioners a substance to please Shri Swami. Also, many were satisfied with a large meal. Tatyasaheb reached Cholappa and made the desire to give ten thousand sacks. At that time, Cholappa was happy to have a wealth. So Cholappa hoped for wealth.

Cholappa removed the subject with Shri Swami. And he said that you will be honored when you go to Baroda, . Then Shri Swami laughed and said, “Oh, they have no devotion, what use to go there?” Here, while ending the pre -story of the story, the librarian has done about the latter. In this way, the ends the fifth Chapter of Shri Swami Charitra Saramrit .
Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth

At the same time, we are giving you the fifth chapter of the original Swami charitra Saramrit for you.

अध्याय पाचवा

श्रीगणेशाय नम:।
भवकानन वैश्वानरा। अज्ञानतमच्छेदका भास्करा।
पूर्णसाक्षी परात्परा। भक्तां खरा सदय तूं ॥1॥

अक्कलकोट नगरांत। एक तपपर्यंत।
स्वामीराज वास करीत। भक्त बहुत जाहले ॥2॥

वार्ता पसरली चहूंकडे। कोणासी पडतां सांकडें।
धाव घेती स्वामींकडे। राजेरजवाडे थोर थोर ॥3॥

तेव्हां कितिएक नृपती। स्वामीदर्शन घेऊं इच्छिति।
आणि आपुल्या नगराप्रती। आणूं म्हणती तयांसी ॥4॥

बडोद्यामाजी त्या अवसरीं। मल्हारराव राज्याधिकारी।
एकदा तयांचे अंतरीं। विचार ऐसा पातला ॥5॥

दिवाण आणि सरदार। मानकरी तैसे थोर थोर।
बैसले असतां समग्र। बोले नृपवर तयांप्रती ॥6॥

कोणी जाउनी अक्कलकोटासी। येथें आणील स्वामींसी।
तरी आम्ही तयासी। इनाम देऊं बहुत ॥7॥

कार्य जाणूनि कठिण। कोणी न बोलती वचन।
कोणाएका लागून। गोष्ट मान्य करवेना ॥8॥

तेव्हां तात्यासाहेब सरदार। होता योग्य आणि चतुर।
तो बोलता झाला उत्तर। नृपालागीं परियेसी ॥9॥

आपुली जरी इच्छा ऐसी। स्वामीतें आणावें वटपुरीसी।
तरी मी आणीन तयांसी। निश्चय मानसीं असो द्या ॥10॥

ऐसें ऐकोनी उत्तर। संतोषला तो नृपवर।
तैसी सभाही समग्र। आनंदित जाहली ॥11॥

नृपतीसह सकळ जने। त्यापरी तात्यासी सन्मानें।
गौरवोनी मधुर वचनें। यशस्वी हो म्हणती तया ॥12॥

तात्यासाहेब निघाले। सत्वर अक्कलकोटीं आले।
नगर पाहुनी संतोषले। जें केवळ वैकुंठ ॥13॥

पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती। आनंदित झाले चित्तीं।
तेथील जनांची पाहुनी भक्ती। धन्य म्हणती तयांतें ॥14॥

अक्कलकोटींचे नृपती। स्वामीचरणीं त्यांची भक्ती ।
राजघराण्यांतील युवती। त्याही करिती स्वामीसेवा ॥15॥

ऐसें पाहुनी तात्यांसी। विचार पडला मानसीं।
या नगरांतुनी स्वामींसी। कैसें नेऊं आपण ॥16॥

प्रयत्नांती परमेश्वर। प्रयत्नें कार्य होय सत्वर।
लढवोनी युक्ती थोर। कार्य आपण साधावें ॥17॥

करोनी नाना पक्वान्नेंं। करिती ब्राह्मणभोजनें।
दिधलीं बहुसाल दानें। याचक धनें तृप्ते केले ॥18॥

स्वामीचिया पूजेप्रती। नाना द्रव्यें समर्पिती।
जेणें सेवेकरी संतुष्ट होती। ऐसें करिती सर्वदा ॥19॥

ऐशियानें कांहीं न झालें। केलें तितुकें व्यर्थ गेलें।
तात्या मनीं खिन्न झाले। विचार पडला तयांसी ॥20॥

मग लढविली एक युक्ती। एकांती गांठुनी चोळाप्पाप्रती।
त्याजलागीं विनंती करिती। बुध्दिवाद सांगती त्या ॥21॥

जरी तुम्ही समर्थांसी। घेउनी याल बडोद्यासी।
मग मल्हारराव आदरेंसी। इनाम देतील तुम्हांतें ॥22॥

द्रव्येण सर्वे वशा:। चोळाप्पासी लागली आशा।
तयाच्या अंतरीं भरंवसा। जहागिरीचा बहुसाल ॥23॥

चोळाप्पानें कर जोडोनी। विनंती केली मधुर वचनीं।
कृपाळू होउनी समर्थांनीं। बडोद्याप्रती चलावें ॥24॥

तेणें माझें कल्याण। मिळेल मला बहुत धन।
आपुलाही योग्य सन्मान। तेथें जातां होईल ॥25॥

ऐसें ऐकोनियां वचन। समर्थांनीं हास्य करोन।
उत्तर चोळाप्पा लागोन। काय दिलें सत्वर ॥26॥

रावमल्हार नृपती। त्याच्या अंतरी नाहीं भक्ती।
मग आम्हीं बडोद्याप्रती। काय म्हणोनी चलावें ॥27॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा ऐकोत भाविक भक्त। पंचमोध्याय गोड हा ॥28॥

श्रीरस्तु। शुभं भवतु॥

Within a few days, we will start a blog on the truth experiences of Swami devotees. And those who experienced these experiences will write in the blog. So as soon as possible, you have your experiences. Send them us our e mail is adress, rajesh.kamble01@gmail.com
So soon we will meet by the new article.

Shri Swami Samarth to all the devotees

Shree Swami Samarth

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ५

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  ५

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, आपणा सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय पाचवा याबद्दल जाणून घेणार आहोत.

अध्यायाला सुरूवात करताना ग्रंथकाराने, जर सत्पुरुषांचा सहवास लाभला तर भक्तांमध्ये उत्तम बदल घडून येतात असे विधान केले आहे. ज्यांची पुर्व पुण्याई आहे त्यांनाच श्री स्वामींचा सहवास लाभला. अक्कलकोट निवासी जनता तर परम भाग्यशाली होती. अक्कलकोटच्या मालोजी राजांना ही पुर्व पुण्याई मुळेच श्री स्वामीं सारख्या दिव्य सत्पुरुषांचा सहवास लाभला.

श्री स्वामींची किर्ती पुर्ण भारतभर पसरली होती. इतकेच नव्हे तर बडोद्याचे राजाधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या कानावर पोहोचली. मल्हारराव गायकवाडांच्या मनात विचार आला की, आपण श्री स्वामींना अक्कलकोटहून थेट आपल्या बडोद्यास घेऊन यावे. या करिता त्यांनी अनेक मातब्बर दिवाण तसेच सरदारां समोर, जो कोणी श्री स्वामींना बडोद्यास घेऊन येईल त्याला आम्ही इनाम आणि जहागीरी देऊन, मानसन्मान देऊ, असा प्रस्ताव ठेवला.

हे ऐकून जाणत्या मंडळींनी काढता पाय घेतला. मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा विडा उचलला. अक्कलकोटास निघताना तात्यासाहेबांनी मल्हाररावांकडून बरेचसे धन आणि बराचसा सेवकांचा तांडा घेतला, आणि तात्यासाहेब अक्कलकोटास पोहोचले. श्री स्वामींना खुष करण्यासाठी तात्यासाहेबांनी याचकांना धन द्रव्य दिले. तसेच अनेकांना मोठ्या जेवणावळी घालून संतुष्ट केले. तात्यासाहेबांनी चोळप्पाला गाठून दहा हजारांची जहागीरी देण्याचे आमिष ही दावले. चोळप्पांना त्यावेळी धनाची चणचण भासत होती. त्यामुळे चोळप्पांला धनाची आशा लागली.

चोळप्पानी हा विषय श्री स्वामींपाशी काढला. आणि आपण बडोद्यास गेल्यावर आपला योग्य सन्मान होईल असे सांगितले. तेव्हा श्री स्वामी हसले आणि म्हणाले, “अरे त्यांच्या मनात भक्तीच नाही, तिथे जाऊन काय उपयोग?” इथे कथेचा पुर्वार्ध संपविताना ग्रंथकाराने उत्तरार्धा विषयी सुतोवाच केलेला आहे. अशा रीतीने श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय पाचवा समाप्त होतो.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ

सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय पाचवा देत आहोत.

अध्याय पाचवा

श्रीगणेशाय नम:।
भवकानन वैश्वानरा। अज्ञानतमच्छेदका भास्करा।
पूर्णसाक्षी परात्परा। भक्तां खरा सदय तूं ॥1॥

अक्कलकोट नगरांत। एक तपपर्यंत।
स्वामीराज वास करीत। भक्त बहुत जाहले ॥2॥

वार्ता पसरली चहूंकडे। कोणासी पडतां सांकडें।
धाव घेती स्वामींकडे। राजेरजवाडे थोर थोर ॥3॥

तेव्हां कितिएक नृपती। स्वामीदर्शन घेऊं इच्छिति।
आणि आपुल्या नगराप्रती। आणूं म्हणती तयांसी ॥4॥

बडोद्यामाजी त्या अवसरीं। मल्हारराव राज्याधिकारी।
एकदा तयांचे अंतरीं। विचार ऐसा पातला ॥5॥

दिवाण आणि सरदार। मानकरी तैसे थोर थोर।
बैसले असतां समग्र। बोले नृपवर तयांप्रती ॥6॥

कोणी जाउनी अक्कलकोटासी। येथें आणील स्वामींसी।
तरी आम्ही तयासी। इनाम देऊं बहुत ॥7॥

कार्य जाणूनि कठिण। कोणी न बोलती वचन।
कोणाएका लागून। गोष्ट मान्य करवेना ॥8॥

तेव्हां तात्यासाहेब सरदार। होता योग्य आणि चतुर।
तो बोलता झाला उत्तर। नृपालागीं परियेसी ॥9॥

आपुली जरी इच्छा ऐसी। स्वामीतें आणावें वटपुरीसी।
तरी मी आणीन तयांसी। निश्चय मानसीं असो द्या ॥10॥

ऐसें ऐकोनी उत्तर। संतोषला तो नृपवर।
तैसी सभाही समग्र। आनंदित जाहली ॥11॥

नृपतीसह सकळ जने। त्यापरी तात्यासी सन्मानें।
गौरवोनी मधुर वचनें। यशस्वी हो म्हणती तया ॥12॥

तात्यासाहेब निघाले। सत्वर अक्कलकोटीं आले।
नगर पाहुनी संतोषले। जें केवळ वैकुंठ ॥13॥

पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती। आनंदित झाले चित्तीं।
तेथील जनांची पाहुनी भक्ती। धन्य म्हणती तयांतें ॥14॥

अक्कलकोटींचे नृपती। स्वामीचरणीं त्यांची भक्ती ।
राजघराण्यांतील युवती। त्याही करिती स्वामीसेवा ॥15॥

ऐसें पाहुनी तात्यांसी। विचार पडला मानसीं।
या नगरांतुनी स्वामींसी। कैसें नेऊं आपण ॥16॥

प्रयत्नांती परमेश्वर। प्रयत्नें कार्य होय सत्वर।
लढवोनी युक्ती थोर। कार्य आपण साधावें ॥17॥

करोनी नाना पक्वान्नेंं। करिती ब्राह्मणभोजनें।
दिधलीं बहुसाल दानें। याचक धनें तृप्ते केले ॥18॥

स्वामीचिया पूजेप्रती। नाना द्रव्यें समर्पिती।
जेणें सेवेकरी संतुष्ट होती। ऐसें करिती सर्वदा ॥19॥

ऐशियानें कांहीं न झालें। केलें तितुकें व्यर्थ गेलें।
तात्या मनीं खिन्न झाले। विचार पडला तयांसी ॥20॥

मग लढविली एक युक्ती। एकांती गांठुनी चोळाप्पाप्रती।
त्याजलागीं विनंती करिती। बुध्दिवाद सांगती त्या ॥21॥

जरी तुम्ही समर्थांसी। घेउनी याल बडोद्यासी।
मग मल्हारराव आदरेंसी। इनाम देतील तुम्हांतें ॥22॥

द्रव्येण सर्वे वशा:। चोळाप्पासी लागली आशा।
तयाच्या अंतरीं भरंवसा। जहागिरीचा बहुसाल ॥23॥

चोळाप्पानें कर जोडोनी। विनंती केली मधुर वचनीं।
कृपाळू होउनी समर्थांनीं। बडोद्याप्रती चलावें ॥24॥

तेणें माझें कल्याण। मिळेल मला बहुत धन।
आपुलाही योग्य सन्मान। तेथें जातां होईल ॥25॥

ऐसें ऐकोनियां वचन। समर्थांनीं हास्य करोन।
उत्तर चोळाप्पा लागोन। काय दिलें सत्वर ॥26॥

रावमल्हार नृपती। त्याच्या अंतरी नाहीं भक्ती।
मग आम्हीं बडोद्याप्रती। काय म्हणोनी चलावें ॥27॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा ऐकोत भाविक भक्त। पंचमोध्याय गोड हा ॥28॥

श्रीरस्तु। शुभं भवतु॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामी समर्थ

Shri Swami Chariitra Saramrit English Translation Chapter 4

Shri Swami Chariitra Saramrit English Translation Chapter 4

Shree Swami Samarth

Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth
Remembering, hearing, listening to Shri Swami Naam and worshiping them and doing so in the hymn of Swami, there is no need to do other religious activities, pilgrimage, yoga, yoga and home. Only the Swami Naam is constantly being achieved, and all four men are achieved and the birth of the birth is liberated.

In the previous chapter, we saw Shri Swami’s King Maloji Rao of Akkalkot, and came back to Cholappa’s house. Although Cholappa was poor and poor, he received the renewable treasure of Shri Swami Naam and Sahajas.

Shri Swami examined the Sahavasa Darmanan Cholappa and his family. However, they all came to the forefront of the masters and became the doers of Shri Swami Kripa. In Akkalkot, the fame of Shri Swami spread everywhere and all over. The devotees started coming from far away to Akkalkot. Many people’s desires began to be fulfilled. The proportion of devotees coming to Shri Swami Charani started to increase day by day. However, there were some crooked blasphemous.

Once upon a time, two monks came to Akkalkotas to take the exam of Shri Swami. Shri Swamy recognized his crooked purpose. On that day, Shri Swami was in the house of the devotee, with many visits with a fruitful platters. However, Shri Swamy’s put Prasad forward to the two monks . But because Shri Swami himself was hungry all day, the monks did not even eat the fruits.

Likewise, the whole day went on. And both of them were only hungry that day. Because after the sunset, the meal is forbidden. From this, he was convinced that Shri Swami was not a hypocritical monk. In this way, Shri Swami Charitra Saramrit Chapter four ends here.
Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth.
At the same time, we are giving you the fourth chapter of the original Swami charitra Saramrita.

अध्याय चौथा

श्रीगणेशाय नम: ।
स्वामीनामाचा जप करितां। चारी पुरुषार्थ येती हाता।
स्वामीचरित्र गातां ऐकतां। पुनरावृत्ती चुकेल ॥1॥

गताध्यायाचे अंतीं। अक्कलकोटीं आले यती।
नृपराया दर्शन देती। स्वेच्छेनें राहती तया पुरीं ॥2॥

चोळाप्पाचा दृढ भाव। घरीं राहिले स्वामीराव।
हें तयाचें सुकृत पूर्व । नित्य सेवा घडे त्यातें ॥3॥

चोळाप्पाची सदगुणी कांता। तीही केवळ पतिव्रता।
सदोदित तिच्या चित्ता। आनंद स्वामीसेवेचा ॥4॥

स्वामी केवळ ईश्वरमूर्ती। देशोदेशीं झाली ख्याती।
बहुत लोक दर्शना येती। कामना चित्तीं धरोनी ॥5॥

कोणी संपत्तीकारणें। कोणी मागती संतानें।
व्हावें म्हणोनिया लग्न। येती दूर देशाहुनी ॥6॥

शरीरभोगें कष्टले। संसारतापें तप्त झाले।
मायामय पसार्‍यातें फसले। ऐसे आले कितीएक ॥7॥

भक्त अंतरीं जें जें इच्छिती। तें तें यतिराज पुरविती ।
दृढ चरणीं जयांची भक्ती। त्यांसीं होती कल्पतरू ॥8॥

जे कां निंदक कुटिल। तयां शास्ते केवळ।
नास्तिकांप्रती तत्काळ। योग्य शासन करिताती ॥9॥

कोणी दोन संन्यासी। आले अक्कलकोटासी।
हंसोनी म्हणती जनांसी। ढोंगियाच्या नादीं लागलां ॥10॥

हा स्वामी नव्हे ढोंगी। जो नाना भोग भोगी।
साधू लक्षण याचे अंगी। कोणतें हो वसतसे ॥11॥

ऐसें तयांनीं निंदिले। समर्थांनीं अंतरीं जाणिलें।
जेव्हां ते भेटीसी आले। तेव्हां केलें नवल एक ॥12॥

एका भक्ताचिया घरीं। पातली समर्थांची स्वारी।
तेही दोघे अविचारी। होते बरोबरी संन्यासी ॥13॥

तेथें या तिन्ही मूर्ती। बैसविल्या भक्तें पाटावरती।
श्रीस्वामी आपुले चित्ती। चमत्कार म्हणती करूं आतां ॥14॥

दर्शनेच्छु जन असंख्यात। पातले तेथे क्षणार्धांत।
समाज दाटला बहुत। एकची गर्दी जाहली ॥15॥

दर्शन घेउनी चरणांचें। मंगल नाम गर्जती वाचें।
हेतू पुरवावे मनींचे। म्हणोनियां विनविती ॥16॥

कोणी द्रव्य पुढें ठेविती। कोणी फळे समर्पिती।
नानावस्तु अर्पण करिती। नाही मिती तयांतें ॥17॥

कोणी नवसातें करिती। कोणी आणोनिया देती।
कोणी कांहीं संकल्प करिती। चरण पूजिती आनंदें ॥18॥

संन्यासी कौतुक पाहती। मनामाजी आश्चर्य करिती।
क्षण एक तटस्थ होती। वैरभाव विसरोनी ॥19॥

स्वामीपुढें जे जे पदार्थ। पडले होते असंख्यात।
ते निजहस्तें समर्थ। संन्याशापुढें लोटिती ॥20॥

मोडली जनांची गर्दी। तों येवोनी सेवेकरी।
संन्याशांपुढल्या नानापरी। वस्तू नेऊं लागले ॥21॥

समर्थांनी त्या दिवशीं। स्पर्श न केला अन्नोदकासी।
सूर्य जातां अस्ताचळासी। तेथोनिया ऊठले ॥22॥

दोघे संन्यासी त्या दिवशीं। राहिले केवळ उपवासी।
रात्र होता तयांसी। अन्नोदक वर्ज्य असे ॥23॥

जे पातले करुं छळणा। त्यांची जाहली विटंबना।
दंडावया कुत्सित जनां। अवतरले यतिवर्य ॥24॥

इति श्री स्वामी चरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत प्रेमळ भक्त। चतुर्थोध्याय गोड हा ॥25॥

श्रीस्वामीराजार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥

Within a few days, we will start a blog on the truth experiences of Swami devotees. And those who experienced these experiences will write in the blog. So as soon as possible, you have your experiences. Send them us our e mail is adress, rajesh.kamble01@gmail.com
So soon we will meet by the new article. Shri Swami Samarth to all the devotees

Shree Swami Samarth

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ४

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ४

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी नामाचे स्मरण, श्रवण करणे तसेच त्यांचे पूजन करणे आणि स्वामींच्या भजन कीर्तनात मग्न होने इतके श्रेष्ठ कार्य करणार्यांना इतर धर्मकार्य, तीर्थाटन, योगाभ्यास, होमहवन असे काही करण्याची गरज नाही. केवळ स्वामी नाम सतत घेत राहील्याने चारही पुरूषार्थ साध्य होतात आणि जन्म मृत्युच्या फेर्यातुन मुक्तता होते.

मागील अध्यायात आपण पाहीले श्री स्वामींनी अक्कलकोटचे राजे मालोजी रावांना साक्षात दर्शन दिले, आणि पुन्हा चोळप्पाच्या घरी आले. चोळप्पा जरी निर्धन आणि गरीब असले तरी त्यांना श्री स्वामी नामाचा आणि सहवासाचा अक्षय्य खजिनाच प्राप्त झाला.

श्री स्वामींनी सहवासा दर्म्यान चोळप्पांची आणि त्यांच्या कुटुंबीयांनची हरतर्हेने परीक्षा घेतली. मात्र ते सर्व स्वामींच्या कसोटीत पुर्ण उतरले आणि श्री स्वामी कृपा प्राप्त कर्ते झाले. अक्कलकोटात श्री स्वामींची किर्ती सर्वत्र व सर्वदूर पसरली. दूर दूरच्या गावाहून भक्तजन अक्कलकोटास येऊ लागले. अनेकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. श्री स्वामीं चरणी येणार्या भक्तांचे प्रमाण दिवसागणिक वाढू लागले. मात्र, त्यात काही कुटील निंदकही होते.

असेच एकदा दोन संन्यासी श्री स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले. श्री स्वामींनी त्यांचा कुटील हेतू ओळखला. त्या दिवशी श्री स्वामी ज्या भक्ताच्या घरी होते तेथे अनेक दर्शनार्थी फळफळावळ घेऊन जमले होते. मात्र श्री स्वामींनी आलेला प्रसाद त्या दोन संन्यासी पुढे ठेवला. परंतु श्री स्वामी स्वतः दिवसभर उपाशी असल्याने ते संन्यासी देखील जेवले नाहीत.

अशातच संपूर्ण दिवस सरला. आणि ते दोघेही संन्यासी त्या दिवशी केवळ उपाशी राहिले. कारण सुर्यास्तानंतर संन्यासाला भोजन वर्ज्य आहे. यावरून श्री स्वामी हे ढोंगी साधू नाहीत याची खात्री पटल्याने ते संन्यासी श्री स्वामींची क्षमा याचना करु लागले. अशा रीतीने श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय चौथा इथं समाप्त होतो.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.


सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय चौथा देत आहोत.

अध्याय चौथा

श्रीगणेशाय नम: ।
स्वामीनामाचा जप करितां। चारी पुरुषार्थ येती हाता।
स्वामीचरित्र गातां ऐकतां। पुनरावृत्ती चुकेल ॥1॥

गताध्यायाचे अंतीं। अक्कलकोटीं आले यती।
नृपराया दर्शन देती। स्वेच्छेनें राहती तया पुरीं ॥2॥

चोळाप्पाचा दृढ भाव। घरीं राहिले स्वामीराव।
हें तयाचें सुकृत पूर्व । नित्य सेवा घडे त्यातें ॥3॥

चोळाप्पाची सदगुणी कांता। तीही केवळ पतिव्रता।
सदोदित तिच्या चित्ता। आनंद स्वामीसेवेचा ॥4॥

स्वामी केवळ ईश्वरमूर्ती। देशोदेशीं झाली ख्याती।
बहुत लोक दर्शना येती। कामना चित्तीं धरोनी ॥5॥

कोणी संपत्तीकारणें। कोणी मागती संतानें।
व्हावें म्हणोनिया लग्न। येती दूर देशाहुनी ॥6॥

शरीरभोगें कष्टले। संसारतापें तप्त झाले।
मायामय पसार्‍यातें फसले। ऐसे आले कितीएक ॥7॥

भक्त अंतरीं जें जें इच्छिती। तें तें यतिराज पुरविती ।
दृढ चरणीं जयांची भक्ती। त्यांसीं होती कल्पतरू ॥8॥

जे कां निंदक कुटिल। तयां शास्ते केवळ।
नास्तिकांप्रती तत्काळ। योग्य शासन करिताती ॥9॥

कोणी दोन संन्यासी। आले अक्कलकोटासी।
हंसोनी म्हणती जनांसी। ढोंगियाच्या नादीं लागलां ॥10॥

हा स्वामी नव्हे ढोंगी। जो नाना भोग भोगी।
साधू लक्षण याचे अंगी। कोणतें हो वसतसे ॥11॥

ऐसें तयांनीं निंदिले। समर्थांनीं अंतरीं जाणिलें।
जेव्हां ते भेटीसी आले। तेव्हां केलें नवल एक ॥12॥

एका भक्ताचिया घरीं। पातली समर्थांची स्वारी।
तेही दोघे अविचारी। होते बरोबरी संन्यासी ॥13॥

तेथें या तिन्ही मूर्ती। बैसविल्या भक्तें पाटावरती।
श्रीस्वामी आपुले चित्ती। चमत्कार म्हणती करूं आतां ॥14॥

दर्शनेच्छु जन असंख्यात। पातले तेथे क्षणार्धांत।
समाज दाटला बहुत। एकची गर्दी जाहली ॥15॥

दर्शन घेउनी चरणांचें। मंगल नाम गर्जती वाचें।
हेतू पुरवावे मनींचे। म्हणोनियां विनविती ॥16॥

कोणी द्रव्य पुढें ठेविती। कोणी फळे समर्पिती।
नानावस्तु अर्पण करिती। नाही मिती तयांतें ॥17॥

कोणी नवसातें करिती। कोणी आणोनिया देती।
कोणी कांहीं संकल्प करिती। चरण पूजिती आनंदें ॥18॥

संन्यासी कौतुक पाहती। मनामाजी आश्चर्य करिती।
क्षण एक तटस्थ होती। वैरभाव विसरोनी ॥19॥

स्वामीपुढें जे जे पदार्थ। पडले होते असंख्यात।
ते निजहस्तें समर्थ। संन्याशापुढें लोटिती ॥20॥

मोडली जनांची गर्दी। तों येवोनी सेवेकरी।
संन्याशांपुढल्या नानापरी। वस्तू नेऊं लागले ॥21॥

समर्थांनी त्या दिवशीं। स्पर्श न केला अन्नोदकासी।
सूर्य जातां अस्ताचळासी। तेथोनिया ऊठले ॥22॥

दोघे संन्यासी त्या दिवशीं। राहिले केवळ उपवासी।
रात्र होता तयांसी। अन्नोदक वर्ज्य असे ॥23॥

जे पातले करुं छळणा। त्यांची जाहली विटंबना।
दंडावया कुत्सित जनां। अवतरले यतिवर्य ॥24॥

इति श्री स्वामी चरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत प्रेमळ भक्त। चतुर्थोध्याय गोड हा ॥25॥

श्रीस्वामीराजार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

Technology affecting job Market

How has technology changed your job?

,After a few days only few jobs and workers will be left in our country.The number of workers will be reduced and only drivers, security guards, and office workers will be few and far between. Henceforth the situation will be very critical for less as well as highly educated men. Because women will have the right and monopoly on most of the jobs. Here women should not, as always, take a different meaning, that I am speaking against women. I am only talking about rising unemployment.

Shri Swami Chariitra Saramrit English translation chapter 3

Shree Swami Samarth

Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth.
My greetings to all the Swami devotees, We saw in the previous chapter, that Saheb came from Calcutta and answered shree Swami where he came from, and Shri Swami told about himself. And Swami’s statement has come in Mangalveda.

Now in this chapter, the story of Shri Swami’s Akkalkot Agamana is mentioned. From Mangalveda, Shri Swami arrived in Solapur via Pandharpur, Begumpur, Mohol. Swami’s devotees were accompanied by a Chitopant Tol while starting to enter Akkalkot. However, for some work, Tol had to return from half -way, Shri Swami left alone towards Akkalkot.

At the moment of arriving at Akkalkot, he first showed a miracle to a Muslim man, and later, Swami stayed at Cholappa’s house., Shri Swami Kripadhan came to Cholappa’s house. Shri Swamy made immense love and grace on devotees who have the power of devotion, even though there is no such kind of yoga.

When the fame of Shri Swami, who lives in the house of Cholappa, the king of Akkalkot reached the ears of Maloji, Swami came to the palace while he was eager to see Shri Swami. All the Rajya Sabha was amazed at the fact that the Swami was standing in front. Rajesaheb also got down from the throne and ran and ran the Shri Swami churches.

Sri Vishnu is busy with Brahmananda by holding the footpath of the formless Nirgun Shri Swami, who has come to the Brahmananda, and here it is the third chapter of Shri Swami Charitra Saramrita.
Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth.
At the same time, we are giving you a third of the chapter of the original Swami character Saramrita.

                   ‌         अध्याय तिसरा
श्रीगणेशाय नम:।
धन्य धन्य ते या जगतीं। स्वामीचरणीं ज्यांची भक्ती।
त्यांसी नाही पुनरावृत्ती । पद पावती कैवल्य ॥1॥

निर्विकार स्वामीमूर्ती। लोकां चमत्कार दाविती।
कांहीं वर्षें करोनी वस्ती। मंगळवेढें सोडिलें ॥2॥

मोहोळामाजी वास्तव्य करीत। आप्पा टोळ झाले भक्त।
तेथींचे साकल्य वृत्त। अल्पमती केवीं वर्णूं ॥3॥

सवे घेउनी स्वामींसी। टोळ जाती अक्कलकोटासी।
अर्धमार्गावरुनी टोळांसी। मागें परतणें भाग पडे ॥4॥

टोळ गेलिया परतोनी। स्वामी चालले उठोनी।
बहुत वर्जिलें सेवकांनीं। परी नच मानिलें त्यां ॥5॥

तेथोनिया निघाले। अक्कलकोटाप्रती आलेे।
ग्रामद्वारीं बैसले। यतिराज स्वेच्छेनें ॥6॥

तेथें एक अविंध होता। तो करी तयांची थट्टा।
परी कांहीं चमत्कार पाहतां। महासिद्ध समजला ॥7॥

पूर्वपुण्यास्तव निश्चिती। आले चोळाप्पाचे गृहाप्रती।
स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती। चोळाप्पा करी आदर ॥8॥

योगयागादिक कांहीं। चोळाप्पानें केलें नाहीं।
परी भक्तिस्तव पाहीं। स्वामी आले सदनातें ॥9॥

तयाची देखोनिया भक्ती। स्वामी तेथें भोजन करिती।
तेव्हां चोळाप्पाचे चित्तीं। आनंद झाला बहुसाळ ॥10॥

तैंपासुनी तयांचे घरी। राहिले स्वामी अवतारी।
दिवसेंदिवस चाकरी। चोळाप्पा करी अधिकाधिक ॥11॥

तेव्हां राज्यपदाधिकारी। मालोजीराजे गादीवरी।
दक्ष असोनी कारभारीं। परम ज्ञानी असती जे ॥12॥

चोळाप्पाचे गृहाप्रती। आले कोणीएक यती।
लोकां चमत्कार दाविती। गांवांत मात पसरली॥13॥

लोकांमाजी पसरली मात। नृपासी कळला वृत्तांत।
कीं आपुलिया नगरांत। यती विख्यात पातले ॥14॥

वार्ता ऐसी ऐकोनी। राव बोलला काय वाणी।
गांवांत यती येवोनी। फार दिवस जाहले॥15॥

परी आम्हां श्रुत पाहीं। आजवरी जाहलें नाहीं।
आतां जावोनी लवलाही। भेटूं तया यतिवर्या ॥16॥

परी ते केवळ अंतर्ज्ञानी। ऐसी वार्ता ऐकिली कानीं।
हें सत्य तरी येवोनी। आतांच देती दर्शना ॥17॥

रावमुखांतुनी वाणी निघाली। तोचिं यतिमूर्ती पुढें ठेली।
सकल सभा चकित झाली। मती गुंगली रायाची ॥18॥

खूण पटली अंतरीं। स्वामी केवळ अवतारी।
अभक्ती पळोनी गेली दुरी। चरणीं भक्ती जडली तैं ॥19॥

सकळ सभा आनंदली। समस्तीं पाउलें वंदिलीं।
षोडशोपचारें पूजिली। स्वामीमूर्ती नृपरायें ॥20॥

इति श्री स्वामीचरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
प्रेमळ भक्त परिसोत। तृतीयोध्याय गोड हा ॥21॥

श्रीस्वामीराजार्पणमस्तु॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृते अक्कलकोटनगरप्रवेशे तृतीयोऽध्याय: ॥

Within a few days, we will start a blog on the truth experiences of Swami devotees. And those who experienced these experiences will write in the blog. So as soon as possible, you have your experiences. Then send them to Our e mail adress,. rajesh.kamble01@gmail.com
So soon we will meet Shri Swami Samarth to all the devotees by the new article.

Shree Swami Samarth

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ३

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
अपना सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार, आपन मागील अध्यायात पाहीले की, कलकत्त्याहून आलेल्या साहेबाला आपण कुठुन आलो यांचे उत्तर दिले, व श्री स्वामींनी स्वतः विषयी सांगितले. व स्वामींच्या मंगळवेढा येथील कथन आलेले आहे.

          आता या अध्यायामध्ये श्री स्वामींच्या अक्कलकोट आगमना विषयी वृत्तांत सांगितला आहे. मंगळवेढ्याहून पंढरपूर, बेगमपुर, मोहोळ मार्गे श्री स्वामी सोलापूरात येऊन पोहोचले.         अक्कलकोटात प्रवेशाला सुरूवात करताना स्वामींचे परमभक्त चींतोपंत टोळ सोबत होते. मात्र काही कामानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेतून माघारी परतावे लागल्यामुळे, श्री स्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले.

अक्कलकोट येथे येताच क्षणी त्यांनी सर्वप्रथम एका थट्टेखोर अविंधाला चमत्कार दाखविला, आणि पुढे चोळप्पाच्या घरी स्वामींनी आपला मुक्काम केला. तेव्हा पुर्व पुण्याईच्या योगाने चोळप्पाच्या घरी श्री स्वामी कृपाधन चालत आले. कोणत्याही प्रकारचे‌ योगतत्व नसुनही केवळ भक्तीबळाचे सामर्थ्य बाळगणार्या भक्तांवर श्री स्वामींनी अपार माया आणि कृपा केली.

          चोळप्पाच्या घरात वास्तव्य करणार्या श्री स्वामींची किर्ती जेंव्हा अक्कलकोटचे राजेसाहेब मालोजींच्या कानी पोहोचली तेव्हा श्री स्वामींचे दर्शन कसे घडेल या उत्सुकते मध्ये असताना स्वामी राजवाड्यात अवतीर्ण झाले. साक्षात स्वामींना समोर उभं पाहून राजसभेतील सर्वजण चकित झाले. तसेच राजेसाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि धावत जाऊन श्री स्वामी चर्चांना मिठीच घातली.

भक्तांसाठी सगुण साकार झालेल्या निराकार निर्गुण श्री स्वामींच्या चरण पादुका मस्तकी धरून श्री विष्णूही ब्रह्मानंदात मग्न होतात तिथे राजांचे काय कौतुक, आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या तिसऱ्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय तिसरा देत आहोत.

                   ‌         अध्याय तिसरा
श्रीगणेशाय नम:।
धन्य धन्य ते या जगतीं। स्वामीचरणीं ज्यांची भक्ती।
त्यांसी नाही पुनरावृत्ती । पद पावती कैवल्य ॥1॥

निर्विकार स्वामीमूर्ती। लोकां चमत्कार दाविती।
कांहीं वर्षें करोनी वस्ती। मंगळवेढें सोडिलें ॥2॥

मोहोळामाजी वास्तव्य करीत। आप्पा टोळ झाले भक्त।
तेथींचे साकल्य वृत्त। अल्पमती केवीं वर्णूं ॥3॥

सवे घेउनी स्वामींसी। टोळ जाती अक्कलकोटासी।
अर्धमार्गावरुनी टोळांसी। मागें परतणें भाग पडे ॥4॥

टोळ गेलिया परतोनी। स्वामी चालले उठोनी।
बहुत वर्जिलें सेवकांनीं। परी नच मानिलें त्यां ॥5॥

तेथोनिया निघाले। अक्कलकोटाप्रती आलेे।
ग्रामद्वारीं बैसले। यतिराज स्वेच्छेनें ॥6॥

तेथें एक अविंध होता। तो करी तयांची थट्टा।
परी कांहीं चमत्कार पाहतां। महासिद्ध समजला ॥7॥

पूर्वपुण्यास्तव निश्चिती। आले चोळाप्पाचे गृहाप्रती।
स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती। चोळाप्पा करी आदर ॥8॥

योगयागादिक कांहीं। चोळाप्पानें केलें नाहीं।
परी भक्तिस्तव पाहीं। स्वामी आले सदनातें ॥9॥

तयाची देखोनिया भक्ती। स्वामी तेथें भोजन करिती।
तेव्हां चोळाप्पाचे चित्तीं। आनंद झाला बहुसाळ ॥10॥

तैंपासुनी तयांचे घरी। राहिले स्वामी अवतारी।
दिवसेंदिवस चाकरी। चोळाप्पा करी अधिकाधिक ॥11॥

तेव्हां राज्यपदाधिकारी। मालोजीराजे गादीवरी।
दक्ष असोनी कारभारीं। परम ज्ञानी असती जे ॥12॥

चोळाप्पाचे गृहाप्रती। आले कोणीएक यती।
लोकां चमत्कार दाविती। गांवांत मात पसरली॥13॥

लोकांमाजी पसरली मात। नृपासी कळला वृत्तांत।
कीं आपुलिया नगरांत। यती विख्यात पातले ॥14॥

वार्ता ऐसी ऐकोनी। राव बोलला काय वाणी।
गांवांत यती येवोनी। फार दिवस जाहले॥15॥

परी आम्हां श्रुत पाहीं। आजवरी जाहलें नाहीं।
आतां जावोनी लवलाही। भेटूं तया यतिवर्या ॥16॥

परी ते केवळ अंतर्ज्ञानी। ऐसी वार्ता ऐकिली कानीं।
हें सत्य तरी येवोनी। आतांच देती दर्शना ॥17॥

रावमुखांतुनी वाणी निघाली। तोचिं यतिमूर्ती पुढें ठेली।
सकल सभा चकित झाली। मती गुंगली रायाची ॥18॥

खूण पटली अंतरीं। स्वामी केवळ अवतारी।
अभक्ती पळोनी गेली दुरी। चरणीं भक्ती जडली तैं ॥19॥

सकळ सभा आनंदली। समस्तीं पाउलें वंदिलीं।
षोडशोपचारें पूजिली। स्वामीमूर्ती नृपरायें ॥20॥

श्रीस्वामीराजार्पणमस्तु॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृते अक्कलकोटनगरप्रवेशे तृतीयोऽध्याय: ॥
‌‌ थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामी समर्थ

Shri Swami Chariitra Saramrit ENGLISH translation chapter 2

Shree Swami Samarth

Shri Swami Samarth, Swami devotees welcome all of you in the second chapter of Shri Swami Charitra Saramrit English translation.

The devotees who serve the Sadhguru and devotees with expectations in their minds will be fulfilled, and the devotees who are devoted to the Sadguru devotion and service without any expectations of the devotees are gaining salvation.

In Shri Gurucharitra, the second incarnation of Dattatreya is the story of Shri Narsinghsaraswati. They vanished in the Kardali forest. It is believed that Shri Swami Samarth has been stabilized in Akkalkot for this. However, a devotee has made a different commentary about his incarnation by making Shri Swami’s birth. Whatever the logic argument about this. However, it is true that Shri Swamy has come to Akkalkot by holding human body for the rescue of the common people.

An occasion for this happened that while Shri Swami was sitting at Rachppa Modi’s house, someone from Kolkata came to Swami, for the purpose of Darshan. And started asking by curiosity where did you come from, Shri Swami . Shri Swamy laughed and answered his questions.

We first went out of the Kardali forest and then watching many pilgrims on Calcutta, Haridwar, Kedarshwar and Goda banks, Hyderabad, Mangalveda, Pandharpur, Begumpur, Mohol, Solapur. Shri Swami lived in Mangalveda for almost twelve years.

The unknown devotees of Mangalveda did not know the appearance of Shri Swami, while Swami lives there in jungle. However, this nature of these crazy, who lives as Digambar, shree Swami left those villagers, from Mangalveda to Pandharpur forever. And this is where the second chapter ends.
Shri Swami Samarth, Jai Jai Swami Samarth.

At the same time, we are giving you the chapter 2 of the original Swami charitra Saramrita for you.

अध्याय दुसरा


श्री गणेशाय नम: ॥
कामना धरोनी जे भजती। होय त्यांची मनोरथपूर्ती।
तैसेंची निष्काम भक्तांप्रती। कैवल्यप्राप्ती होतसे ॥1॥

अक्कलकोटामाझारी। राचाप्पा मोदी याचे घरीं।
बैसली समर्थांची स्वारी। भक्तमंडळी वेष्टित ॥2॥

साहेब कोणी कलकत्त्याचा। हेतु धरोनी दर्शनाचा।
पातला त्याच दिवशीं साचा। आदर तयाचा केला कीं ॥3॥

त्याजसवें एक पारसी। आला होता दर्शनासी।
ते येण्यापूर्वीं मंडळीसी। महाराजांंनी सुचविलें ॥4॥

तीन खुर्च्या आणोनी बाहेरी। मांडा म्हणती एके हारीं।
दोघांसी बैसवोनी दोहोंवरीं। तिसरीवरी बैसले आपण ॥5॥

पाहोनी समर्थांचें तेज। उभयतांसी वाटलें चोज।
साहेबानें प्रश्न केला सहज। आपण आला कोठुनी ॥6॥

स्वामींनी हास्यमुख करोनी। उत्तर दिलें तयालागोनी।
आम्ही कर्दळीवनांतुनी। प्रथमारंभी निघालों ॥7॥

मग पाहिलें कलकत्ता शहर। दुसरीं नगरें देखिलीं अपूर्व।
बंगालदेश समग्र। आम्हीं असे पाहिला ॥8॥

घेतलें कालीचें दर्शन। पाहिलें गंगातटाक पावन।
नाना तीर्थें हिंडोन। हरिद्वाराप्रती गेलों ॥9॥

पुढें पाहिलें केदारेश्वर। हिंडलों तीर्थें समग्र।
ऐशीं हजारो हजार। नगरें आम्हीं देखिलीं ॥10॥

मग तेथुनी सहज गती। पातलों गोदातटाकाप्रती।
जियेची महा प्रख्याती। पुराणांतरीं वर्णिली ॥11॥

केले गोदावरीचें स्नान। स्थळें पाहिलीं परम पावन।
कांहीं दिवस फिरोन। हैदराबादेसी पातलों ॥12॥

येऊनीया मंगळवेढ्यास। बहुत दिवस केला वास।
मग येउनि पंढरपुरास। स्वेच्छेनें तेथें राहिलों ॥13॥

तदनंतर बेगमपुर। पाहिलें आम्हीं सुंदर।
रमलें आमुचें अंतर। कांहीं दिवस राहिलों ॥14॥

तेथोनी स्वेच्छेनें केवळ। मग पाहिलें मोहोळ।
देश हिंडोनी सकळ। सोलापुरीं पातलों ॥15॥

तेथें आम्हीं कांहीं महिने । वास केला स्वेच्छेनें ।
अक्कलकोटाप्रती येणें। तेथोनिया जहालें ॥16॥

तैंपासुनी या नगरांत। आनंदें आहों नांदत।
ऐसें आमुचें सकल वृत्त। असे मुळापासोनी ॥17॥

द्वादश वर्षें मंगळवेढ्याप्रती। राहिले स्वामीराज यती।
परी त्या स्थळीं प्रख्याती। विशेष त्यांची न जाहली ॥18॥

दर्शना येतां साधू दिगंबर। लीलाविग्रही यतिवर्य।
कंबरेवरी ठेऊनी कर। दर्शन देती तयांसी ॥19॥

इति श्री स्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथासंमत।
आनंदें भक्त परिसोत। द्वितीयोध्याय गोड हा ॥20॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृते द्वितीयोऽध्याय:।
श्री रस्तु । शुभ मस्तु ॥

Within a few days, we will start a blog on the truth experiences of Swami devotees. And those who experienced these experiences will write in the blog. So as soon as possible, if you have your experiences. Send us them. Our e mail adress is, rajesh.kamble01@gmail.com
So soon we will meet by the new article Swami Samarth to all the devotees .

Shree Swami Samarth